शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

कोरोना काळातील निरुत्साहाच्या कृष्णमेघांना असलेली आश्वस्ततेची रूपेरी किनार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 04:15 IST

कोरोना विषाणूला प्रतिकार करणारी लस शोधण्याच्या जागतिक प्रयत्नांत भारतीय शास्त्रज्ञही आहेत. तुलनेने उशिरा प्रारंभ करूनही भारतीय संशोधन निर्णायक टप्प्यावर आलेले असून, ही सुखदायी वार्ता आहे.

कोविडकाळ नैराश्य आणि उद्विग्नतेने भरलेला निघाला. उद्यमाच्या पायात पडलेल्या बेड्यांनी अर्थव्यवस्था जेरीस आली. संसर्गाच्या संक्रमणामुळे प्रियजन दगावल्याचे दु:ख वस्तीला आले. महामारीही अशी की, तिचा अंत कधी व कुठे होईल, याचा अंदाज अद्यापही येत नाही. सगळेच निरुत्साहाचे वातावरण; पण काळ्या ढगांनाही रूपेरी किनार असते. निराशेलाही आव्हान देत परिस्थितीशी झुंजणारे लढवय्ये असतात, म्हणूनच उद्याच्या भरवशावर समाज जगत असतो. कोविडकाळातील अनिश्चिततेत भविष्याचा भरवसा देण्यासाठी झटताहेत अनेक वैज्ञानिक व संशोधक. लक्ष्य आहे कोविडवरला उतारा शोधण्याचे. आनंदाची बाब म्हणजे त्यांच्या या यत्नांना यशही येते आहे. ‘ग्लेनमार्क’ने आपले ‘फाविपिरावीर’ हे औषध हल्लीच विक्रीस उपलब्ध केले. सिप्ला आणि हेटरो इमर्जन्सी संयुक्तपणे ‘रमडेसीवीर’ हे दुसरे औषध उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहेत. त्यातच आता भारतात पहिली कोरोनाविरोधी लस तयार होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. भारताच्या औषध महानियंत्रकांनी हैदराबादस्थित भारत बायोटेक या औषध निर्मात्या कंपनीने तयार केलेल्या लसीचे पहिल्या आणि दुसऱ्या स्तरावरले प्रयोग स्वयंसेवकांवर करण्याची परवानगी दिली आहे. यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळाने सहकार्याचा हात पुढे केला असून, येत्या स्वातंत्र्यदिनी

ही लस जनतेला उपलब्ध करण्याचा संकल्प सोडलेला आहे. यातला अतिआत्मविश्वासाचा भाग सोडला तरी लसनिर्मितीची प्रक्रिया गतिमान झाल्याचे नाकारता येणार नाही. ही प्रक्रिया याच महिन्यात सुरू होऊन आॅक्टोबरपर्यंत लसीची उपयुक्तता समजून येईल. त्यानंतर विस्तृत प्रमाणात प्रात्यक्षिके घेता येतील. भारत बायोटेक हे लसनिर्मिती क्षेत्रातले जगन्मान्य नाव. त्यांनी याआधी ‘रोटा व्हायरस’ आणि ‘एचवनएनवन’ विषाणूंच्या संसर्गावरली लसही विकसित केली आहे. आता त्यांनी विकसित केलेली ‘कोवॅक्सिन’ लस प्रारंभीच्या चाचण्यांत तरी बरीच प्रभावी ठरल्याची माहिती समोर आली आहे. आणखीही काही कंपन्या लसीच्या शोधात असून, त्यांच्या प्रयत्नांनाही यश मिळते आहे. इम्युनोलॉजिकल्स, झायडेक कॅडिला, बायोलॉजिकल ई, माईनव्हॅक्स या कंपन्यांनी या दिशेने संशोधन केले असून, काहींनी चाचण्याही घेतल्या. भारतीय कंपन्यांकडून हीच अपेक्षा होती. औषधनिर्मितीत भारताचा हात धरणारा देश जगाच्या पाठीवर नाही. भारत बायोटेकने आतापर्यंत चार अब्ज लसी तयार करून त्यांची जगभरात विक्री केली आहे. हा इतिहास पाहता कोरोनाचा नायनाट करणारी लस भारतात वेगाने तयार होणे स्वाभाविक आहे. कोरोनाचा उद्भव जगात सर्वप्रथम जिथे आढळला, त्या चीनमध्येही लसीसाठीचे संशोधन बरेच पुढे गेलेले असून तिथल्या सिनोव्हॅक बायोटेक कंपनीची लस अंतिम चाचणीच्या स्तरावर पोहोचल्याचे सांगितले जाते.

इंग्लंडमधले प्रयत्नही अशाच प्रगत स्तरावर आहेत. कदाचित आपल्याआधी त्यांच्या लसी उपलब्ध होतीलही; पण आपल्यासाठी जमेची बाब म्हणजे कोविडच्या नायनाटासाठी पाश्चिमात्य जग वा चीनच्या दातृत्वावर अवलंबून राहावे लागणार नाही. आव्हानाच्या डोळ्याला डोळा भिडवण्याची आपली क्षमता भारतातील संशोधन क्षेत्राने पुन्हा एकवार सिद्ध केली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे आपण चीनच्या तुलनेत बरीच उशिरा सुरुवात केली होती. पूर्वसूचनेशिवाय जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे देशात गोंधळाचे वातावरण होते. संसर्गाचा कहर झाला, तर अपुºया आरोग्यसुविधा असलेला आपला देश फार काळ तग धरू शकणार नसल्याचे भाकित वर्तवले जात होते. आपल्याकडे आवश्यक प्रमाणात सुरक्षा किट्स नाहीत, व्हेंटिलेटर्स नाहीत, आयसीयू विभाग नाहीत. पाश्चिमात्य जग किंवा चीनप्रमाणे संशोधनासाठी ओतण्याकरिता अवाढव्य साधनसंपत्ती नाही. त्यामुळे मृत्यूची दाहकता आपल्याला अधिक सोसावी लागेल, असा समज देशभरात दृढ होऊ लागला होता. आजही तो तसाच असला तरी संसर्गाची व्याप्ती वाढली असतानाही चिवटपणे लढतो आहोत, हेही महत्त्वाचे आहे. लढण्याचा तोच बाणा आपल्या संशोधकांनीही दाखवला असून, भविष्यात संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी अन्य देशांच्या तोंडाकडे पाहण्याची, लसीचे दान पडण्यासाठी प्रतीक्षा करण्याची आवश्यकता राहाणार नाही, हेच त्यांनी आपल्या कर्तृत्वानिशी सिद्ध केले आहे. कोरोना काळातील निरुत्साहाच्या कृष्णमेघांना असलेली आश्वस्ततेची रूपेरी किनार ती हीच.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत