शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले
2
Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन
3
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा २५% टॅरिफचा निर्णय लांबणीवर, काय असणार आता नवी तारीख?
5
५ महिन्याच्या गर्भवतीचे हात-पाय तोडले; दारूच्या नशेत पतीने बेदम मारले, पत्नीची निर्दयी हत्या
6
गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
7
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
8
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
9
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
10
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
11
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
12
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
13
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
14
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
15
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
16
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
17
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
18
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
19
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
20
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!

पर्यावरणस्नेही दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 01:59 IST

दीपोत्सव हा दिव्यांचा, प्रकाशाचा सण. पण यंदाची दिवाळी मात्र दिव्यांच्या झगमगाटापेक्षा फटाक्यांच्या न होणाºया धमाक्यांनीच अधिक गाजणार असे दिसते.

दीपोत्सव हा दिव्यांचा, प्रकाशाचा सण. पण यंदाची दिवाळी मात्र दिव्यांच्या झगमगाटापेक्षा फटाक्यांच्या न होणाºया धमाक्यांनीच अधिक गाजणार असे दिसते. सर्वोच्च न्यायालयाने राजधानी दिल्लीत फटाके विक्रीवर घातलेली बंदी आणि त्यानंतर महाराष्टÑातही निवासी भागात फटाके विकण्यावर निर्बंध आल्याचे कळताच राजकारण तापले आहे. फटाक्यांचे विरोधक आणि समर्थक एकमेकांसमक्ष उभे ठाकले आहेत. काहींनी तर आणखी एक पाऊल पुढे टाकत त्याला धार्मिक रंग देण्याचाही प्रयत्न चालविला आहे. दिवाळीतच फटाकेबंदी का? असा त्यांचा सवाल आहे तर दुसरीकडे पर्यावरणवाद्यांची प्रदूषणमुक्त उत्सवासाठी धडपड सुरु आहे. तसे बघता हे चित्र काही नवे नाही. दरवर्षीच उत्सवांचे दिवस आले की अशा चर्चा उफाळून येत असतात. गणेशोत्सवात डॉल्बी आणि जलप्रदूषणमुक्तीचे ढोल बडविले जातात तर दिवाळीत फटाकेमुक्तीच्या लडी लावल्या जातात आणि एकदाका सण साजरा झाला की सर्वांनाच त्याचा विसर पडतो. सोबतच प्रदूषणासारखा गंभीर मुद्दा ज्यामुळे आज साºया देशाचे आरोग्य धोक्यात आले आहे; हवेत विरून जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार सद्यस्थितीत भारतात वायुप्रदूषणाने दरमिनिटाला दोघांचा मृत्यू होतो. त्यातही महाराष्टÑ हे देशातील सर्वाधिक प्रदूषित राज्य असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. शहरांमधील कचºयांचे ढिगारे वायुबॉम्बच्या रूपात लोकांच्या जीवावर उठले आहेत तर दुसरीकडे रस्त्यांवर धावणाºया अगणित गाड्यांनी श्वास गुदमरतो आहे. विकास आणि समृद्धीच्या नादात पर्यावरणाकडे झालेल्या दुर्लक्षाचाच हा परिपाक आहे. पूर्वी दसरा, कोजागिरी पौर्णिमेला थंडीची चाहुल लागत असे. दिवाळीत तर थंडीत कुडकुडत अभ्यंगस्नान व्हायचे. यंदा दिवाळी चार दिवसांवर येऊन ठेपली असतानाही थंडीचे कुठे नामोनिशाण नाही. खरे तर आपण साजरा करीत असलेला प्रत्येक सण आणि उत्सवाचा संबंध हा निसर्गाशी, ऋतुचक्राशी जुळलेला आहे. किंबहुना हे सगळे सण निसर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच साजरे करण्याची जुनी परंपरा आहे. परंतु दुर्दैवाने आज या सणवारांनाही इव्हेंटचे स्वरूप प्राप्त झाले असल्याने त्यांच्या मूळ उद्देशांपासून आम्ही केव्हाच भरकटलो आहोत. ज्या फटाक्यांवरून एवढी राजकीय आतषबाजी सुरू आहे त्या फटाक्यांचे दिवाळीच्या सणात कुठलेही औचित्य नाही. परंतु फटाके फोडणे म्हणजेच दिवाळी असा गैरसमज अनेकांनी करून घेतला आहे. दिवाळीचा इतिहास धुंडाळल्यास त्यामागील सत्य समोर येईल. आज खरी गरज आहे ती पर्यावरण संवर्धनाची तसेच प्रदूषण वाढविणाºया प्रत्येक गोष्टीवर आळा घालण्याची आणि असे करणेच मानवहिताचे ठरणार आहे.

टॅग्स :diwaliदिवाळी