शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

Independence Day : स्वातंत्र्य; अपेक्षा व कर्तव्य!

By किरण अग्रवाल | Updated: August 15, 2019 08:52 IST

स्वातंत्र्याने लाभलेल्या लोकशाही व्यवस्थेत आज आपण जो मोकळा श्वास घेऊ शकतो त्यामागे अनेकांचे बलिदान व त्याग आहेत.

किरण अग्रवाल

स्वातंत्र्य दिनानिमित्त आज जिकडे तिकडे स्वातंत्र्याचा जयघोष होणे स्वाभाविक आहे. पारतंत्र्यातून मुक्ततेसाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या शौर्याला, समर्पणाला सलाम करीत हे स्वातंत्र्य चिरायू राखण्यासाठी शपथबद्ध होण्याचा हा दिवस; पण तो साजरा करताना अजूनही ज्या घटकापर्यंत या स्वातंत्र्याची फळे पोहोचवता आली नाहीत, त्यांचा विचार दुर्लक्षिता येऊ नये. विशेषत: स्वातंत्र्य उपभोगताना कर्तव्याचा जो विसर पडताना दिसून येतो, त्याबाबत गांभीर्याने जनजागरण होणे गरजेचे ठरावे, अर्थात कायद्याने ते होणारे नाही; त्यासाठी मानसिक परिवर्तन घडून येणे व सामाजिकतेच्या दृष्टीने संवेदनशीलतेने मनाची कवाडे उघडली जाणे अपेक्षित आहे.

स्वातंत्र्याने लाभलेल्या लोकशाही व्यवस्थेत आज आपण जो मोकळा श्वास घेऊ शकतो त्यामागे अनेकांचे बलिदान व त्याग आहेत. 73 वर्षांच्या या वाटचालीत विविध पातळ्यांवर प्रगतीचे नव-नवे टप्पे गाठले गेलेत, त्यासाठी त्या त्यावेळची सरकारे व त्यातील नेतृत्वकर्त्यांची दूरदृष्टी-ध्येय, धोरणे कारणीभूत ठरली आहेत हे कुणालाही नाकारता येऊ नये. आज आपण चंद्रावर पाऊल ठेवण्यापर्यंत प्रगतीचा टप्पा गाठला आहे. ‘मेट्रो’च्या वेगाने हे मार्गक्रमण सुरू असून, दूरसंचार क्रांतीने हर एक व्यक्तीच्या हाती जणू जग एकवटले आहे. त्यातून प्रत्येक जण ‘सोशल’ झाला आहे. पण, या सोशल नेटवर्किंगच्या जंजाळात अडकून त्यावर उमटणाऱ्या अंगठ्यांवर तो समाधान मानू लागल्याने खरी सामाजिकता काहीशी दूर होत चालल्याचेच दिसून यावे. तंत्रज्ञानातील प्रगतीने मनुष्याला जवळ आणले हे खरे; पण त्यातल्या गुरफटलेपणातून तो जवळ येऊनही दूरच राहत असतो. स्वातंत्र्यातले हे असले ‘सोशल’ शहाणपण आपल्याला कोठे नेणार हा यातील खरा प्रश्न आहे.

स्वातंत्र्याने सर्वांना समान हक्क दिले आहेत; पण अद्यापही अनेक ठिकाणी अनेकांच्या वाट्याला सोयी-सुविधांची समानता लाभलेली नाही. अलीकडचेच उदाहरण घ्या, पूरपाण्याने होता नव्हता तो संसार सोडून विस्थापित व्हावे लागलेले कोणते स्वातंत्र्य अनुभवत असतील? गाव-खेड्यापर्यंत मोबाइल पोहोचला. संवादाची साधने सशक्त बनली; परंतु नदीच्या पुरामुळे संपर्काची, दळणवळणाची साधनेच खुंटलेल्यांचे काय? पुराच्या पाण्यात जीव मुठीत घेऊन नदी ओलांडणारे शाळकरी विद्यार्थी जागोजागी पाहावयास मिळतात, तेव्हा स्वातंत्र्याचा सूर्य त्यांच्या माथ्यावर उगवलाच नाही की काय, असा प्रश्न पडून गेल्याखेरीज राहात नाही. आदिवासी वाड्या-पाड्यावर अत्यवस्थ झालेल्या रुग्णाला आजही झोळी किंवा डोली करून लगतच्या गावात न्यावे लागते यावरून प्रसूतीसाठी अडलेल्या माता-भगिनींचे काय हाल होत असावेत याची कल्पना करता यावी. अनेक मुलांच्या डोक्यावर वीटभट्टीवरील विटांच्या पाट्या किंवा त्यांच्या हातातले टपरीवरचे चहाचे ग्लास पाहता, शिक्षणाचा हक्क त्यांना कसा मिळवता येत असेल? शाळेतल्या त्यांच्या खिचडीत कधी कधी जीव-जंतू शिजताना आढळून येतात. हे अपवाद या प्रकारात मोडणारे असले तरी स्वातंत्र्याला इतका कालखंड लोटूनही जर मूलभूत बाबींत अनास्था व उपेक्षाच दिसून येणार असेल तर प्रश्न उपस्थित होणारच.

महत्त्वाचे म्हणजे, स्वराज्याकडून सुराज्याकडे वाटचाल करताना आपण स्वातंत्र्य पुरेपूर उपभोगतो; परंतु कर्तव्याचा तितकासा विचारच करताना दिसत नाहीत. परदेशातील स्वच्छता अगर शिस्तीचे तोंडभरून गोडवे गाताना आपल्याकडे मात्र साधा वाहतुकीचा नियम पाळून सिग्नल न तोडण्याचे भान बाळगले जात नाही. रस्त्याने चालताना कुठेही व कसाही कचरा फेकून देण्यात कुणालाही वावगे वाटत नाही. पूरपाण्याने अनेकांचे संसार वाहून जात असताना अनेकजण पुरासोबतचे ‘सेल्फी’ घेण्यात दंग दिसतात, अखेर पोलिसांना जमावबंदी घोषित करून कायद्याचा बडगा उगारण्याची वेळ येते. म्हणजे, आपल्याला कर्तव्य कळत नाही, दंडुक्याचीच भाषा कळते. तेव्हा स्वातंत्र्यातल्या या स्वैरपणाला आटोक्यात आणणे म्हणूनच गरजेचे आहे. त्यासाठी मानसिक मशागतच कामी येणारी आहे. स्वातंत्र्यदिन साजरा करीत असताना यंत्रणांकडूनच्या अपेक्षा घडीभर बाजूस ठेवून, व्यक्तिगत पातळीवर आपल्याला काय देता येईल व कसे वागता येईल जेणेकरून देशाच्या उन्नयनात, प्रगतीत व सुराज्याला मूर्त रूप देण्यात ते उपयोगी ठरेल याचा विचारही प्राधान्याचा ठरावा इतकेच यानिमित्त.   

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनIndiaभारतfloodपूर