शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

निकषांचे तुणतुणे नको, टँकर्स सुरू करा!

By किरण अग्रवाल | Updated: June 25, 2023 07:00 IST

Water Scarcity : राज्याचे नेतृत्वकर्ते देवेंद्र फडणवीस यांनीच आता संबंधितांचे कान धरण्याची वेळ आली आहे.

- किरण अग्रवाल

ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने उग्र रूप धारण केले आहे. परंतु, जिल्हा प्रशासन जागचे हलताना दिसत नाही. संबंधितांची ही सुस्ती उतरविण्यासाठी पालकाचा अधिकार असलेले, राज्याचे नेतृत्वकर्ते देवेंद्र फडणवीस यांनीच आता संबंधितांचे कान धरण्याची वेळ आली आहे.

 

ग्रामीण भागातील जनता पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडत असताना व तेथील लोकप्रतिनिधीही घसा ओरडून उपाययोजनांची मागणी करत असताना जिल्हा प्रशासन टंचाईच्या शासकीय निकषांचे तुणतुणेच वाजवणार असेल तर त्यातून यंत्रणांची बेफिकिरी, निर्ढावलेपणा व असंवेदनशीलताच उजागर व्हावी.

 

पाऊस लांबत चालल्याने ग्रामीण भागातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. विशेषत: पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवू लागली असून, यासंबंधी होत असलेल्या त्रासाबद्दलची सहनशीलताही संपू पाहत आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत त्याचेच प्रत्यंतर आले. ग्रामीण भागातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी आपापल्या ठिकाणची पाणीटंचाईची समस्या कळकळीने मांडली. डोळे मिटून बसलेल्या प्रशासनाला आरसा दाखविण्यासाठी ‘झळा पाणीटंचाईच्या’ वृत्त मालिकेने लोकमतने झळकविलेत, पण जिल्हाधिकारी कार्यालय आपल्या शासकीय मर्यादांच्या चाकोरीबाहेर पडून विचार करताना दिसत नाही. डोळ्यांवर निकषांची पट्टी बांधून ते धृतराष्ट्रासारखे बसले आहे हे दुर्दैवी आहे. पाणीटंचाईने बळी गेल्यावर ही यंत्रणा जागी होणार आहे का, असा प्रश्न यातून उपस्थित होतो.

 

या एक-दोन दिवसात पावसाचे दोन-चार थेंब आलेत खरे, पण त्याला पावसाचे आगमन म्हणता येऊ नये. पावसाच्या या विलंबित तालाने पेरण्या खोळंबलेल्या बळीराजाचेच नव्हे, तर ग्रामीण भागातील जनतेचे पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत, पण यासंदर्भातील उपाययोजना अंमलबजावणीत आणून पाणीटंचाईपासून ज्यांनी दिलासा द्यावा ती जिल्हा प्रशासनाची यंत्रणा मात्र ही टंचाई स्वीकारायला तयार नाही. भलेही भूगर्भात पाणी उपलब्ध असेल, स्त्रोत असेल; धरणांनी तळ गाठला नसेल, पण नळावाटे ते पाणी ग्रामस्थांच्या हंड्या गुंड्यापर्यंत पोहोचणार नसेल तर तिला टंचाई नाही म्हणायचे तर काय? खारपाणपट्ट्यातील ६४ खेडी खांबोरा प्रादेशिक योजनेला ३० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाल्याने पाइपलाइन जीर्ण झाली आहे. पाण्याचा उपसा करणारे पंपदेखील निकामी झाले आहेत. त्यामुळे या खेड्यांना १५ दिवसच नव्हे तर कधी कधी महिना महिना ताटकळत राहावे लागते. अकोट व तेल्हारा तालुक्यातील ८४ खेडी योजनेतील निम्म्यापेक्षा अधिक गावेही तहानलेलीच राहत आहेत. मग पाणी उपलब्ध असले तरी ते तहानलेल्यांपर्यंत पोहोचतच नसेल तर तिला टंचाई म्हणायचे नाही का? जिल्हा प्रशासन याचबाबतीत सरकारी निकषांना कवटाळून आडमुठेपणा करीत असल्याचे स्पष्टपणे दिसते.

 

दुर्दैव असे की, या पाणीटंचाईची सचित्र स्थिती लोकमतसोबतच सर्व माध्यमांद्वारे प्रशासनापुढे मांडली जात असताना व त्या त्या परिसरातील लोकप्रतिनिधीही घसा ओरडून उपाययोजनांची मागणी करत असताना त्याकडे दुर्लक्ष करण्याची असंवेदनशीलता दाखविली जात आहे. जिल्हा मुख्यालयात बसलेल्यांना ग्रामीण भागात पाठविले तर उन्हाचे चटके व घशाला कोरड काय असते हे कळू शकेल, पण ती तसदी कुणी घेत नाही. सरकारी निकषांवर बोट ठेवताना थोडे मनावर व आपल्या हृदयावरही हात ठेवून बघा ना, म्हणजे कळेल की ग्रामीण जनतेचे पाण्यावाचून काय हाल होत आहेत ते.

 

महत्त्वाचे म्हणजे उपाययोजनांना विलंब झाल्याने आता ऐनवेळी टँकर सुरू करून तहान भागविण्याशिवाय पर्याय उरलेला दिसत नाही. अकोल्याप्रमाणेच बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील परिस्थितीही नाजूकच आहे. अधिकाऱ्यांना फरक पडत नाही, परंतु, लोकप्रतिनिधींना मतांसाठी लोकांच्या दारात जावे लागते; त्यामुळे तेही टँकरसाठी आग्रही आहेत, तेव्हा टँकर्स सुरू केले म्हणजे त्यात काही जण हात ओले करून घेतील या संशयाने न वागता अगोदर कर्तव्य आणि माणुसकी म्हणून तातडीने टँकर्स सुरू करणे गरजेचे आहे.

 

सारांशात, आगामी काळ हा निवडणुकांचा आहे, त्यापार्श्वभूमीवर पाण्यासारखे ज्वलंत विषय हाती घेऊन आंदोलने उभी राहण्यापूर्वी व त्या आंदोलनांचा फटका अंतिमत: शासन व प्रशासनालाच बसण्याअगोदर याप्रश्नी संवेदनशीलता दाखविली जाणे अपेक्षित आहे. तृषार्थ जीवांचा तळतळाट घेऊ नका इतकेच यानिमित्ताने सांगणे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईAkolaअकोला