शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय - आर्थिक गाडा आता हलेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 00:15 IST

महाराष्ट्र सरकारनेही ज्या जिल्ह्यांत कोरोनाची फारशी लागण झालेली नाही, तेथील कारखाने व उद्योग सुरू करण्याची तयारी चालविली आहे. सध्या ९० ते ९५ टक्के कारखाने बंद आहेत

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा भारताला मोठा फटका बसू नये यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला तीन आठवडे पूर्ण होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशाला उद्देशून जे भाषण केले, त्यात त्यांनी लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढविण्याची घोषणा केली. तसे करणे आवश्यकच होते. मात्र, लॉकडाऊनमुळे बंद पडलेला आर्थिक गाडा आणखी तीन आठवडे सुरू होणार नाही की काय ही चिंता पंतप्रधानांच्या भाषणाने अधिक वाढविली. अर्थात त्यानंतर २४ तासांत केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकामुळे सर्वांनाच मोठा दिलासा मिळणार आहे. लगेच नाही, तरी २० एप्रिल म्हणजे येत्या सोमवारपासून जीवन आणि जगणे सध्याच्या तुलनेत खूपच सुसह्य होईल, असे या परिपत्रकामुळे स्पष्ट झाले आहे. लॉकडाऊन ठरल्यानुसार ३ मेपर्यंत कायम राहणारच आहे. रेल्वे, विमान आणि राज्यांतर्गत तसेच आंतरराज्य बस वाहतूक पूर्णपणे बंदच राहील. घराबाहेर पडताना मास्क लावणे बंधनकारक असेल, कामाशिवाय बाहेर पडण्यास असलेली बंदी कायम राहील. हे निर्बंध कायम ठेवून लोकांना सहन करावा लागणारा त्रास आणि त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी सरकारने काही बंधने शिथिल करण्याचे ठरविले आहे.

महाराष्ट्र सरकारनेही ज्या जिल्ह्यांत कोरोनाची फारशी लागण झालेली नाही, तेथील कारखाने व उद्योग सुरू करण्याची तयारी चालविली आहे. सध्या ९० ते ९५ टक्के कारखाने बंद आहेत आणि उत्पादन ठप्प झाले आहे. निर्बंध शिथिल केल्याने यांतील कारखाने वा उद्योग नक्कीच सुरू होतील. उत्पादन सुरू होईल, जे कामगार, कर्मचारी घरी बसून आहेत त्यांना कामावर जाता येईल. या उत्पादने व वस्तूंचा पुरवठा वेगाने सुरू होईल. काही वस्तूंची निर्यात होऊ शकेल. अनेक देशांनी भारतीय कंपन्यांकडे वस्तूंची मागणी नोंदविली होती. त्या आता पाठविता येतील. उत्पादन टप्प्याटप्प्याने सुरळीत होऊ लागले की टंचाई आणि काळाबाजार थांबू शकेल. सध्या केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीलाच परवानगी आहे. यापुढे सर्वच वस्तूंची वाहतूक आणि पर्यायाने पुरवठा सुरू होईल. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील धाबे, छोटी हॉटेल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालक व अन्य कर्मचारी यांच्या चहा, नाश्ता व जेवणाची सोय होणार आहे. शिवाय हॉटेल आणि धाबे यांत काम करणाऱ्यांनाही दिलासा मिळेल. जे तीन आठवडे घरी आहेत त्यांना पुन्हा रोजगार मिळेल आणि त्यामुळे हातात थोडा का होईना, पैसा मिळेल. शेतीची खोळंबलेली कामेही सुरू करणे शेतकऱ्यांना शक्य होईल. त्यांना बियाणे, खते उपलब्ध होतील व मुख्य म्हणजे शेतमजुरांच्या हाताला काम मिळेल. यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा गाडा हलायला तरी लागेल. मनरेगाखालील कामे सुरू करण्याची घोषणाही सरकारने केली आहे. ती सुरू झाली की देशभरातील काही लाख ग्रामीण लोकांना रोजगार आणि पैसा मिळू शकेल. शहरी मजुरांच्या हातातही सध्या पैसा नाही. रिक्षा, टॅक्सी, आदी वाहनांना काही अटींवर रस्त्यांवर धावण्याची परवानगी दिल्यास अनेकांना फायदा होईल. मात्र, या वाहनांची गर्दी होता कामा नये. शहरे आणि गावांतील गॅरेजेस, वाहनांच्या सुट्ट्या भागांची दुकाने, मोबाईलची दुकानेही २० एप्रिलपासून सुरू करता येणार आहेत. यांतून अनेक दुकानदार व छोटे व्यावसायिक यांची कामे सुरू होतील. औषधांची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी आताही आहे; पण ग्रामीण भागांत काही औषधांचा तुटवडा जाणवत आहे. उत्पादन आणि पुरवठा ही साखळी सुरू झाल्यास तोही जाणवणार नाही. अन्नधान्य, भाजीपाला, फळे यांच्या वाहतुकीवर आताही निर्बंध नव्हते; पण बाजार समित्यांमध्ये शेतकरी आणि व्यापाºयांची होऊ लागलेली गर्दी, काहींना संसर्गाची झालेली बाधा आणि स्वयंशिस्तीचा अभाव यामुळे बाजार समित्या बंद कराव्या लागल्या. त्या सुरू झाल्याने शेतकºयांना चांगला भाव मिळेल. बॅँकांबरोबरच टपाल, ई-कॉमर्स व कुरियर सेवाही सुरू होणार असल्याने आर्थिक व्यवहार सुरळीत होण्यास चालना मिळेल. लोकांना आर्थिक अडचणींतून बाहेर काढण्यासाठीच्या या उपायांचे सारेच स्वागत करतील; पण आपली जबाबदारीही मोठी आहे. तुम्हा-आम्हाला कोरोनाची लागण होऊ नये यासाठी घालण्यात आलेल्या निर्बंधांचे पालन करायलाच हवे, ते न केल्यास बाका प्रसंग ओढवेल. आर्थिक व आरोग्यविषयक अशा दोन्ही संकटांचा सामना शिस्त पाळूनच करावा लागेल.आर्थिक गाडा रुळांवर आणताना कोरोनाविरुद्धची लढाई जिंकायची आहे, हे आपण विसरून चालणार नाही. निर्बंध उठविले जाणार नाहीत, हे लक्षात असायला हवे.

टॅग्स :Lokmatलोकमतcorona virusकोरोना वायरस बातम्याEconomyअर्थव्यवस्था