शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

आवाहन करणे सोपे

By admin | Updated: February 2, 2016 03:09 IST

जगातील सर्वात सोपी गोष्ट जर कोणती असेल, तर ती आहे सल्ले देणे. अलीकडे तर फुकटच्या सल्ल्यांना खूपच उधाण आले आहे. कोणीही उठतो आणि सल्ले देऊन मोकळे होतो

जगातील सर्वात सोपी गोष्ट जर कोणती असेल, तर ती आहे सल्ले देणे. अलीकडे तर फुकटच्या सल्ल्यांना खूपच उधाण आले आहे. कोणीही उठतो आणि सल्ले देऊन मोकळे होतो. राजकारणी लोकांनी तर असे सल्ले देण्यात कहरच केला आहे. ते आधी आणि आताही आश्वासने द्यायचे आता त्याची मात्रा लागू पडत नाही म्हणून की काय सल्ले देण्याचा मार्ग पत्करल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्त्या लक्षात घेता वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून मराठवाड्यात ज्ञानोबा-तुकोबा आधार दिंडी काढण्यात आली. त्या दिंडीचा समारोप विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या रोखण्याची ताकद वारकरी संप्रदायात व भजन - कीर्तनात आहे. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना धीर देऊन त्यांना सकारात्मक दृष्टिकोन दिला पाहिजे असे आवाहन हरिभाऊंनी केले. मोठा आर्थिक भार आणि न परवडणारी शेती हे आत्महत्त्येमागचे प्रमुख कारण असल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत. काही अघटित घडले की नेतेमंडळी घटना कशी घडली, का घडली याचा ऊहापोह करतात, मात्र भविष्यात त्या घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कोणताही नेता छातीठोकपणे सांगताना दिसत नाही. वास्तविक हरिभाऊ हे भारतीय जनता पार्टीतील वरिष्ठ नेते आहेत आणि केंद्रात व राज्यात त्यांच्याच पक्षाचे सरकार आहे. असे असताना त्यांनी सरकारचे प्रतिनिधी या नात्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या रोखण्यासाठी आम्ही काय करणार आहोत किंवा मी स्वत: शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेल्या शेतमालाला हमीभाव कसा मिळवून देता येईल हा मुद्दा पक्षश्रेष्ठींसमोर मांडणार असल्याचे जरी सांगितले असते तरी ते वारकरी साहित्य परिषदेच्या आधार दिंडीला आधार दिल्यासरखे झाले असते. नुसत्या आवाहन आणि सल्ल्याने प्रश्न निकाली थोडीच निघतात.