शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

पर्रीकरांचे आरोग्य आणि न्यायालय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 11:44 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजाराचा तपशील मागणारा अर्ज राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगून उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळून लावला.

राजू नायक 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजाराचा तपशील मागणारा अर्ज राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगून उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळून लावला. राजकीय कार्यकर्ते ट्रोजन डिमेलो यांनी तो अर्ज गुदरला होता. त्यामागे भाजपाला खजील करणे आणि शक्य झाले तर मुख्यमंत्र्यांच्या आजाराचे गांभीर्य जगापुढे आणणे हा त्यांचा हेतू होता, यात तथ्य आहे. 

मुख्यमंत्री स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त आहेत. गेले सात महिने त्यांनी प्रथम मुंबईत व त्यानंतर अमेरिकेत उपचार घेतले. माहिती मिळते त्याप्रमाणे त्यांच्या केमोथेरपी बंद आहेत. उपचार थांबलेत. आता ते ‘पेलेटिव्ह केअर’वर आहेत. त्यांचा आजार खूपच बळावला आहे आणि त्यावर आता औषध नाही म्हणणारा एक वर्ग आहे तर दुसरा त्यांचा चाहता वर्ग मानतो की ते जिद्दीने, हिंमतीने आपल्या आजारावर मात करतील. एक गोष्ट खरी आहे की खूप टीका झाल्यानंतर, विशेषत: काँग्रेसने जनआक्रोश मेळावे सुरू केल्यानंतर मुख्यमंत्री ‘विजनवासातून’ बाहेर आले. त्यांनी मांडवी पुलाच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली व गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठकही घेतली. 

परंतु प्रश्न आहे तो ते असे किती सक्रिय राहू शकतील? एक प्रश्न त्यांच्या आरोग्याचा आहेच. ज्या पद्धतीने नाकात टय़ूब घातलेल्या अवस्थेत ते मांडवी पुलावर गेले होते, ते अनेकांना खटकले. राष्ट्रीय पातळीवर अनेकांनी त्यांची दखल घेतली. लोक म्हणाले, लोकांना दाखवण्यासाठी अशा उचापती करण्याची आवश्यकता नाही. मुख्यमंत्र्यांनी आराम करावा. 

आरामच नाही तर त्यांनी राजीनामा द्यावा व नव्या आपल्या पसंतीचा नेता निवडावा अशी मागणी तर सतत होत आहे. मुख्यमंत्र्यांकडे २६ खाती आहेत. त्यांचेही वाटप, शब्द देऊनही त्यांनी करण्याचे टाळले आहे. 

सरकार निष्क्रिय झाल्याची टीका तर सतत होते. त्यावर मात करण्यासाठी भाजपात काही संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. मुख्य सचिवही बदलण्यात आले आहेत. मुदत संपूनही मुख्य सचिव धमेंद्र शर्मा यांना गोव्यातच ठेवण्यात आले होते. 

उच्च न्यायालयाने पर्रीकरांच्या आजारासंदर्भातील ‘कुतूहल’ राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगून तो वाद निकाली काढला असला तरी पर्रीकरांबद्दल लोकांमध्ये ज्या भावना आहेत त्यांना तडा जातो आहे यात तथ्य आहे. पश्चिमी जगतात नेते मंडळींनी आपल्या आरोग्यासंदर्भात लोकांना विश्वासात घ्यावे, असे अपेक्षित असते. आपल्या देशात मात्र अशा गोष्टी लपविण्याकडे कल असतो. ते सात महिने आजारी असूनही अधिकृतपणो एका मंत्र्याने त्याचा तपशील केवळ दीड महिन्यांपूर्वीच जाहीर केला. तोही अनावधानाने. अधिकृत माहिती बाहेर येत नसल्यामुळे समाज माध्यमांमध्ये वेगवेगळे तर्क लढविले जातात व अफवाही पसरतात. त्यामुळे न्यायालयाने जरी अर्ज निकाली काढला तरी सरकारनेच जर अधिकृतपणे सारे तपशील जाहीर केले असते तर ते योग्य ठरले असते. लोकांनी पर्रीकरांवर खूप प्रेम केले. पर्रीकरांची बुद्धीमत्ता, प्रामाणिकपणा, त्याग याची चर्चा सतत होते. अशा लोकांना आपल्या लाडक्या नेत्याची हालहवाल माहीत असणे चूक नाही. तेवढा प्रगल्भपणा सरकारात व भाजपात असावा अशी अपेक्षा आहे. दुर्दैवाने भाजपाने ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले. त्यामुळे जनमानसात त्या पक्षाची प्रतिमा कमालीची काळवंडली आहे. 

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत.)

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाBJPभाजपा