शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धेचा बाजार उठला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:03 IST

आसारामचे भक्त दंगल करतील म्हणून तीन राज्यांमध्ये विशेष पोलीस बंदोबस्त करावा लागला.

आसाराम बापू नामक साधूच्या वेषात वावरणाऱ्या नीच दानवाने देशभरातील लाखो भोळ्याभाबड्या भाविकांच्या श्रद्धेचा गेली तीन दशके मांडलेला बाजार अखेर उठला हे चांगले झाले. शिक्षणासाठी आश्रमात राहणाºया एका १६ वर्षाच्या मुलीवर पाच वर्षांपूर्वी बलात्कार केल्याबद्दल जोधपूर येथील विशेष न्यायालयाने आसारामला मरेपर्यंत कारावासाची शिक्षा ठोठावली. याहून अधिक कडक शिक्षा देता येत नाही हे कायद्याचे अपयश आहे. जोधपूरजवळील मनाई आश्रमात ही षोडशा आसारामच्या राक्षसी वासनेची शिकार झाली होती. ही मुलगी आजारी होती व तिच्यावर फक्त बापूच उपचार करू शकतील, असे म्हणून आश्रमातील गुरुकुलची वॉर्डन शिल्पी गुप्ता आणि बापूंचा विश्वासू शरश्चंद्र या दोघांनी तिला १५ व १६ आॅगस्ट २०१३ दरम्यानच्या रात्री आसारामच्या शयनगृहात नेऊन सोडले होते. गुन्ह्यातील साथीदार म्हणून न्यायालयाने या दोन आरोपींना प्रत्येकी २० वर्षांचा कारावास ठोठावला. पीडितेच्या वडिलांनी न्याय मिळाला याबद्दल आनंद व्यक्त केला असला तरी एका परीने हा अपुरा न्याय आहे. बलात्कार करणाºयाहून त्याला मदत करणाºयांना जास्त शिक्षा, असे होणार आहे. हा बलात्कार केला तेव्हा आसाराम ७३ वर्षांचा होता. म्हणजे सामान्य घरातील एखादा आजोबा ज्या वयात मंदिरात भजन-कीर्तनाला किंवा ज्येष्ठ नागरिक संघाच्या बैठकीला जाऊन बसतो त्या वयात हा आसाराम कोवळ्या, निरागस मुलींचा उपभोग घेण्यासाठी आश्रम चालवित होता. आता आसाराम ७८ वर्षांचा आहे. शिक्षा होण्याआधी तो १,६६० दिवस म्हणजे सुमारे साडेचार वर्षे कैदेत होता. आता यानंतर तहहयात म्हणजे फार तर आठ-दहा वर्षे तो तुरुंगात राहील. आसाराम बापूची शिक्षा ही एका अर्थाने अशा कुप्रवत्तींना झालेली प्रातिनिधिक शिक्षा आहे. याआधी गेल्या काही वर्षांत हरियाणातील बाबा रामरहीमसह आणखी अशाच पाच-सहा वासनांध लांडग्यांना गजाआड जावे लागले आहे. गेल्या पाच वर्षात या प्रकरणाचा तपास करणाºया पोलीस अधिकाºयास दोन हजारांहून अधिक धमकीचे फोन व पत्रे आली. दोन साक्षीदारांचे खून झाले, आणखी तिघांवर हल्ले झाले. आसारामचे भक्त दंगल करतील म्हणून तीन राज्यांमध्ये विशेष पोलीस बंदोबस्त करावा लागला. बाबा रामरहीमला शिक्षा झाली तेव्हा त्याच्या भक्तांनी हैदोस घातला होता. लोकांना उल्लू बनविणारे हे दानवी बाबा किती उन्मत्त झाले आहेत, याचे हे द्योतक आहे. ज्या मुठभर पीडितांनी धीराने पुढे येऊन या भोंदूबाबांचे असली रूप जगापुढे आणले त्या कौतुकास पात्र आहेत. परंतु एवढ्याने भागणार नाही. आसारामला शिक्षा झाल्यावर त्याच्या आश्रमांमध्ये धाय मोकलून रडणाºया भक्तांची छायाचित्र वृत्तवाहिन्यांवर दाखविली गेली. बाबा गजाआड गेला तरी त्याने उभारलेली हजारो कोटी रुपयांची मायावी साम्राज्ये अबाधित असल्याचे हे भयसूचक संकेत आहेत. देवाच्या न्यायालयात आमचा बापू नक्की निर्दोष सुटेल, अशी या अंधश्रद्धाळूंना आशा आहे. याच बापूने पृथ्वीवर उभा केलेला नरक त्यांना दिसत नाही. प्रत्येक गोष्टीचे राजकारण करणाºयांनी लगेच मोदी, वाजपेयी, अडवाणी, राजनाथसिंग, दिग्विजयसिंग यांची आसारामच्या पायी लोटांगण घेतानाची जुनी छायाचित्रे समाजमाध्यमांत टाकली. ही नेतेमंडळी अशा लबाडांना जवळ करतात आणि ते पाहून मग भोळेभाबडे लोकही त्यांच्या नादी लागतात. सर्वच पक्षांतील नेत्यांनी अशा बाबांची कुरणे पिकविली आहेत. लाखोंंच्या डोक्यावरून हात फिरवून झाल्यानंतर चार-दोन बाबांना तुरुंगात टाकून समाजास लागलेली ही कीड जाणार नाही. अशा प्रत्येक बाबाला होणारी शिक्षा हे आपल्या डोळ्यात घातलेले झणझणीत अंजन आहे या भावनेने लोकांनीच भाबडेपणाने त्यांच्या मागे धावणे बंद करणे गरजेचे आहे. परंतु हे होणे अशक्य आहे. निदान बाबा तुरुंगात गेला की त्याचे संपूर्ण साम्राज्य खालसा करून सरकारजमा करण्याचा कायदा केला तर अशा बाबांचे भावी पेव तरी कमी फुटेल!

टॅग्स :Asaram Bapuआसाराम बापू