शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्या मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
4
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
5
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
6
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
7
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
8
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
9
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
10
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
11
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
12
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
13
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
14
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
15
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
16
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
17
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
18
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
19
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
20
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?

श्रद्धेचा बाजार उठला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:03 IST

आसारामचे भक्त दंगल करतील म्हणून तीन राज्यांमध्ये विशेष पोलीस बंदोबस्त करावा लागला.

आसाराम बापू नामक साधूच्या वेषात वावरणाऱ्या नीच दानवाने देशभरातील लाखो भोळ्याभाबड्या भाविकांच्या श्रद्धेचा गेली तीन दशके मांडलेला बाजार अखेर उठला हे चांगले झाले. शिक्षणासाठी आश्रमात राहणाºया एका १६ वर्षाच्या मुलीवर पाच वर्षांपूर्वी बलात्कार केल्याबद्दल जोधपूर येथील विशेष न्यायालयाने आसारामला मरेपर्यंत कारावासाची शिक्षा ठोठावली. याहून अधिक कडक शिक्षा देता येत नाही हे कायद्याचे अपयश आहे. जोधपूरजवळील मनाई आश्रमात ही षोडशा आसारामच्या राक्षसी वासनेची शिकार झाली होती. ही मुलगी आजारी होती व तिच्यावर फक्त बापूच उपचार करू शकतील, असे म्हणून आश्रमातील गुरुकुलची वॉर्डन शिल्पी गुप्ता आणि बापूंचा विश्वासू शरश्चंद्र या दोघांनी तिला १५ व १६ आॅगस्ट २०१३ दरम्यानच्या रात्री आसारामच्या शयनगृहात नेऊन सोडले होते. गुन्ह्यातील साथीदार म्हणून न्यायालयाने या दोन आरोपींना प्रत्येकी २० वर्षांचा कारावास ठोठावला. पीडितेच्या वडिलांनी न्याय मिळाला याबद्दल आनंद व्यक्त केला असला तरी एका परीने हा अपुरा न्याय आहे. बलात्कार करणाºयाहून त्याला मदत करणाºयांना जास्त शिक्षा, असे होणार आहे. हा बलात्कार केला तेव्हा आसाराम ७३ वर्षांचा होता. म्हणजे सामान्य घरातील एखादा आजोबा ज्या वयात मंदिरात भजन-कीर्तनाला किंवा ज्येष्ठ नागरिक संघाच्या बैठकीला जाऊन बसतो त्या वयात हा आसाराम कोवळ्या, निरागस मुलींचा उपभोग घेण्यासाठी आश्रम चालवित होता. आता आसाराम ७८ वर्षांचा आहे. शिक्षा होण्याआधी तो १,६६० दिवस म्हणजे सुमारे साडेचार वर्षे कैदेत होता. आता यानंतर तहहयात म्हणजे फार तर आठ-दहा वर्षे तो तुरुंगात राहील. आसाराम बापूची शिक्षा ही एका अर्थाने अशा कुप्रवत्तींना झालेली प्रातिनिधिक शिक्षा आहे. याआधी गेल्या काही वर्षांत हरियाणातील बाबा रामरहीमसह आणखी अशाच पाच-सहा वासनांध लांडग्यांना गजाआड जावे लागले आहे. गेल्या पाच वर्षात या प्रकरणाचा तपास करणाºया पोलीस अधिकाºयास दोन हजारांहून अधिक धमकीचे फोन व पत्रे आली. दोन साक्षीदारांचे खून झाले, आणखी तिघांवर हल्ले झाले. आसारामचे भक्त दंगल करतील म्हणून तीन राज्यांमध्ये विशेष पोलीस बंदोबस्त करावा लागला. बाबा रामरहीमला शिक्षा झाली तेव्हा त्याच्या भक्तांनी हैदोस घातला होता. लोकांना उल्लू बनविणारे हे दानवी बाबा किती उन्मत्त झाले आहेत, याचे हे द्योतक आहे. ज्या मुठभर पीडितांनी धीराने पुढे येऊन या भोंदूबाबांचे असली रूप जगापुढे आणले त्या कौतुकास पात्र आहेत. परंतु एवढ्याने भागणार नाही. आसारामला शिक्षा झाल्यावर त्याच्या आश्रमांमध्ये धाय मोकलून रडणाºया भक्तांची छायाचित्र वृत्तवाहिन्यांवर दाखविली गेली. बाबा गजाआड गेला तरी त्याने उभारलेली हजारो कोटी रुपयांची मायावी साम्राज्ये अबाधित असल्याचे हे भयसूचक संकेत आहेत. देवाच्या न्यायालयात आमचा बापू नक्की निर्दोष सुटेल, अशी या अंधश्रद्धाळूंना आशा आहे. याच बापूने पृथ्वीवर उभा केलेला नरक त्यांना दिसत नाही. प्रत्येक गोष्टीचे राजकारण करणाºयांनी लगेच मोदी, वाजपेयी, अडवाणी, राजनाथसिंग, दिग्विजयसिंग यांची आसारामच्या पायी लोटांगण घेतानाची जुनी छायाचित्रे समाजमाध्यमांत टाकली. ही नेतेमंडळी अशा लबाडांना जवळ करतात आणि ते पाहून मग भोळेभाबडे लोकही त्यांच्या नादी लागतात. सर्वच पक्षांतील नेत्यांनी अशा बाबांची कुरणे पिकविली आहेत. लाखोंंच्या डोक्यावरून हात फिरवून झाल्यानंतर चार-दोन बाबांना तुरुंगात टाकून समाजास लागलेली ही कीड जाणार नाही. अशा प्रत्येक बाबाला होणारी शिक्षा हे आपल्या डोळ्यात घातलेले झणझणीत अंजन आहे या भावनेने लोकांनीच भाबडेपणाने त्यांच्या मागे धावणे बंद करणे गरजेचे आहे. परंतु हे होणे अशक्य आहे. निदान बाबा तुरुंगात गेला की त्याचे संपूर्ण साम्राज्य खालसा करून सरकारजमा करण्याचा कायदा केला तर अशा बाबांचे भावी पेव तरी कमी फुटेल!

टॅग्स :Asaram Bapuआसाराम बापू