शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

आभास नको, विकास हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 05:46 IST

सरकारने दिलेली विकासाची अनेक आश्वासने हवेत राहिली आहेत. प्रत्यक्षात देशाचा विकास दर आता कमी झाला आहे. मागील वर्षी ७.१ टक्क्यांवर गेलेला हा दर यावर्षी ६.७ टक्क्यांपर्यंत खाली उतरला आहे. आपल्या उतरत्या विकास दराची तुलना तुर्कस्तान किंवा मध्य आशियाई देशांच्या विकासदराशी करण्यात अर्थ नाही.

सरकारने दिलेली विकासाची अनेक आश्वासने हवेत राहिली आहेत. प्रत्यक्षात देशाचा विकास दर आता कमी झाला आहे. मागील वर्षी ७.१ टक्क्यांवर गेलेला हा दर यावर्षी ६.७ टक्क्यांपर्यंत खाली उतरला आहे. आपल्या उतरत्या विकास दराची तुलना तुर्कस्तान किंवा मध्य आशियाई देशांच्या विकासदराशी करण्यात अर्थ नाही. ती फक्त चीनशीच करावी व आपली या क्षेत्रातील गती तपासावी अशी आहे. बहुतेक सर्वच बड्या कंपन्या आणि उद्योग यांचे उत्पादन का घटले, एकट्या रामदेवबाबाची इस्टेट कशी वाढली, देशाची आर्थिक स्थिती बिघडत असतानाच त्याची प्राकृतिक अवस्थाही चांगली राहिली नसल्याचे सांगणारे हे लक्षण आहे की नाही? नोटाबंदी, वस्तू व सेवाकराचा अधिभार यामुळे अर्थव्यवस्था दुरुस्त होणार असे फार सांगितले गेले. प्रत्यक्षात त्यांचा फटकाच अधिक बसला आणि आता ‘त्यातून आपण सावरत आहोत’ अशी सारवासारव अरुण जेटली करीत आहेत. आताची स्थिती पाहता येत्या काही वर्षात देशाचा विकास दर ७ टक्क्यांपर्यंत पोहचू शकेल असे जाणकार व केंद्र सरकारही सांगत आहे. याचा अर्थ एवढ्या सगळ्या वर्षात तो, डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकारने गाठलेल्या ९ टक्क्यांपर्यंत कधी पोहोचणारच नाही असा आहे. कंपन्यांचे कमकुवत साचेबंद, अनुत्पादक कर्जे, खासगी गुंतवणुकीत आलेली कमतरता यामुळे असे घडल्याचे समर्थन सरकार करीत असेल तर ते अपयश कुणाचे? सरकारची मजबुती, अर्थकारणावरील जनतेचा विश्वास आणि औद्योगिक क्षेत्रातील तेजी हे अर्थकारणाच्या वाढीचे खरे आधार आहेत. प्रत्यक्षात याच साºया आधारांना आता धक्के बसू लागले आहेत. केंद्र सरकारच्या मजबुतीला त्याच्या व भाजप या सत्तारूढ पक्षाच्या गुजरातमधील घसरणुकीमुळे तडा गेला आहे. यावर्षी होत असलेल्या पाच राज्यांतही त्याची स्थिती चिंताजनक आहे; सरकार विकासावर बोलत असतानाच धर्म, संस्कृती, इतिहास व खºया इतिहासाचे विडंबन यावर त्याचा परिवार भर देत असल्याचे चित्र जनतेच्या नजरेतून सुटणारे नाही. शाळा का बंद पडतात, अभियांत्रिकी महाविद्यालयांना कुलुपे का ठोकली जातात. विद्यापीठात शांतता का दिसत नाही आणि देशात नव्याने आलेला ताण तरुणाईला अस्थस्थ का करीत आहे. या प्रश्नांचा संबंधही आर्थिक विकासाशी आहे. विदेशी गुंतवणूक कमी कां झाली, आयातीत वाढ का होत नाही, कृषी क्षेत्राचे उत्पादन ४ टक्क्यांच्या पुढे कसे सरकत नाही आणि जीवनावश्यक बाबींकडे दुर्लक्ष करून मेट्रो आणि बुलेट गाड्यांची स्वप्ने जनतेला का दाखविली जातात याचा मुळातून विचार करणे गरजेचे आहे की नाही? जेथे रस्ते नाहीत तेथे मेट्रो आणि गाड्यांची कमतरता असताना बुलेट येते ती कशासाठी? या गोष्टी याव्या पण केव्हा? समाजाच्या मूलभूल गरजा पूर्ण झाल्या म्हणजे. जनतेला काही तरी आकर्षक दाखवायचे आणि आपले विकास क्षेत्रातील अपयश झाकायचे, हा उद्योग फार लवकर लोकांच्याही ध्यानात येतो. त्यातून विकासाची सोंगे आणता येत नाहीत. आपल्या अपयशावर पांघरुण घालण्यासाठी मुडीसारख्या जागतिक संघटनांची प्रशस्तीपत्रे देशाला दाखविण्यात अर्थ नाही. ‘धीर धरा, वाट पाहा, विकास येत आहे आणि संपन्नता वाढणार आहे आणि देश श्रीमंत होणार आहे. त्यातला काळा पैसा लोकांना मिळणार आहे, या जाहिराती फतव्या असतात हे आता साºयांना कळून चुकले आहे. ज्यांना ते कळले नाही, त्यांना ते कळून घ्यायचे नाही वा तसे काही घडलेच नाही हे त्यांना सांगायचे आहे. ही माणसे देशाएवढीच स्वत:चीही फसवणूक करीत असतात. इतिहासाचे गोडवे गाऊन वा इतिहासाचे विडंबन करून देश पुढे जात नाही. त्याला वर्तमानातील प्रामाणिक गुंतवणुकीची गरज असते. मात्र ही गुंतवणूक ४ वा ५ उद्योगपतींच्या हाती सोपवून देशाचे भले होईल अशा भ्रमातही कुणी राहण्याचे कारण नाही. त्यासाठी साºया देशातील तरुणाईलाच बळ देणे गरजेचे आहे.

टॅग्स :Indiaभारत