शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अग्रलेख: देवा तुझ्या दारी... श्रद्धावान भाविकांची भाबडी भावना अन् देवदर्शनाचे 'शटडाउन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 08:49 IST

हेच मरण श्रेष्ठ मानले जाणार असेल तर कुणाही सरकारला धार्मिक स्थळी होणाऱ्या चेंगराचेंगरीचा व मृत्यूंचा खेद वाटायचा प्रश्नच उरत नाही.

‘देवाच्या दारी मरण यावे’ अशी अनेक श्रद्धावान लोकांची भाबडी भावना असते. हेच मरण श्रेष्ठ मानले जाणार असेल तर कुणाही सरकारला धार्मिक स्थळी होणाऱ्या चेंगराचेंगरीचा व मृत्यूंचा खेद वाटायचा प्रश्नच उरत नाही. भाविकांचे असे मरण पाहत देव गाभाऱ्यात निर्धास्त असतो अन् सरकारही अशा मृत्यूंचा दोन-चार दिवस शोक पाळून नंतर बिनघोर झोपते. तिरुपती देवस्थानमध्ये बुधवारी रात्री चेंगराचेंगरी होऊन सहा भाविकांचा मृत्यू झाला, तर चाळीस जण जखमी झाले. वैकुंठ एकादशीच्या पार्श्वभूमीवर दर्शन मिळावे यासाठी भाविकांनी टोकन केंद्रांवर गर्दी केली होती. त्यावेळी एका केंद्रावर ही चेंगराचेंगरी झाली.

अशी घटना प्रथमच घडली असे नव्हे. उत्तरप्रदेशातील हाथरस येथे गेल्याच वर्षी भोलेबाबाच्या सत्संगात चेंगराचेंगरी होऊन १२१ लोक दगावले. मथुरा, केरळमधील सबरीमाला मंदिर, जम्मूमधील वैष्णोदेवी, साताऱ्यातील मांढरदेवी या धार्मिकस्थळी व अगदी कुंभमेळ्यातही  चेंगराचेंगरी होऊन लोकांचा मृत्यू होण्याच्या घटना घडलेल्या आहेत. अफवांमुळेही अशा घटना घडल्या. मुस्लीम धर्माचे पवित्र स्थळ असलेल्या मक्का-मदिना येथेही सैतानाला दगड मारण्याच्या प्रथेवेळी चेंगराचेंगरी होऊन लोकांचा मृत्यू झाला. उत्तर टांझानियात एका चर्च सेवेदरम्यान चेंगराचेंगरीत २०२० साली वीस लोक दगावले. एका उपदेशकाने पवित्र तेल असल्याचे सांगत ते जमिनीवर ओतले. ते घेण्यासाठी गर्दी उसळली व चेंगराचेंगरी झाली. या घटनांनी धर्मांच्या सीमा ओलांडल्या आहेत. गर्दी, गैरव्यवस्थापन, अफवा, अंधश्रद्धा, चेंगराचेंगरी या सर्वधर्मीय बाबी आहेत. त्यावर विशिष्ट धर्माचा शिक्का नको.

केवळ गर्दीमुळे व चेंगराचेंगरीमुळेच घटना घडतात, असेही नव्हे. शासनाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ कार्यक्रमात उष्माघाताने लोक दगावल्याचा इतिहास आहे. चेंगरांचेंगरीतील मृत्यू बहुतेक वेळा सामान्य माणसांच्या वाट्याला येतात. व्हीआयपी, बाबा, धर्मगुरू कधीही अशा गर्दीत नसतात. त्यांचे मार्ग आरक्षित असतात. आपले देवही नेमके अशा जागांवर विराजमान आहेत की जेथे डोंगरदऱ्या, अरुंद रस्ते आहेत. शहरांना-गावांना बायपास करणारे ‘बाह्यवळण’मार्ग आले. अनेक गावांनी स्वत:ला उड्डाणपुलांखाली झाकून घेत गर्दीपासून अलग करून घेतले. पण, देवतांना ‘बायपास’ कसे करणार? हा धार्मिक व श्रद्धेचा मामला आहे. ‘गुगल’ आता लोकांना रस्ता दाखवते. एखाद्या गावात सण, उत्सव असेल तर वाहतूक अन्य मार्गाने वळवली जाते. लोकही अशावेळी घराबाहेर पडणे टाळतात. पण धार्मिक स्थळांचे असे नव्हे. वैकुंठ-पुत्रदा एकादशीलाच भाविकांना दर्शन हवे असते.

देव विशिष्ट मुहूर्तालाच भेटतो, ही एक अंधश्रद्धाही आपल्याकडे आहे. परिणामी गर्दी मुहूर्त साधते. गर्दी नियंत्रणासाठी आधुनिक प्रणालीचा वापर करावा याची गरज ना अद्याप देवस्थानांना वाटते, ना सरकारला. ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ नावाची व्यवस्था आली आहे. पंढरपूरच्या वारीचे नियंत्रण करण्यासाठी ‘एआय’चा वापर आता विचाराधीन आहे. मुंबई विद्यापीठाने मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरू केला आहे. हे उपक्रम स्वागतार्हच, पण मुद्दा मानसिकतेचाही आहे. काल-परवा माजी खासदार सुजय विखे यांनी ‘साईदरबारी फुकट भोजन मिळते म्हणून शिर्डीत भिकाऱ्यांची गर्दी उसळली आहे’ असे विधान केले. त्यांच्यावर लागलीच टीका झाली. पण, मोफत अन्नछत्रांऐवजी हा पैसा शिक्षणावर खर्च करायला हवा या त्यांच्या अपेक्षेत गैर काय आहे? प्रबोधनकार ठाकरे म्हणाले होते, ‘हिंदुस्थान दरिद्री झाला, पण देवळांत संपत्ती अपार आहे.

दुष्काळात लोक अन्नान करून मेले, तरी देवळातल्या दगडधोंड्यांना शिरा, केशरीभाताचा त्रिकाळ नैवेद्य अखंड चालूच आहे’. संतांची व ठाकरेंची प्रबोधन परंपरा आजचा महाराष्ट्र व देशही का स्वीकारायला तयार नाही? ‘महाराष्ट्र येथे का थांबतो?’ हा प्रश्न आहेच. आपली मुले कोणत्या इयत्तेत शिकतात हे ठाऊक नसलेले लोक तिथी, मुहूर्त मात्र पाठ करून ठेवतात. तात्पर्य एकच, गर्दीचे नियंत्रण सरकारने करायला हवेच. पण, समाजाने मनाचे नियंत्रण करावे.

प्रदूषण टाळण्यासाठी व इंधन बचतीसाठी सार्वजनिक वाहनांचा पर्याय आला, तसे धार्मिक स्थळी पाळल्या जाणाऱ्या सोहळ्यांना, मुहूर्तांनाही पर्याय हवेत. देवाची शेजारती, धुपारती सुरू आहे म्हणून दर्शन बंद. पूजा सुरू आहे म्हणून मंदिर बंद. अशा अनेक प्रथा आहेत. या प्रथांमुळे भक्त ताटकळणारच. देवदर्शनाचे असे ‘शटडाउन’ चालूच राहिले तर रांगा, गर्दी वाढणारच. आपत्ती व्यवस्थापनाची सुरुवात या धार्मिक बाबींपासून करायला हवी. म्हणून देवाच्या दारी प्रबोधन हवे, मृत्यू नकोत.

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट