शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
2
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
3
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
4
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
5
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
6
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
7
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
8
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
9
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
10
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
11
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
12
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
13
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
14
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
15
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
16
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
17
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
18
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
19
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
20
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

डॉ. ताकवले : शिक्षणाचं लोकशाहीकरण करणारा शिक्षणतज्ज्ञ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 10:13 IST

‘ज्ञानगंगा घरोघरी’ पोहोचविण्याचं स्वप्न वंचित-बहुजनांपर्यंत पोहोचविणारा व दुर्बल घटकांना उच्च शिक्षणाची कवाडं खोलणारा द्रष्टा शिक्षणतज्ज्ञ.

प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे, ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ -महाराष्ट्रात अनेक नामांकित शिक्षणतज्ज्ञ कुलगुरू झालेले आहेत. मात्र, या पदावर असताना मूठभर मोजके कुलगुरू दिशादर्शक काम करू शकले आहेत. शिक्षण हे समताधर्मी असू शकतं व समताद्रोहीही असू शकतं, या विचाराची जाणीव ठेवून त्यातही ‘ज्ञानगंगा घरोघरी’ पोहोचविण्याचं स्वप्न नि दृष्टी घेऊन उच्चशिक्षण खेड्यापाड्यातील वंचित-बहुजनांपर्यंत पोहोचविणारे व शिक्षणातून सामाजिक व आर्थिक कारणानं गळती  झालेल्या महिला व इतर दुर्बल घटकांना उच्चशिक्षणाची कवाडं खोलणारा द्रष्टा  असा एकमेव शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम ताकवले सर होते. त्यांच्या निधनानं एक कल्पक, कृतिशील व कर्तबगार नि समाज परिवर्तनासाठी विद्यापीठाचं कामकाज चालवून दाखविणारा धाडसी कुलगुरू आपण गमावला आहे. ९० वर्षांच्या जीवनात सतत कार्यमग्न राहिलेले कुलगुरू ताकवले सर यांचं या क्षेत्रातलं योगदान अविस्मरणीय असं आहे. उच्चशिक्षण हे समताधर्मी असायला हवं हे त्यांनी कृतीनं, आपल्या ध्येयवादानं नि झपाटलेपणानं  दाखवून दिलं.

मुक्त विद्यापीठाचा अभिनव प्रयोगमहाराष्ट्र राज्याचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ जेव्हा काही चिरंतन स्मारक करायचं ठरलं, तेव्हा संस्थापक कुलगुरू म्हणून त्याची धुरा प्रा. राम ताकवले सरांकडे आली व महाराष्ट्रात देशातील दुसरं मुक्त विद्यापीठ ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ’ नाशिकला उभं राहिलं. प्राचार्य पी. बी. पाटील व तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी या कल्पनेला उचलून धरलं व नव संकल्पनेनं उभारणीसाठी पूर्ण स्वातंत्र्य प्रा.  ताकवलेंना सरकारनं दिलं. त्यातूनच स्वयंअर्थसाहाय्यित (विनाअनुदानित) असं पहिलं सरकारी विद्यापीठ भारतात उभं करण्याचं धाडस सरांनी केलं. आजही मुक्त विद्यापीठ आपल्या स्वत:च्या उत्पन्नातून व आर्थिक क्षमतेनं प्राध्यापक व कर्मचारी वर्गाचा पगार करते. सरकारी अनुदानाच्या कुबड्यांनी विद्यापीठ चालवायला नको, त्यांनी स्वयंपूर्ण व स्वावलंबी व्हायला हवं, हा त्या काळी धक्कादायक वाटणारा विचार त्यांनी रुजविला. आपल्या संपर्काच्या बळावर अनेक विद्वानांना जोडून उत्तम पुस्तकं (सेल्फ लर्निंग मटेरीयल) तयार केली. पहिल्यांदाच स्वावलंबी सरकारी मुक्त विद्यापीठ ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ’च्या रूपात उभं केलं नि यशस्वी करून दाखविलं. मग कर्नाटक, बंगाल, राजस्थान व मध्य प्रदेशातही अशीच आपल्या मुक्त विद्यापीठाच्या मॉडेलवर मुक्त विद्यापीठं उभी राहिली. 

सरकारी विद्यापीठंही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतात नि तेही लाखो शिक्षणवंचितांना दर्जेदार उच्चशिक्षण देऊन शिवाय मराठीसारख्या मातृभाषेत उच्चशिक्षण देऊन हे त्यांनी भारतात करून दाखविलं. भारतीय भाषांत उच्चशिक्षण देण्याचा प्रयोग १९८७ साली म्हणजे ३६ वर्षांपूर्वीच प्रा. राम ताकवले यांनी करून दाखविला, हे आता मान्य करावं लागतं. काळाच्या पुढचा विचार करणारे ते कुलगुरू होते. सामाजिक बांधिलकी जगणारे ते शिक्षणतज्ज्ञ होते. 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील आगळ्यावेगळ्या प्रयोगात्मक कामानं राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची नोंद घेतली गेली. कॉमनवेल्थ ऑफ लर्निंगने त्यांचा गौरव केला. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिवर्सिटीचे (इग्नु) कुलगुरू म्हणूनही प्रा. ताकवलेंनी भरीव कामगिरी केली. जगातील मुक्त व दूरशिक्षण क्षेत्रात ज्याला ओडीएल एज्युकेशन म्हणतात, यातील ते आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ म्हणून मान्यता पावले. 

एमकेसीएल मॉडेल ‘महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन’चे (एमकेसीएल) पहिले संस्थापक संचालक व त्या माध्यमातून खेड्यापाड्यात संगणक शिक्षणाचे स्वयंअर्थसाहाय्यित जाळे सर्व विद्यापीठांना भागीदार करून, डॉ. विवेक सावंत या त्यांच्या कर्तबगार संशोधक विद्यार्थ्याच्या माध्यमातून प्रा. ताकवले यांनी अफलातून यशस्वी केले. महाराष्ट्रातील लाखो तरुणांना संगणक साक्षर केले. हजारोंना एमकेसीएलच्या माध्यामातून रोजगार मिळाला. या मॉडेलचे अनुकरण पुढे अनेक राज्यांनी केले. कल्पकता  व नावीन्याचा ध्यास म्हणजे प्रा. डॉ. राम ताकवले सर होते. 

टॅग्स :Educationशिक्षण