शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

संपादकीय: शहाणपणाच्या चार गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 04:53 IST

कोरोना विषाणू हे माणसांवर कोसळलेले पहिले संकट नाही व ते शेवटचेही नसेल. यापेक्षा भयंकर संकटांचा, रोगराई, भूक, युद्धे व नैसर्गिक आपत्तींचा सामना पृथ्वीतलावरील माणसांनी हातात हात घालून, एकमेकांना धीर देऊन केला आहे.

स्मशानभूमीत चिता पेटवायला जागा मिळेनाशी झालीय, दफनभूमी कमी पडायला लागल्या आहेत, रोज लाखोंच्या संख्येत नवे रुग्ण निष्पन्न होताहेत आणि राज्या-राज्यांमध्ये शेकडोच्या संख्येने जीव जाताहेत. अशावेळी निवडणुकांमधील विजय हाच सर्व समस्यांवरील तोडगा मानणाऱ्या सत्ताधाऱ्यांना लोकांच्या जगण्या-मरण्यापेक्षा आणखी निवडणुका जिंकणे महत्त्वाचे वाटते. विजय ज्यांच्या दृष्टिपथात नाही, ते उठताबसता सत्ताधाऱ्यांवर टीका करतात. औषधे, इंजेक्शन्स, ऑक्सिजन वगैरेसाठी राज्या-राज्यांचे मुख्यमंत्री पंतप्रधानांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करताहेत, तर त्यांचे कार्यालय माननीय पंतप्रधान निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याचा उलटा निरोप देताहेत. असा निरोप आला म्हणून सायंकाळपर्यंतही वाट न पाहता मुख्यमंत्र्यांचे कार्यालय लगेच त्या उदासीनतेची माहिती माध्यमांना देण्याची घाई करतात. केंद्रातील मंत्री त्यांना राजकीय उत्तरे देण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात.

एक कॅबिनेट मंत्री केंद्र सरकारवर गंभीर आरोप करण्यात दिवस घालवतात, तर राज्याचे माजी मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाच्या कार्यालयात येऊ पाहणारा इंजेक्शनचा साठा व उत्पादकाला पोलिसांनी अडवले म्हणून पोलीस ठाण्यात रात्रीचा दिवस करतात. जनतेचे कैवारी म्हणून मिरवणाऱ्या, भाग्यविधाते म्हणून मतदारांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचे हे वागणे शिसारी आणणारे नाही तर काय! काेरोना विषाणूच्या फैलावामुळे समस्त मानवजातीवरच महाभयंकर संकट कोसळलेले असतानाचे हे किळसवाणे राजकारण, आरोप-प्रत्यारोपाची नोंद इतिहास सुवर्णाक्षरांनी करणार नाही, याची या सर्वांनी गंभीर नोंद घ्यायला हवी. दुसरीकडे या सगळ्या गोष्टींबद्दल सन्माननीय पुढाऱ्यांना योग्य ती समज देण्याची ज्यांच्यावर जबाबदारी ती लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणविणारी माध्यमेही भीती विकण्यातच व्यस्त आहेत. आधीच भेदरलेल्या सामान्यांवर पुन्हा पुन्हा ब्रेकिंग न्यूज, ‘आताची सर्वांत मोठी बातमी’चा मारा सुरू आहे. जिवंतपणी व मृत्यूनंतरही सर्वसामान्यांच्या नशिबी कुत्तरओढ येत असेल तर माध्यमांनी ते लोकांपर्यंत पोहोचवलेच पाहिजे; पण ते अत्यंत संयत पद्धतीने. त्याऐवजी पिसाटल्यासारखे वृत्तांकन होत असल्यामुळेच लोक माध्यमांनाच क्वाॅरंटाइन करण्याची मागणी करू लागलेत, हे काही चांगले लक्षण नाही. क्षेत्र कोणतेही असो, लोकांना विकण्याच्या दोनच गोष्टी असतात, स्वप्ने व भीती. राजकीय नेते व माध्यमेही तेच करताहेत. स्वप्ने विकली जात नाहीत असे दिसले की भीती विकायला सुरुवात होते. कोरोना विषाणूच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेने हेच अधोरेखित केले आहे. खरे पाहता असे व्हायचे काहीही कारण नाही. संक्रमण होऊ नये म्हणून स्वत:ची, कुटुंबाची काळजी घेतली, बाधितांपासून दूर राहिले, मास्क वापरला, लस घेतली, तरीही बाधा झालीच तर आहार, विश्रांती, डॉक्टरांनी दिलेला उपचार घेतला की पुरेसे आहे.

अवघा दीड-दोन टक्के मृत्यूदर असलेली ही महामारी दिसायलाच अक्राळविक्राळ आहे. मनाचा हिय्या केला तर विषाणूवर मात करणे सहज शक्य आहे. कोट्यवधींनी तशी मात केलीही आहे. मनात आणले तर राजकीय पक्षही बरेच काही करू शकतात. कार्यकर्त्यांची फळी विधायक कामांसाठी वापरू शकतात. ही लढाई प्रशासन एकाकी लढत असल्याचे चित्र आहे. त्यांच्यासोबत ही राजकीय फळी उभी राहू शकते. विषाणूची लक्षणे दर चार-सहा दिवसांत बदलत असल्याने हवालदिल झालेल्यांना घरोघरी जाऊन धीर दिला जाऊ शकतो. ‘घाबरू नका, सगळेजण मिळून संकटावर मात करू’, असे सांगू शकतात. आपली काळजी करणारे, धीर देणारे कुणीतरी आहे, ही भावनाच जगण्याची उमेद वाढविते. खरे पाहता आपल्यापैकी प्रत्येकाने, या महाभयंकर महामारीमुळे आपण सामूहिक तारतम्य, शहाणपण गमावले आहे का, हा प्रश्न स्वत:लाच विचारायला हवा. तसे नसते तर संकटकाळात विषाणूच्या जोडीला हा शह-काटशहाचा व स्पर्धेचा विंचू, असा दिसेल त्याला दंश करीत सुटला नसता.

कोरोना विषाणू हे माणसांवर कोसळलेले पहिले संकट नाही व ते शेवटचेही नसेल. यापेक्षा भयंकर संकटांचा, रोगराई, भूक, युद्धे व नैसर्गिक आपत्तींचा सामना पृथ्वीतलावरील माणसांनी हातात हात घालून, एकमेकांना धीर देऊन केला आहे. पक्षीय मतभेद विसरून राजकारणही अशा संकटावेळी बदलले आहे, राष्ट्रीय सरकारांचेही प्रयोग झाले आहेत. हा विषाणूही घर बांधून राहणारा नाही. लवकरच स्थिती सामान्य होईल. जगण्याचे रहाटगाडगे पुन्हा पूर्वपदावर येईल. तेव्हा मागे वळून पाहताना आपण या आपत्तीचा सामना एकजुटीने, धीरोदात्तपणे, संयमाने केला, आजारी बिछाने आपुलकीने सजवले, एवढी नोंद तरी इतिहासात व्हावी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस