शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
2
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
3
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
4
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
5
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
6
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
7
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
8
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
9
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
10
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
11
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
12
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
13
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
14
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
15
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
16
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
17
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
18
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
19
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
20
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणाची 'कडू' गोळी; लढवय्या नेता राजकारणी बनल्याने सत्ताधाऱ्यांकडून हाताळण्याचे डावपेच बदलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 08:36 IST

एखादा आंदोलक नेता असा राजकारणी बनतो तेव्हा सर्वाधिक नुकसान त्या आंदोलनाचे, चळवळीचे होते... आणि अशा नेत्यांना हाताळणे सत्ताधाऱ्यांना अगदीच सोपे असते.

अतिवृष्टीचा तडाखा, उद्ध्वस्त शेती, कोसळलेले बाजारभाव आणि सरकारी उदासीनता अशा दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीची आत्यंतिक गरज आहे. सरकारी व खासगी कर्ज फेडणे त्याच्यासाठी जिकिरीचे आहे. या विळख्यातून त्याची सुटका व्हायलाच हवी. कर्जमाफीचे आश्वासन देऊनच सत्तेवर आलेल्या राज्यातील महायुती सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. म्हणूनच सरकारला त्या आश्वासनाची सतत आठवण करून दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर, प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते, माजी राज्यमंत्री आणि महत्त्वाचे म्हणजे लढवय्ये नेते ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी महाएल्गार पुकारला. विदर्भाच्या सगळ्या जिल्ह्यांमधून आणि राज्याच्या काही भागातून आलेल्या हजारो शेतकऱ्यांनी नागपूर-हैदराबाद महामार्ग रोखला. राज्याच्या उपराजधानीचे जनजीवन तीन दिवस विस्कळीत झाले. स्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असतानाच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतःहून नागरिकांच्या अडचणींची दखल घेतली आणि राष्ट्रीय महामार्ग मोकळा करण्याचे आदेश आंदोलकांना दिले. 

उच्च न्यायालयाच्या या सक्रियतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शेतकऱ्यांच्या दुरवस्थेवरही अशी सक्रियता दाखविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हा आक्षेप व अपेक्षा साहजिक असली तरी न्यायालयाचा आदेश बेकायदेशीर नाही आणि अशी सुमोटो दखल घेण्याचा अधिकार न्यायालयाला आहेच. आता कर्जमाफीच्या मागणीबाबत बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेव जानकर, अजित नवले वगैरे शेतकरी नेत्यांसोबत सरकार चर्चा करीत आहे. यापैकी बहुतेक नेते कधी ना कधी महायुतीत राहिले, हे विशेष. असो. यातून शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा मिळेल, अशी आशा आहे. बच्चू कडू यांचे हे काही पहिले आंदोलन नाही. गेली पंचवीस-तीस वर्षे ते शेतकरी, कष्टकरी, विशेषतः दिव्यांग अशा समाजातल्या दुबळ्या वर्गासाठी सतत आक्रमक आंदोलने करीत आले आहेत. या गरजू वर्गासाठी रस्त्यावर उतरून ते सत्तेला प्रश्न विचारत आले आणि दरवेळी सत्ताधाऱ्यांना झुकवित गेले. किंबहुना त्यांनी त्यांचे विधिमंडळातील सदस्यत्वही आंदोलनांसारखेच वापरले. सर्वसामान्यांशी नाळ जुळलेला चळवळ्या नेता अशीच त्यांची प्रतिमा राहिली. अर्थात, या प्रतिमेवर आता काही चरे पडले आहेत. त्यांच्या आधीच्या व आताच्या आंदोलनात मूलभूत फरक हा की, कधीकाळचे आंदोलक बच्चू कडू आता ठळकपणे राजकारणी बनले आहेत.

बच्चू कडू यांच्या अमरावती जिल्ह्यातील अचलपूर-चांदूरबाजारमधील आमदारकीच्या चारपैकी तीन टर्म राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते. याच काळात आंदोलक म्हणून त्यांची प्रतिमा बहरली. महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्रिपद आणि नंतर शिवसेना फुटीवेळी आमदार घेऊन गुवाहाटीला पोहोचलेल्या एकनाथ शिंदे यांना साथ, त्या बंडात सहभागाने बच्चू कडू यांच्या राजकारणाला निर्णायक वळण दिले. त्यांचे मंत्रिपद गेले. शेजारच्या मेळघाटातील प्रहार पक्षाचा आमदारही सोबत राहिला नाही. विधानसभेला भाजप उमेदवाराकडून पराभव झाला. महत्त्वाचे म्हणजे, असा एखादा आंदोलक नेता असा राजकारणी बनतो तेव्हा सर्वाधिक नुकसान त्या आंदोलनाचे, चळवळीचे होते... आणि अशा नेत्यांना हाताळणे सत्ताधाऱ्यांना अगदीच सोपे असते. कधीकाळी आर. आर. पाटील यांच्यासारखे नेते बच्चू कडू यांच्या नाकदुऱ्या काढण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढत होते आणि आता स्वतःचे शहर वेठीस धरले जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे त्यांना भेटायलाही गेले नाहीत. पंकज भोयर व आशिष जयस्वाल या दोन राज्यमंत्र्यांवर कडू यांची बोळवण झाली, हा फरक सहज जाणवणारा आहे.

राजकारणी आंदोलक हाताळण्याचे हे सत्ताधाऱ्यांचे कौशल्य आजचे नाही. शेतकरी आंदोलनांचा मोठा इतिहास असलेल्या विदर्भाला शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेची याच कारणाने झालेली वाताहत अजूनही आठवते. बच्चू कडू यांचे यश हे की, पुलाखालून इतके पाणी वाहून गेल्यानंतरही मोठ्या संख्येने शेतकरी अजूनही त्यांच्या पाठीशी आहेत. परंतु, सरकारला झुकविण्यासाठी तेवढे पुरेसे नाही. आंदोलन गैरराजकीय असेल तर मनोबलाचा रथ जमिनीपासून चार बोटे उंचावर चालत असतो. राजकीय पुनर्वसनाची महत्त्वाकांक्षा, हडेलहप्पी आणि डावपेचांचा स्पर्श आंदोलनाला होतो त्याक्षणी हा रथ जमिनीला टेकतो. शेतकरी महाएल्गाराची गरज खरी आणि हेतू प्रामाणिक असूनदेखील हे सारे बच्चू कडू यांच्यासारख्या जमिनीशी नाळ जुळलेल्या नेत्याला लागू होतेच. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bachchu Kadu's political shift: Farmers' leader turned politician, power dynamics change.

Web Summary : Bachchu Kadu's farmer activism faces challenges as he transitions to politics. His influence wanes, and government tactics shift, impacting farmer support despite genuine concerns.
टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूFarmerशेतकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस