शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

‘सहीपुरत्या सरपंच’ महिला पूर्वी होत्या, आता दबाव झुगारता येतो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 07:39 IST

सर्वपक्षीय स्त्री खासदारांशी केलेल्या संवादाची मालिका : नेत्री! या प्रकल्पात नंदुरबार येथील खासदार हिना गावित यांच्याशी झालेल्या गप्पांचा सारांश.

शायना एन. सी. भाजप नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या

सोळाव्या लोकसभेत तुम्ही सर्वात कमी वयाच्या खासदार होतात. एकीकडे एमबीबीएस, एमडी आणि नंतर एलएलबी असे शिक्षण आणि दुसरीकडे राजकारण; हे कसे जमवले?

मी आदिवासी भागातली आहे. नंदुरबारमध्ये माझे शिक्षण झाले. माझ्या मतदारसंघातले आरोग्याचे अनेक प्रश्न मी लहानपणापासून पाहत आले आणि तेव्हाच ठरवले की, आपण डॉक्टर होऊन इथे काम करायचे. या भागात आरोग्य शिबिरे घेत असताना अन्य प्रश्नही मला समजत गेले, केवळ डॉक्टर म्हणून मी ते  सोडवू शकणार नाही, हे लक्षात आल्यावर मी राजकारणात यायचे ठरवले, जाणीवपूर्वक राजकारणात आले आणि निवडणूक लढवली.

संसदेत तुम्ही केलेल्या भाषणाचे कौतुक झाले होते. त्या अनुभवाबद्दल काय सांगाल?

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना मी एक अनुभव सांगितला होता. नंदुरबार जिल्ह्यातल्या आरोग्य शिबिरात एका वृद्ध व्यक्तीवर आम्ही शस्त्रक्रिया केली. ते मला म्हणाले, ‘या मोफत शस्त्रक्रिया शिबिरामुळे माझ्या दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाली; आता तुम्ही माझ्या घरी या.’ शिबिर संपल्यावर माझ्या गाडीतून त्यांच्या पाड्याकडे त्यांना घेऊन मी निघाले. एका ठिकाणी त्यांनी गाडी थांबवायला सांगितले. म्हणाले, ‘गाव आले!’- पण तिथे तर काहीच नव्हते. ते म्हणाले, ‘तुम्ही माझ्याबरोबर चला, मी दाखवतो तुम्हाला’- मग काही अंतर गेल्यावर त्यांनी दरीत असलेले त्यांचे गाव मला दाखवले. तिथे जायला रस्ताच नव्हता! त्यानंतर मग रस्त्याचे काम सुरू झाले!

आदिवासी क्षेत्रातील महिलांना कुपोषणाचा सामना करावा लागतो. इतक्या वर्षांमध्ये आपण हा प्रश्न सोडवू शकलेलो नाही. त्याबाबत तुमचे अनुभव, निरीक्षणे आणि मत काय आहे?

नंदुरबार जिल्ह्याचे नाव घेतल्यावर कुपोषणाचा प्रश्न समोर येतो. मी डॉक्टर आणि खासदार या नात्याने असे ठरवले होते की, आपण आरोग्य आणि त्यातही कुपोषणाला प्राधान्य दिले पाहिजे. कुपोषण हटविण्यासाठी भारत सरकारच्या  योजना लोकांपर्यंत न्यायच्या होत्या. त्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. याबाबत आदिवासी भागात राहणाऱ्या लोकांमध्ये जागृती करणे फार महत्त्वाचे आहे. आदिवासी क्षेत्रातील महिला गर्भवती असताना नियमित चाचण्या करून घेत नाहीत. हिमोग्लोबिन तपासले जात नाही. अनेकदा बाळंतपणही घरीच होते. यात बालक कुपोषित असेल तर लक्षात येत नाही. त्याची प्रकृती गंभीर झाल्यावर कळते.

महिला बालविकास खात्याच्या योजना अधिकाधिक महिला आणि त्यांच्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचे काम महत्त्वाचे आहे. त्या दिशेने बरेच प्रयत्न झाले. परिणामी पाचव्या कुटुंबकल्याण आरोग्य सर्वेक्षणात नंदुरबारची कामगिरी सर्वात चांगली झाल्याचे नोंदले गेले. कुपोषणावर देशातील उत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सध्या नंदुरबारचा समावेश होतो.

तुम्ही तरुण आहात. तुमच्याकडून प्रेरणा घेऊन ज्या तरुणींना राजकारणात यावेसे वाटत असेल, त्यांना काय सांगाल?

जास्तीत जास्त महिलांनी या क्षेत्रात आले पाहिजे. महिला अत्यंत प्रामाणिकपणे प्रत्येक काम सर्वोत्तम करू शकतात म्हणून त्यांनी राजकारणात येण्याची खरी गरज आहे. ग्रामपंचायतीपासून  लोकसभेपर्यंत सर्व स्तरांवर महिलांचा सहभाग बरेच महत्त्वाचे बदल घडवून आणू शकेल. सध्या राजकारणात असलेल्या महिलांनीच ही जबाबदारी उचलली पाहिजे आणि ही प्रक्रिया सुरू झालेली मी पाहते आहे. पूर्वी महिला सरपंच व्हायची, पण सहीपुरती... आता शिकलेल्या महिला ही परिस्थिती जिद्दीने बदलत आहेत!