शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

पर्यावरणस्नेही दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 01:59 IST

दीपोत्सव हा दिव्यांचा, प्रकाशाचा सण. पण यंदाची दिवाळी मात्र दिव्यांच्या झगमगाटापेक्षा फटाक्यांच्या न होणाºया धमाक्यांनीच अधिक गाजणार असे दिसते.

दीपोत्सव हा दिव्यांचा, प्रकाशाचा सण. पण यंदाची दिवाळी मात्र दिव्यांच्या झगमगाटापेक्षा फटाक्यांच्या न होणाºया धमाक्यांनीच अधिक गाजणार असे दिसते. सर्वोच्च न्यायालयाने राजधानी दिल्लीत फटाके विक्रीवर घातलेली बंदी आणि त्यानंतर महाराष्टÑातही निवासी भागात फटाके विकण्यावर निर्बंध आल्याचे कळताच राजकारण तापले आहे. फटाक्यांचे विरोधक आणि समर्थक एकमेकांसमक्ष उभे ठाकले आहेत. काहींनी तर आणखी एक पाऊल पुढे टाकत त्याला धार्मिक रंग देण्याचाही प्रयत्न चालविला आहे. दिवाळीतच फटाकेबंदी का? असा त्यांचा सवाल आहे तर दुसरीकडे पर्यावरणवाद्यांची प्रदूषणमुक्त उत्सवासाठी धडपड सुरु आहे. तसे बघता हे चित्र काही नवे नाही. दरवर्षीच उत्सवांचे दिवस आले की अशा चर्चा उफाळून येत असतात. गणेशोत्सवात डॉल्बी आणि जलप्रदूषणमुक्तीचे ढोल बडविले जातात तर दिवाळीत फटाकेमुक्तीच्या लडी लावल्या जातात आणि एकदाका सण साजरा झाला की सर्वांनाच त्याचा विसर पडतो. सोबतच प्रदूषणासारखा गंभीर मुद्दा ज्यामुळे आज साºया देशाचे आरोग्य धोक्यात आले आहे; हवेत विरून जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार सद्यस्थितीत भारतात वायुप्रदूषणाने दरमिनिटाला दोघांचा मृत्यू होतो. त्यातही महाराष्टÑ हे देशातील सर्वाधिक प्रदूषित राज्य असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. शहरांमधील कचºयांचे ढिगारे वायुबॉम्बच्या रूपात लोकांच्या जीवावर उठले आहेत तर दुसरीकडे रस्त्यांवर धावणाºया अगणित गाड्यांनी श्वास गुदमरतो आहे. विकास आणि समृद्धीच्या नादात पर्यावरणाकडे झालेल्या दुर्लक्षाचाच हा परिपाक आहे. पूर्वी दसरा, कोजागिरी पौर्णिमेला थंडीची चाहुल लागत असे. दिवाळीत तर थंडीत कुडकुडत अभ्यंगस्नान व्हायचे. यंदा दिवाळी चार दिवसांवर येऊन ठेपली असतानाही थंडीचे कुठे नामोनिशाण नाही. खरे तर आपण साजरा करीत असलेला प्रत्येक सण आणि उत्सवाचा संबंध हा निसर्गाशी, ऋतुचक्राशी जुळलेला आहे. किंबहुना हे सगळे सण निसर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच साजरे करण्याची जुनी परंपरा आहे. परंतु दुर्दैवाने आज या सणवारांनाही इव्हेंटचे स्वरूप प्राप्त झाले असल्याने त्यांच्या मूळ उद्देशांपासून आम्ही केव्हाच भरकटलो आहोत. ज्या फटाक्यांवरून एवढी राजकीय आतषबाजी सुरू आहे त्या फटाक्यांचे दिवाळीच्या सणात कुठलेही औचित्य नाही. परंतु फटाके फोडणे म्हणजेच दिवाळी असा गैरसमज अनेकांनी करून घेतला आहे. दिवाळीचा इतिहास धुंडाळल्यास त्यामागील सत्य समोर येईल. आज खरी गरज आहे ती पर्यावरण संवर्धनाची तसेच प्रदूषण वाढविणाºया प्रत्येक गोष्टीवर आळा घालण्याची आणि असे करणेच मानवहिताचे ठरणार आहे.

टॅग्स :diwaliदिवाळी