शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

महाराष्ट्रातील भाजपाच्या कामगिरीवर संघ व्यथित; विदर्भातही निराशाजनक अपयश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 06:32 IST

आताची माघार जेवढी भाजपला जखमी करणारी त्याहून अधिक ती संघाला घायाळ करणारी आहे. संघाचे नेते व प्रवक्ते बोलत नाहीत किंवा वक्तव्ये देत नाहीत. पराभव मुकाट्याने पचविण्याची त्यांना सवय असली तरी त्यांची वेदना समजून घेता यावी अशी आहे.

भाजपा-शिवसेना युतीने राज्यात पुन: विजय मिळविला असला तरी तिने विदर्भातील अनेक जागी पराभव पत्करला आहे. गेल्या निवडणुकीत तेथील एकूण ६२ जागांपैकी ४४ जागी विजयी झालेल्या या युतीतील एकट्या भाजपनेच आपल्या वाट्याच्या १५ जागा गमावल्या आहेत. विदर्भ हा एकेकाळी काँग्रेसचा मतकिल्ला असलेला भाग मधल्या काळात जवळजवळ भाजपमय झाला होता. १९६७ पासूनच त्या पक्षाने आपले बळ वाढवित ते २०१४ मध्ये ४४ पर्यंत नेले होते. आपल्याला जन्म देणाऱ्या रा.स्व. संघाचे मुख्यालय नागपुरात आहे आणि गेल्या निवडणुकीत त्या जिल्ह्यातील १२ पैकी ११ जागा काबीज करणाऱ्या त्या पक्षाने यावेळी फक्त सहाच जागा राखल्या आहेत.

ज्या पक्षाला त्यात एकही जागा गेल्या निवडणुकीत मिळविता आली नव्हती त्या काँग्रेसने ३, राष्ट्रवादीने १ तर अपक्षाने १ जागा जिंकली आहे. नितीन गडकरी हे केंद्रातील वजनदार मंत्री व देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री याच जिल्ह्यातून आले आहेत. शिवाय सुधीर मुनगंटीवार हे अर्थ व वनमंत्री असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या निवडणुकीत पाचही जागा मिळविणाऱ्या या पक्षाला तेथे फक्त दोन जागी विजय मिळविता आला आहे.

अमरावती जिल्ह्यात आठपैकी एक जागा त्याने राखली तर गडचिरोलीत एक व गोंदियातही दोन जागा त्याने गमावल्या आहेत. संघाच्या कार्यकर्त्यांनी थेट स्वातंत्र्यपूर्व काळापासून मोठ्या कष्टाने विदर्भात पक्ष वाढविला. पुढल्या काळातही त्याला निष्ठावान कार्यकर्ते मिळत राहिले. मध्यंतरी तो जनतेचाच पक्ष झाला व त्याने काँग्रेसला विदर्भात फारसे स्थान राखू दिले नाही. या पार्श्वभूमीवर त्याची आताची माघार जेवढी भाजपला जखमी करणारी त्याहून अधिक ती संघाला घायाळ करणारी आहे. संघाचे नेते व प्रवक्ते बोलत नाहीत किंवा वक्तव्ये देत नाहीत. पराभव मुकाट्याने पचविण्याची त्यांना सवय असली तरी त्यांची वेदना समजून घेता यावी अशी आहे. तसाही आज संघ भाजपकडून दुर्लक्षित होतानाच दिसत आहे. गेल्या सहा वर्षांत मोदींनी संघ मुख्यालयाला एकदाही भेट दिली नाही. दोनदा नागपूरला आल्यानंतरही ते संघस्थानी गेले नाहीत. एकदा तर पावसामुळे नागपूर विमानतळावर दोन तास अडकून असतानाही ते तिकडे फिरकले नाहीत आणि एकदा भाजपच्या एक ज्येष्ठ मंत्र्याने विनवूनही त्यांनी त्यासाठी नकार दिला. आपली ही उपेक्षा संघाला समजते. काही वर्षांपूर्वी नितीन गडकरींना पक्षाध्यक्षपद देऊन त्याने मोदींचा रोष ओढवून घेतला होता. ज्या काळात अटलबिहारी मोदींवर संतापले होते त्याही काळात संघाने मोदींची पाठराखण केली नव्हती. या गोष्टी अर्थातच त्यांना विसरता आल्या नसणार. परंतु, आपण स्थापन केलेल्या पक्षामागून जाण्याखेरीज संघाला समोरही दुसरा पर्याय नाही आणि तो मोदींना काही ऐकवील तर ते मोदी मनावर घेतीलच असेही नाही.

या स्थितीत किमान विदर्भात भाजपला चांगले यश मिळावे व त्याचा वाटा आपल्याकडेही यावा असे त्यातील काहींना वाटत असेल तर ते स्वाभाविक म्हणावे लागेल. विदर्भातील भाजपच्या आत्ताच्या माघारीने त्याची तीही संभावना संपली आहे. ‘मी पुन: येईन’ असे म्हणत असतानाच देवेंद्र फडणवीस ‘२२० च्या पुढे जाण्याची’ भाषा बोलत होते. तसे बोलताना त्यांनाही विदर्भात आपण आपले भक्कम बहुमत राखू शकू असे वाटत असणार. मात्र तसे झाले नाही. सेनेने तिच्या जागा टिकविल्या तरी भाजपलाच आपल्या जागा राखता आल्या नाहीत. ही बाब भाजपला जेवढी निराश करणारी त्याहूनही संघाला अधिक व्यथित करणारी आहे.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा