शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

अग्रलेख : पगारवाढ आणि काही प्रश्न...; वीज कंपन्यांवर पडणारा कोटींचा बोजा चिंतेत टाकणारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 07:36 IST

निवडणुकीत मते हवीत म्हणून मतदारांना इतके सारे देता आहात तर आमच्या पगाराचे काय, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित होणेही स्वाभाविक आहे.

महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यांमधील कर्मचारी, अधिकाऱ्यांना मूळ वेतनात साधारणपणे १९ टक्के, तर सर्व प्रकारच्या भत्त्यांमध्ये २५ टक्के वाढीची गोड भेट दसरा व दिवाळीआधीच राज्य सरकारने दिली आहे. केंद्र व राज्य सरकारी कर्मचान्यांच्या तुलनेत कमी पगारावर काम करणारे अभियंते तसेच अन्य तांत्रिक व अतांत्रिक कर्मचाऱ्यांच्या पदरात भरघोस असे काही टाकण्याची संधी यानिमित्ताने सरकारने साधली आहे. या पगारवाढीचे महत्त्व यासाठीही अधिक आहे की, विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना महायुती सरकारने विविध घोषणांची सुरुवातच मुळी कृषिपंपांच्या बिलांच्या थकबाकीला माफी आणि शेतकऱ्यांना मोफत विजेच्या रूपाने केली. त्या निर्णयामुळे वीज कंपन्यांवर पडणारा अंदाजे पंधरा हजार कोटींचा बोजा साहजिकच वीज तयार करणारे, तिचे वहन करणारे व ती प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचविणाऱ्यांना चिंतेत टाकणारा आहे. 

निवडणुकीत मते हवीत म्हणून मतदारांना इतके सारे देता आहात तर आमच्या पगाराचे काय, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित होणेही स्वाभाविक आहे. याशिवाय, प्रीपेड मीटरचे वादंग अजून पूर्णपणे शमलेले नाही. अशावेळी, पगारवाढीचा पंधराशे कोटींचा बोजा सहन करण्याची तयारी राज्य सरकारने दाखविली आणि तिन्ही कंपन्यांच्या मिळून ६८ हजार ४५ अधिकारी- कर्मचाऱ्यांना पगारवाढीची भेट दिली. विशेषतः महावितरण कंपनीत अधिक जोखमीचे काम तुलनेने कमी पगारावर करणारे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर आहेत. तांत्रिक सहायक व लाइनमन यांसारख्या कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार तुलनेने कमी आहे. त्यामुळे त्यांना वाढीव पगार मिळाला तर कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. परीविक्षाधीन कर्मचाऱ्यांना सरसकट पाच हजार रुपये वाढ तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांना मिळणारा पाचशे रुपये भत्ता आता एक हजार रुपये करण्यात आला आहे. परंतु, महावितरणमध्ये साधारणपणे चार हजार आणि अन्य दोन कंपन्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार असे साधारणपणे आठ हजार कर्मचारी या कंपन्यांनी आउटसोर्स केलेले आहेत आणि हे इतक्या मोठ्या संख्येतील कर्मचारी अंदाजे आठ ते वीस हजार रुपये अशा अल्प मोबदल्यात नोकऱ्या करतात. त्यांचा मात्र सरकारने विचार केलेला नाही. 

असो. कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या पगारावर होणारा खर्च अखेर ग्राहकांच्याच खिशातून निघणार असल्याने सरकारने आता काही मुद्द्यांवर वीज कंपन्यांना जबाबदारीची जाणीव करून दिली तर बरे होईल वीजहानीच्या नावाने लपवली जाणारी वीजचोरी रोखण्यात महावितरणला आलेले घोर अपयश, वीज नियामक आयोगाने वारंवार सूचना करूनदेखील आस्थापना खर्च कमी करण्यात अपयशी ठरलेला अधिकारीवर्ग आणि नियम व कायद्यांमधील पळवाटा शोधून ग्राहकांवर लादलेले विजेचे वाढीव दर या मुद्द्यांवर वीज कंपन्यांच्या कर्त्याधर्त्यांना कधीतरी खडसावून विचारणा करणे गरजेचे आहे. यापैकी महावितरण कंपनीचा संबंध थेट ग्राहकांशी येतो आणि याच कंपनीच्या धोरणामुळे चढ्या दराने वीज खरेदी करण्याची वेळ ग्राहकांवर येते. देशातील अन्य राज्ये आणि महाराष्ट्रातील वीजदरांत मोठी तफावत आहे. महाराष्ट्रातील विजेचे काही ग्राहकांना लागू असलेले प्रतियुनिट दर अन्य राज्यांच्या तुलनेत अगदी तिपटीहून अधिक आहेत. त्याशिवाय इतर वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून ग्राहकांच्या खिशातून अधिक पैसा काढला जातो. महावितरण कंपनीने अलीकडे ग्राहकांना छुप्या दरवाढीचा दणका देताना केलेली चलाखी याबाबत वैशिष्ट्यपूर्ण आहे. 

युनिटचे दर वाढणार नाहीत, त्या मुद्द्यांवर आरडाओरड होणार नाही, याची काळजी घेताना फिक्स चार्जेस वाढविण्याचा तसेच इंधन समायोजन शुल्काद्वारे बिले वाढविण्याचा आडवळणाचा रस्ता महावितरणने शोधला आहे. हे इंधन समायोजन शुल्क आधीच युनिटच्या दराशी जोडलेले असताना नियामक आयोगाच्या निर्देशातील त्रुटीच्या आधारे ते सुरू ठेवण्यात आले आहे. या दोन कारणांनी बंद घरातील विजेचेही दरमहा दीडशे-दोनशे रुपये शुल्क भरण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. एकीकडे अव्वाच्या सव्वा दराने वीजबिलांची वसुली तर दुसरीकडे ग्राहकांना सेवा देण्यात कुचराई, असा दुहेरी मारा केला जातो. महावितरणने नुकत्याच काढलेल्या एका परिपत्रकाने वीजपुरवठा खंडित झाला तर थेट अभियंत्यांना फोन न करण्याची सूचना ग्राहकांना केली आहे. विजेसंदर्भात तक्रारींसाठी देण्यात आलेला टोल-फ्री क्रमांक बंद असतो, हे वास्तव नजरेआड करून अभियंते अन्य कामांत व्यस्त असतात, त्यांना ग्राहकांनी थेट त्रास देऊ नये, असे महावितरणचे म्हणणे आहे. या व अशा काही मुद्द्यांवर ग्राहकांचाही सरकारने विचार केला तर त्यांना पगारवाढीची भेट मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या आनंदात सहभागी होता येईल. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रmahavitaranमहावितरणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसelectricityवीज