शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

संपादकीय: इम्रानची गच्छंती? पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 05:54 IST

पाकिस्तान आज दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. महागाई प्रचंड भडकली आहे

भारत आणि पाकिस्तान. बरोबर ७५ वर्षांपूर्वी एक दिवसाच्या फरकाने स्वतंत्र झालेले दोन देश. खरे तर एकाच देशाचे दोन तुकडे. उभय देशांनी लोकशाही प्रणालीचा अंगीकार केला; पण एका देशात लोकशाही केवळ रुजलीच नाही, तर त्याच्या नावामागे जगातील सर्वात मोठी लोकशाही हे बिरूद लागले आणि दुसरा सतत लष्करशाहीच्या वरवंट्याखाली भरडला गेला ! अधूनमधून लोकशाही नांदली खरी; पण नावापुरतीच ! खरी सत्ता लष्करशहांच्याच ताब्यात होती. त्यामुळेच आजवर एकही पाकिस्तानी पंतप्रधान पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकलेला नाही. आता पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान रविवारी संसदेत अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाणार आहेत आणि प्राप्त संकेतांनुसार त्यांची गच्छंती अटळ दिसत आहे.

वस्तुतः इम्रान खान पंतप्रधान पदावर आरूढ झाले तेच मुळी लष्कराच्या मर्जीमुळे ! पूर्वी पाकिस्तानी लष्कर लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला पदच्युत करून स्वत:च सत्ता ताब्यात घेत असे; पण गत काही दशकांपासून लष्कराने डावपेच बदलले आहेत. आता लष्कर सत्ता स्वत:च्या ताब्यात न घेता बाहुले नागरी सरकार सत्तेत बसवते. इम्रान खान सरकार हे त्याच मालिकेतील; मात्र गत काही काळात इम्रान खान यांनी लष्कराला न रुचणारे काही निर्णय घेतले आणि त्याचीच परिणती त्यांच्या गच्छंतीत होताना दिसत आहे. इम्रान खान यांच्या राजवटीत पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली. पूर्वी अमेरिका आणि युरोपातील देशांचा वरदहस्त पाकिस्तानवर होता. बदललेल्या जागतिक भू-राजकीय परिस्थितीत आता अमेरिकेला पाकिस्तानची गरज वाटत नाही. त्यामुळे अमेरिकेने आणि युरोपियन देशांनीही, पाकिस्तानला वाऱ्यावर सोडून दिले आहे. चीन ती पोकळी भरून काढेल, अशी इम्रान खान यांची अपेक्षा होती; मात्र चीनने अमेरिका व युरोपियन देशांप्रमाणे पाकिस्तानला आर्थिक आधार दिला नाही. भरीस भर म्हणून चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका (सीपेक) प्रकल्पासाठी चीनने प्रचंड व्याजदरावर दिलेल्या कर्जामुळे पाकिस्तानचे आर्थिक कंबरडेच मोडले. त्यातच इम्रान खान यांना जागतिक मुस्लीम समुदायाचे नेतृत्व करण्याची खुमखुमी आली. त्यासाठी त्यांनी तुर्की आणि मलेशियाला सोबत घेतले. त्यामुळे पाकिस्तानचे पतपुरवठादार असलेले सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिराती हे दोन्ही देश चिडले आणि त्यांनीही पाकिस्तानला वाऱ्यावर सोडले.

पाकिस्तान आज दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. महागाई प्रचंड भडकली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेत इम्रान सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष आहे. हळूहळू लष्करालाही त्याची झळ बसू लागली आहे. परिणामी इम्रान सरकार लष्करासाठी ओझे बनले आणि त्यापासून सुटका करून घेण्यातच लष्करशहांना शहाणपण दिसू लागले, हाच पाकिस्तानातील ताज्या घडामोडींचा अन्वयार्थ आहे. पाकिस्तान कधीकाळी भारताचाच भाग होता. त्यामुळे दोनपैकी कोणत्याही देशात खुट्ट जरी झाले, तरी त्याचे पडसाद दुसऱ्या देशात उमटणे स्वाभाविक आहे. आताही इम्रान खान यांच्या संभाव्य गच्छंतीचा भारतावर काय परिणाम होईल, याची चर्चा भारतात जोरात सुरू झाली आहे. भारत किंवा पाकिस्तानात सत्तापरिवर्तन झाले, की त्याचा द्विपक्षीय संबंधांवर सकारात्मक परिणाम होण्याची आशा उभय देशातील काही विचारवंतांना वाटू लागते; पण ती वेडी आशा असल्याचे इतिहासाने वारंवार सिद्ध केले आहे. आताही वेगळे काही होण्याची अपेक्षा नाही. जोपर्यंत पाकिस्तानात लष्कराचा वरचष्मा संपुष्टात येऊन खऱ्या अर्थाने लोकशाही मूळ धरत नाही तोपर्यंत उभय देशातील संबंध सामान्य होण्याची अजिबात अपेक्षा करता येणार नाही. पाकिस्तानने तसे ठरवले तरी चीन तसे करू देणार नाही; कारण अमेरिकेने जसा पाकिस्तानचा वापर रशियाच्या विरोधात करून घेतला, तसाच तो चीनला भारताच्या विरोधात करून घ्यायचा आहे. भारताची कृत्रिमरीत्या फाळणी करून पाकिस्तान स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला खरा; पण जन्मापासून आजपर्यंत स्वत:च्या पायावर कधीच उभा झाला नाही. सतत अमेरिका व चीनच्या ओंजळीने पाणी पीत आला. जे पाणी पाजतील ते त्याची किंमत तर वसूल करतीलच ! त्याशिवाय जम्मू-काश्मीरची ७५ वर्षांपासून भळभळत असलेली जखम आणि अफगाणिस्तानात पुन्हा सत्तेत परतलेले तालिबान हे पैलू आहेतच ! त्यामुळे इम्रान खान जाऊन पाकिस्तानात दुसरे कोणी सत्तेत आल्याने भारतासाठी काही फरक पडण्याची शक्यता दुरापास्तच आहे !

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानEconomyअर्थव्यवस्था