शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

देशाचा येमेन किंवा सिरिया करायचा आहे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 05:29 IST

प्रज्ञा सिंग भोपाळमध्ये माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंग यांच्याविरुद्ध निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे.

प्रज्ञा सिंग भोपाळमध्ये माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंग यांच्याविरुद्ध निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. तिचा भगवा पोशाख पाहून एक वर्ग तिच्यामागे जाईलही. पण तिचे हिंदुरक्षक असणे कडव्या, कर्मठ, धर्मांध विचारांच्या चलतीसारखेच आहे.आपल्या देशाचा येमेन किंवा सिरिया करायचा आहे काय? त्या देशात शस्त्रधारी माणसे, मग ती वैध असोत वा अवैध, समाजावर आपली हुकूमत चालवितात. समाजातील बावळी माणसेही त्यांच्यावर विश्वास ठेवतात. त्यांच्या शब्दाखातर हिंसा करतात. ती न जमली तर तिच्याकडे गौरवाने नसले तरी कौतुकाने पाहतात. कर्नल पुरोहित असे आदरणीय नाव धारण करणारी व्यक्ती समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट खटल्यात आरोपी ठरते. का? तर ती एक्स्प्रेस पाकिस्तानला जाणारी असते आणि त्यात भारतीयांसोबत पाकिस्तानचे नागरिकही बसले असतात. या व्यक्तीचा पाकद्वेष एवढ्या विषारी पातळीवरचा की पाकिस्तानी नागरिकांसोबत आपली भारतीय माणसे मृत्यू पावली तरी त्याला त्याचे फारसे काही वाटत नाही. त्याच्यावर खटला चालतो आणि वर्षानुवर्षे साक्षी-पुरावे होऊनही तपासात काही त्रुटी राहिल्याचे सांगून व संशयाचा फायदा देऊन न्यायालय त्याला निर्दोष सोडते. मायबाप सरकारही मग त्याचे लष्करात पुनर्वसन करते. परिणामी असा अधिकारी लष्करातील कनिष्ठांची पुन्हा सलामी घेऊ लागतो व देशातील बावळेही त्याच्याकडे कौतुकाने पाहू लागतात. त्याच्यावरचे इतर खटलेही मग दुर्लक्षिले जातात. ही पहिली पायरी आहे. दुसरी पायरी प्रज्ञा सिंग ठाकूर या स्वत:ला साध्वी म्हणविणाऱ्या दहशतखोर स्त्रीची आहे. ती मालेगावच्या बॉम्बस्फोटातील आरोपी आहे. सुमारे दोन डझन निरपराध माणसे तिने मारल्याचा आरोप आहे. मोटारसायकलला बॉम्ब बांधून व त्यांचा स्फोट घडवून तिने हा हिंसाचार केला आहे. भारतीय अन्वेषण विभागाच्या सर्वाधिक गौरवान्वित असलेल्या हेमंत करकरे या अधिकाºयाने तिला अटक केली होती. तिच्याविरुद्धचे सगळे साक्षी-पुरावे त्यांनी अतिशय काळजीपूर्वक एकत्र केले. परंतु आठ वर्षे तुरुंगात राहिल्यावर ती जामिनावर सुटली. तिचे सुटणे महत्त्वाचे नाही.

ती सुटल्यानंतर समाजातील एका वर्गाने तिचा केलेला गौरव व तिच्या काढलेल्या मिरवणुका अनाकलनीय असतात. एवढ्यावर न थांबता ती सत्तारूढ भाजपकडे निवडणुकीचे तिकीट मागते आणि ते तिला दिलेही जाते. आताही प्रज्ञा सिंग भोपाळ क्षेत्रातून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंग यांच्याविरुद्ध निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. तिचा भगवा पोशाख व वय पाहून वेडावलेला एक वर्ग तिच्यामागे जाईलही. भाजप व संघ परिवार तिला हिंदुरक्षक म्हणून डोक्यावरही घेईल. पण तिचे हिंदुरक्षक असणे त्याच पातळीवरचे असेल ज्या पातळीवर तालिबान आणि अल कायदाचे ‘मुस्लीमरक्षक’ त्यांच्या धर्माचे रक्षक असतात. कडव्या, कर्मठ आणि धर्मांध विचारांची सध्या जगात चलती आहे. मूलतत्त्ववाद्यांचा वावर हा विषय सार्वत्रिक आहे आणि त्यांचे स्वागतही होते. हे आंधळे धर्मवेड केवळ अशिक्षितांपुरतेच मर्यादित राहिलेले नाही तर समाजातील सर्वच थरांत ते पोहोचल्याचे पाहावयास मिळते. देशाच्या सर्वसामान्य नागरिकापासून ते अगदी देशप्रमुखापर्यंत हे अतिरेकी विचार पसरल्याचे अनेक देशांमध्ये दिसून येते.
ट्रम्पचा उर्मटपणा लोकांना आवडतो, इस्रायलमध्ये नेत्यान्याहूसारखा घमेंडखोर माणूस पाचव्यांदा पंतप्रधान होतो, रशियाच्या पुतीनला तहहयात अध्यक्षपद प्राप्त होते आणि चीनचे शी जिनपिंग आयुष्यभर देशाचे अध्यक्ष व चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचेही अध्यक्ष राहतील अशी व्यवस्था होते. भारतातील भाजपचा विजय, गुजरातमधील दंगलींच्या गुन्हेगारांची निर्दोष सुटका व त्यांची संसद आणि विधानसभेतील निवडणूक याच प्रकाराची निदर्शक असते. समाजाला समंजस, समन्वयी आणि समता व पुरोगामी विचार चालत नसावे. तसे विचारवंतही त्याला आवडत नसावे. दाभोलकर मारले जातात, पानसरेंचा खून होतो, कलबुर्गी व गौरी लंकेश यांना गोळ्यांनी ठार केले जाते. त्यांचे मारेकरी मोकळे असतात. त्यांना पकडणारी यंत्रणा सरकारजवळ नसते. ही स्थिती गुन्हेगारांना धर्माचे पाठबळ मिळाले की त्यांना सुटकेचे आश्वासन देणारी ठरते. याही पुढे जाऊन त्यांना सत्तेत सहभागी होता येते हे सांगणारीही असते. येमेन व सिरिया, इस्रायल व अरब देश यात याहून वेगळे काय होत असते? अशा राजकारणाने एखादा पक्ष सत्तेत येईलही पण देशाच्या भवितव्याचा विचार कोण करणार, हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhopal-pcभोपाळ