शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

मानवी आयोगाने नागरी हक्कांबाबत केलेल्या सूचना गंभीरपणे घ्याव्याच लागतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 02:14 IST

मानवी हक्क आयोगावर जगातील २५ देशांना प्रतिनिधित्व असल्यामुळे हा संदेश केवळ एका देशाचा नसून जगाचा आहे. ज्या थोड्या देशांत अजून लोकशाही शाबूत आहे तेथे तरी हे हक्क कायम राहिले पाहिजेत.

संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार आयोगाने काश्मीर व आसाम या भारतातील दोन प्रदेशांतील नागरी हक्कांबाबत चिंता व्यक्त करणारे केलेले वक्तव्य भारत सरकारने फारशा गंभीरपणे घेतले नसले तरी मानवाधिकाराविषयी आस्था असणाऱ्या संस्था, संघटना व व्यक्ती यांनी ते गंभीरपणे घ्यावे असे आहे. घटनेतील ३५ अ व ३७० ही कलमे काढून टाकल्यानंतर काश्मीरच्या अनेक भागांत कर्फ्यु जारी करण्यात आला, राज्यातील बहुतेक सर्व पक्षांच्या प्रमुखांना नजरकैदेत बंदिस्त करण्यात आले आणि तेथील संपर्काच्या साधनांवरही बंदी घालण्यात आली. काश्मिरात दंगा झाल्याचे एकही वृत्त अद्याप लोकांपर्यंत पोहोचले नसले तरी तेथे असलेली अस्वस्थता देश व जग यांच्यापासून लपून राहिलेली नाही. मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षा मिशेल बाचेले यांनी काश्मिरी जनतेच्या मानवी हक्कांचे पुनर्वसन करण्याची व त्यांचे मानवी अधिकार पुन्हा बहाल करण्याची सूचना भारत सरकारला केली आहे.

त्याचवेळी पाकिस्ताननेही त्याच्या ताब्यात असलेल्या काश्मीरच्या प्रदेशात नागरी हक्क व मानवाधिकार दिले पाहिजेत असे सांगितले. मानवी हक्क आयोगावर जगातील २५ देशांना प्रतिनिधित्व असल्यामुळे हा संदेश केवळ एका व्यक्तीचा वा देशाचा नसून जगाचा आहे हे लक्षात घेतले पाहिजे. जगातील अनेक देशांत मानवी हक्कांची पायमल्ली होत असताना ज्या थोड्या देशांत अजून लोकशाही शाबूत आहे तेथे तरी हे हक्क कायम राहिले पाहिजेत ही या आयोगाची भूमिका आहे. आयोगाच्या ४२ व्या परिषदेचे उद्घाटन करताना बॅचेले यांनी आरंभीच हा इशारा भारताला व पाकिस्तानला दिला आहे. त्याचवेळी या आयोगाने भारतासह साºया जगाचे लक्ष आसामकडेही वेधले आहे. आसाममध्ये दीर्घकाळापासून वास्तव्य करीत असलेल्या व देशाचे नागरिकत्व मिळविलेल्या सुमारे १९ लक्ष नागरिकांची भारत सरकारने एक सूची तयार करून त्यातील परकीय ठरविलेल्या लोकांना देशाबाहेर घालविण्याचे धोरण जाहीर केले आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी या धोरणाचा कमालीचा आग्रह चालविला आहे. या कारवाईला येत्या काही काळात सुरुवातही होण्याची शक्यता आहे. तथापि याच काळात ही सूची सदोष असल्याचे अनेकवार स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानच्या निर्मितीपूर्वी आसाम व बंगाल यांचे संयुक्त राज्य होते. त्याची पुढे बंगाल व आसाम अशी दोन राज्ये झाली. बांगला देशची निर्मिती झाल्यानंतर पूर्व व पश्चिम बंगाल असे त्याचे आणखी दोन भाग झाले. मात्र हे सारे होत असतानाच पूर्वीच्या पूर्व पाकिस्तानातून व नंतरच्या बांगला देशातून हजारो गरीब लोक मजुरीच्या शोधात आसामातील चहामळ्यात काम करायला आले. हा वर्ग तेथे अनेक दशकांपासून स्थायिकही झाला. त्यांना मताधिकार मिळाला व कालांतराने त्यातील अनेकांनी भारताचे नागरिकत्वही मिळविले. या वर्गात जन्माला आलेल्या मुलांना भारताच्या घटनेप्रमाणे भारताचे नागरिकत्व आपोआप प्राप्तही झाले. आता यातील परकीय लोक निवडणे व देशाबाहेर घालविणे ही एक कमालीची गुंतागुंतीची व अवघड अशी प्रक्रिया आहे.

१९८० पासूनच या माणसांना देशाबाहेर घालविण्याचे प्रयत्न आसामच्या सरकारने व जनतेनेही केले आहेत. मात्र परकीय म्हणून नेमकी माणसे हुडकणे व त्यांची सूची तयार करणे हे काम तेव्हाही आतासारखेच अवघड राहिले आहे. तयार करण्यात आलेली परकीयांची सूची सदोष असेल व तीत देशातील नागरिकांची नावेही आली असतील तर त्यांच्यावर देशाबाहेर जाण्याचा आदेश बजावणे हा प्रकार कमालीचा अन्यायकारक व स्वदेशी नागरिकांना देशहीन बनविणारा ठरण्याची शक्यता मोठी आहे. देशात वास्तव्य करणाऱ्यांना देशाबाहेर घालविण्याचे उद्योग सध्या अमेरिकेसह अनेक पाश्चात्त्य देश करीत आहेत. पूर्वेकडे म्यानमारसारखा देश रोहिंग्या आदिवासींना देशाबाहेर घालविण्यासाठी शस्त्रसज्ज झाला आहे. परिणामी, अमेरिकेपासून म्यानमारपर्यंत स्वदेशी-विदेशी असा तिढा आज जग अनुभवत आहे. मानवी हक्क आयोगाने आसामबाबत नेमकी हीच चिंता व्यक्त केली आहे. या चिंतेचा भारताच्या सरकारनेच नव्हेतर, जनतेही गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतPakistanपाकिस्तान