शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे खापर ‘५ जी’वर फोडण्यात अर्थ आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 07:43 IST

भारतात सरकारी आकड्यांनुसार कोरोनामुळे २ लाख ४२ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. पण, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीतील उच्चविद्याविभूषित पंडित हे सारे मृत्यू ५-जी टेस्टिंगमुळे झाल्याचे सांगत आहेत.

- साहेबराव नरसाळे, वरिष्ठ उपसंपादक, लोकमत, अहमदनगर

‘५-जी लहरींच्या रेडिएशनमुळे कोरोना होऊन लोक चिमण्यांसारखे मरत आहेत,’  असा मेसेज फॉरवर्ड होऊन आला, तर तुम्ही काय कराल?

- हॅलो... सरजी क्या हाल है बनारस का? - बस ठीक है. - इधर तो चिडियाँ जैसे आदमी मर रहे है. - अरे हाँ.. वो ५-जी टेस्टिंग चल रहा है ना. पहले चिडियाँ मरती थी, आज आदमी मर रहे है.. फोनवरील हा संवाद ५-जी टॉवर उभारणाऱ्या दोन अधिकाऱ्यांमधील असल्याचे सांगून सध्या कचाकच फॉरवर्ड केला जात आहे. सुमारे ७ मिनिटांच्या या संवादासोबत काही छायाचित्रेही येतात. परदेशात ‘५-जी’विरोधात लोक रस्त्यावर उतरल्याची छायाचित्रे. त्याखाली पुन्हा एक मेसेज, ‘५-जी टेस्टिंग बंद करो.. इन्सानों को बचाओ.’ ५-जीमुळेच कोरोना वाढत असून, लोक चिमण्यांसारखे मरत आहेत, असे सांगणारा हा मेसेज सध्या व्हायरल आहे. पण, खरेच ५-जी लहरींच्या रेडिएशनमुळे लोक मरत आहेत का, याची पडताळणी न करताच हा मेसेज वेगाने फॉरवर्ड केला जात आहे.  सोशल मीडियावर ‘स्टॉप ५-जी’ नावाने एक चळवळ राबविली जात आहे. या चळवळीत अनेक शास्त्रज्ञ, डॉक्टर, तत्त्वज्ञ आणि तंत्रज्ञ सहभागी असल्याचा दावा करीत अफवा पसरविल्या जात आहेत.  अलीकडेच ५-जी विरोधात अफवा पसरविल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा यूके सरकारने दिला अन् तेथे तरी हा अफवांचा बाजार थांबला. भारतात सरकारी आकड्यांनुसार कोरोनामुळे २ लाख ४२ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. पण, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीतील उच्चविद्याविभूषित पंडित हे सारे मृत्यू ५-जी टेस्टिंगमुळे झाल्याचे सांगत आहेत. खरेच भारतात ५-जीचे टेस्टिंग सुरू आहे का? भारतात आतापर्यंत ५-जीचे किती टॉवर उभे राहिले आहेत? ५-जी रेडिएशनमुळे मानवी जीवनास किती प्रमाणात धोका आहे?- सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे डायरेक्टर जनरल डॉ. एस.पी. कोच्चर सांगतात, “भारतात अजून ५-जी टॉवर उभारलेले नाहीत. टेस्टिंगही सुरू झालेले नाही. भारतात फक्त ५-जी टॉवर उभारण्यास मान्यता दिलेली आहे. कोरोनाचा आणि ५-जीचा काहीही संबंध नाही, हे जागतिक आरोग्य संघटनेनेही सांगितले आहे!”कोरोनाचा व्हायरस रेडिओ लहरी किंवा मोबाइल नेटवर्कद्वारे पसरू शकत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेले आहे.  जगभरात जेथे ५-जी सुरूच झालेले नाही, तेथेही कोरोनाचा उद्रेक पाहावयास मिळत आहे. ५-जीमुळे कोरोना वाढतो व लोकांचा मृत्यू होतो, याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.कोरोना वाढीस ५-जी रेडिएशन कारणीभूत असल्याचा उल्लेख वारंवार केला जातो. हे रेडिएशन नेमके आहे तरी काय? तर, रेडिएशन म्हणजे किरणोत्सार. वायरलेस संवादाच्या तंत्रज्ञानात रेडिओ लहरी वापरल्या जातात. या रेडिओ लहरींच्या निर्मितीसाठी विद्युतभारीत किरणांचा वापर होतो. यातून किरणांचे उत्सर्जन केले जाते. त्याला रेडिएशन किंवा किरणोत्सार म्हणतात. हे किरणोत्सार दोन प्रकारचे असतात. एक आयोनायझिंग आणि दुसरा नॉन आयोनायझिंग. रेडिओ लहरींमध्ये नॉन आयोनायझिंग किरणोत्सार कमी तीव्रतेचे असतात. याउलट, आयोनायझिंग किरणोत्सार उच्च तीव्रतेचे असतात. यामध्ये क्ष-किरण (एक्स-रे), गामा-किरण (सिटी स्कॅनसाठी वापर) असतात. ही दोन्ही किरणे वैद्यकीय कारणांसाठी वापरली जातात. रेडिओ, टीव्ही सिग्नल, मोबाइल या बिनतारी संदेशवहनात नॉन-आयोनायझिंग रेडिएशन म्हणजे अ-विद्युतभारित किरणोत्साराचा वापर होतो. याद्वारे कोणत्याही विषाणूंचे वहन होऊ शकत नाही, असे अमेरिकेत झालेल्या संशोधनात म्हटलेले आहे. त्यामुळे कोरोनावाढीस अथवा सध्याच्या परिस्थितीत होत असलेल्या मानवी मृत्यूस ५-जी कारणीभूत आहे, असे म्हणता येणार नाही. म्हणूनच, यूकेमध्ये अशा अफवा पसरविणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचा नियम झाला आहे. हा नियम करतानाही तेथील प्रशासनाने भारताचे उदाहरण दिले आहे. भारतात ५-जी अजून पोहोचायचे आहे, तरीही तेथे कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. - म्हणूनच, ५-जीमुळे कोरोना वाढला, असा समज पसरविणे चुकीचे आहे; आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार हा गुन्हा आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लस