शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

ब्रेक्झिटचा राजकीय अंधार अन् जवळ आलेला सूर्यास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 05:31 IST

जगाच्या राजकारणाला आणि अर्थकारणाला दिशा देणाऱ्या ब्रिटनची अधोगती रोखण्यासाठी आता त्या देशाला आपल्या नीतिमूल्यांच्या फेरतपासणीपासूनच सुरुवात करावी लागेल; अन्यथा सूर्यास्त अटळ आहे.

ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीही मावळत नाही असे म्हटले जायचे त्या ब्रिटनच्या राजकीय आसमंताला व्यापून राहिलेला घनगर्द अंधार २१व्या शतकातील राजकारणातल्या वैचारिक दारिद्र्याकडे बोट दाखवत आहे. सत्ता मिळवण्यासाठी अफलातून कल्पनांचे किडे जनतेच्या डोक्यात सरकवायचे आणि मग त्या कल्पनांना प्रत्यक्षात आणणे शक्य झाले नाही की शेपूट घालून बसायचे हा वैश्विक रोग भारताप्रमाणे ब्रिटनमध्येही फोफावला आहे. त्याच्या प्रसाराचे दर्शन घडले ते याच सप्ताहातल्या ‘ब्रेक्झिट’वरल्या सांसदीय मतप्रदर्शनातून. युरोपियन संघातून ब्रिटनला बाहेर पडायचे आहे. त्यासाठी पंतप्रधान तेरेसा मे यांनी जो करारविषयक प्रस्ताव दिला होता तो त्या देशाच्या संसदने ३९१ विरुद्ध २४१ अशा बहुमताने अव्हेरला. दुसऱ्या दिवशी ब्रिटनने कोणत्याही कराराशिवायच बाहेर पडावे अशा आशयाचा ठराव चर्चेस आला आणि तोही ३२१ विरुद्ध २७८ अशा बहुमताने फेटाळण्यात आला.युरोपियन संघातून बाहेर पडण्यासाठीची अंतिम मुदत या महिन्यात २९ रोजी संपते आहे. जर ब्रिटन कराराशिवायच बाहेर पडला, तर त्याचे गंभीर आर्थिक आणि राजकीय परिणाम संभवतात. आर्थिक परिणाम तर आताच दिसू लागले असून ब्रिटनबाहेर चाललेला गुंतवणुकीचा ओघ दिवसागणिक वाढतच आहे. आता नामुश्की टाळण्यासाठी ब्रिटनचे सरकार युरोपीय संघाकडे कमाल दोन महिन्यांची मुदतवाढ मागू शकते. पण त्या देशाला जे गेल्या अडीच वर्षांत जमले नाही ते पुढील दोन महिन्यांत साध्य होऊ शकेल असे वाटण्यासारखे काहीही घडत नाही. त्यामुळे ब्रेक्झिटची नोंद ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या वैचारिक दिवाळखोरीचा परिपाक अशीच इतिहासाला करावी लागेल.ब्रेक्झिटची कल्पना माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांची. हुजूर पक्षाची पारंपरिक मते राखण्यासाठी त्यांनी शिष्ट ब्रिटिशांना युरोपियन संघातून बाहेर पडण्याचे गाजर दाखवले आणि निवडणुका जिंकल्या. त्यानंतर संघातून बाहेर पडावे का यावर जनमत कौल घेण्यात आला. त्यासाठीचे कोणतेही नियोजन वा नियमन सरकारकडे नव्हते. संपूर्ण देशाला प्रभावित करणाऱ्या विषयावर जेव्हा जनमत कौल घेतात तेव्हा किमान किती मतदान व्हावे, सरशी झालेल्या पक्षाच्या मतानुसार जाण्यासाठी त्याच्या मतांची टक्केवारी किमान किती असावी, हे आधीच निश्चित करायची प्रथा आहे. ब्रेक्झिटच्या कौलात जेमतेम ७८ टक्के ब्रिटिशांनी भाग घेतला आणि युरोपियन संघातून बाहेर निघा म्हणणाऱ्यांची मते ५२ टक्के निघाली. हा निर्णायक कौल असू शकत नाही. पण सत्ताधारी हुजूर पक्षाला ते लोढणे गळ्यात घालूनच दिवस काढावे लागत आहेत. खुद्द त्या पक्षाचे बरेच संसदसदस्य पंतप्रधान मे यांच्या प्रस्तावाच्या विरोधात आहेत. सत्ताधारी पक्षातच किमान तीन प्रबळ मतप्रवाह असून सहमतीची शक्यताही नाही. दुसरीकडे विरोधी मजूर पक्षाची स्थितीही त्याहून वेगळी नाही. त्या पक्षाच्या मतदारांची धारणा ब्रिटनने युरोपियन संघातच राहावे अशी आहे. पण मे यांना प्रखर विरोध केल्यास सरकारपक्षात गोंधळाचे वातावरण निर्माण होऊन त्याचा लाभ उठवत मजूर पक्षाला सत्तेवर येता येईल, हे हेरून मजूर नेते वारे पाहून सूप धरताना दिसत आहेत.नेत्यांची तोंडे एका दिशेने तर समर्थकांची दुसरीकडे, अशी विचित्र परिस्थिती झाल्याने ब्रिटनच्या इतिहासातला अत्यंत कमकुवत विरोधी पक्ष अशी मजूर पक्षाची आणि त्याचे नेते जेरेमी कॉर्बिन यांची अवहेलना होते आहे. कोठे जायचे, कोणत्या दिशेने जायचे आणि काय तयारीने जायचे याचे कोणतेही भान नसलेला ब्रिटन या महिन्याच्या शेवटास किंवा कमाल दोन महिन्यांच्या मुदतवाढीनंतर ब्रेक्झिटच्या खडकावर डोके आपटून घेणार आहे. वैयक्तिक वैराच्या पातळीवर गेलेले राजकीय मतभेद आणि त्या प्रभावामुळे सरळ दोन पक्षांत वाटले गेलेले लोकमत यातून समोर येतो तो एक विघटित व विद्ध समाज. जगाच्या राजकारणाला आणि अर्थकारणाला दिशा देणाऱ्या ब्रिटनची ही अधोगती रोखण्यासाठी आता त्या देशाला आपल्या नीतिमूल्यांच्या फेरतपासणीपासूनच सुरुवात करावी लागेल; अन्यथा सूर्यास्त अटळ आहे.

टॅग्स :Englandइंग्लंडEconomyअर्थव्यवस्था