शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

Independence Day : स्वातंत्र्य; अपेक्षा व कर्तव्य!

By किरण अग्रवाल | Updated: August 15, 2019 08:52 IST

स्वातंत्र्याने लाभलेल्या लोकशाही व्यवस्थेत आज आपण जो मोकळा श्वास घेऊ शकतो त्यामागे अनेकांचे बलिदान व त्याग आहेत.

किरण अग्रवाल

स्वातंत्र्य दिनानिमित्त आज जिकडे तिकडे स्वातंत्र्याचा जयघोष होणे स्वाभाविक आहे. पारतंत्र्यातून मुक्ततेसाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या शौर्याला, समर्पणाला सलाम करीत हे स्वातंत्र्य चिरायू राखण्यासाठी शपथबद्ध होण्याचा हा दिवस; पण तो साजरा करताना अजूनही ज्या घटकापर्यंत या स्वातंत्र्याची फळे पोहोचवता आली नाहीत, त्यांचा विचार दुर्लक्षिता येऊ नये. विशेषत: स्वातंत्र्य उपभोगताना कर्तव्याचा जो विसर पडताना दिसून येतो, त्याबाबत गांभीर्याने जनजागरण होणे गरजेचे ठरावे, अर्थात कायद्याने ते होणारे नाही; त्यासाठी मानसिक परिवर्तन घडून येणे व सामाजिकतेच्या दृष्टीने संवेदनशीलतेने मनाची कवाडे उघडली जाणे अपेक्षित आहे.

स्वातंत्र्याने लाभलेल्या लोकशाही व्यवस्थेत आज आपण जो मोकळा श्वास घेऊ शकतो त्यामागे अनेकांचे बलिदान व त्याग आहेत. 73 वर्षांच्या या वाटचालीत विविध पातळ्यांवर प्रगतीचे नव-नवे टप्पे गाठले गेलेत, त्यासाठी त्या त्यावेळची सरकारे व त्यातील नेतृत्वकर्त्यांची दूरदृष्टी-ध्येय, धोरणे कारणीभूत ठरली आहेत हे कुणालाही नाकारता येऊ नये. आज आपण चंद्रावर पाऊल ठेवण्यापर्यंत प्रगतीचा टप्पा गाठला आहे. ‘मेट्रो’च्या वेगाने हे मार्गक्रमण सुरू असून, दूरसंचार क्रांतीने हर एक व्यक्तीच्या हाती जणू जग एकवटले आहे. त्यातून प्रत्येक जण ‘सोशल’ झाला आहे. पण, या सोशल नेटवर्किंगच्या जंजाळात अडकून त्यावर उमटणाऱ्या अंगठ्यांवर तो समाधान मानू लागल्याने खरी सामाजिकता काहीशी दूर होत चालल्याचेच दिसून यावे. तंत्रज्ञानातील प्रगतीने मनुष्याला जवळ आणले हे खरे; पण त्यातल्या गुरफटलेपणातून तो जवळ येऊनही दूरच राहत असतो. स्वातंत्र्यातले हे असले ‘सोशल’ शहाणपण आपल्याला कोठे नेणार हा यातील खरा प्रश्न आहे.

स्वातंत्र्याने सर्वांना समान हक्क दिले आहेत; पण अद्यापही अनेक ठिकाणी अनेकांच्या वाट्याला सोयी-सुविधांची समानता लाभलेली नाही. अलीकडचेच उदाहरण घ्या, पूरपाण्याने होता नव्हता तो संसार सोडून विस्थापित व्हावे लागलेले कोणते स्वातंत्र्य अनुभवत असतील? गाव-खेड्यापर्यंत मोबाइल पोहोचला. संवादाची साधने सशक्त बनली; परंतु नदीच्या पुरामुळे संपर्काची, दळणवळणाची साधनेच खुंटलेल्यांचे काय? पुराच्या पाण्यात जीव मुठीत घेऊन नदी ओलांडणारे शाळकरी विद्यार्थी जागोजागी पाहावयास मिळतात, तेव्हा स्वातंत्र्याचा सूर्य त्यांच्या माथ्यावर उगवलाच नाही की काय, असा प्रश्न पडून गेल्याखेरीज राहात नाही. आदिवासी वाड्या-पाड्यावर अत्यवस्थ झालेल्या रुग्णाला आजही झोळी किंवा डोली करून लगतच्या गावात न्यावे लागते यावरून प्रसूतीसाठी अडलेल्या माता-भगिनींचे काय हाल होत असावेत याची कल्पना करता यावी. अनेक मुलांच्या डोक्यावर वीटभट्टीवरील विटांच्या पाट्या किंवा त्यांच्या हातातले टपरीवरचे चहाचे ग्लास पाहता, शिक्षणाचा हक्क त्यांना कसा मिळवता येत असेल? शाळेतल्या त्यांच्या खिचडीत कधी कधी जीव-जंतू शिजताना आढळून येतात. हे अपवाद या प्रकारात मोडणारे असले तरी स्वातंत्र्याला इतका कालखंड लोटूनही जर मूलभूत बाबींत अनास्था व उपेक्षाच दिसून येणार असेल तर प्रश्न उपस्थित होणारच.

महत्त्वाचे म्हणजे, स्वराज्याकडून सुराज्याकडे वाटचाल करताना आपण स्वातंत्र्य पुरेपूर उपभोगतो; परंतु कर्तव्याचा तितकासा विचारच करताना दिसत नाहीत. परदेशातील स्वच्छता अगर शिस्तीचे तोंडभरून गोडवे गाताना आपल्याकडे मात्र साधा वाहतुकीचा नियम पाळून सिग्नल न तोडण्याचे भान बाळगले जात नाही. रस्त्याने चालताना कुठेही व कसाही कचरा फेकून देण्यात कुणालाही वावगे वाटत नाही. पूरपाण्याने अनेकांचे संसार वाहून जात असताना अनेकजण पुरासोबतचे ‘सेल्फी’ घेण्यात दंग दिसतात, अखेर पोलिसांना जमावबंदी घोषित करून कायद्याचा बडगा उगारण्याची वेळ येते. म्हणजे, आपल्याला कर्तव्य कळत नाही, दंडुक्याचीच भाषा कळते. तेव्हा स्वातंत्र्यातल्या या स्वैरपणाला आटोक्यात आणणे म्हणूनच गरजेचे आहे. त्यासाठी मानसिक मशागतच कामी येणारी आहे. स्वातंत्र्यदिन साजरा करीत असताना यंत्रणांकडूनच्या अपेक्षा घडीभर बाजूस ठेवून, व्यक्तिगत पातळीवर आपल्याला काय देता येईल व कसे वागता येईल जेणेकरून देशाच्या उन्नयनात, प्रगतीत व सुराज्याला मूर्त रूप देण्यात ते उपयोगी ठरेल याचा विचारही प्राधान्याचा ठरावा इतकेच यानिमित्त.   

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनIndiaभारतfloodपूर