शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

‘मुक्काम पोस्ट’ गावात नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:29 IST

गावात नसणा-या पशुवैद्यकांना निलंबित करा, हे सामान्य जनतेच्या मनातील विधान केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी परवा नागपुरातील एका कार्यक्रमात केले.

गावात नसणा-या पशुवैद्यकांना निलंबित करा, हे सामान्य जनतेच्या मनातील विधान केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी परवा नागपुरातील एका कार्यक्रमात केले. क्षणभरासाठी सा-यांनाच हायसे वाटले. गडकरी बोलले म्हणजे आता पशुवैद्यकीय अधिकारी गावात जातील, तिथेच मुक्काम करतील, प्रामाणिकपणे सेवा देतील असे कुणाला वाटले असेल तर ती एक काव्यात्मक कल्पनाच समजावी. गडकरीच नव्हे तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील वारंवार यासंदर्भात खंत व्यक्त केली आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील त्यांच्या जनता दरबारात ऊर्जाखात्यातील अशा अनिवासी, प्रवासी अधिका-यांना निलंबित केले होते. गावातील सरपंचापासून ते देशाच्या पंतप्रधानापर्यंत साºयांच्याच मुखातील ही चिंता आहे. पण त्याचे फलित अद्यापही सापडलेले नाही. केवळ पशुवैद्यकीय अधिकारीच नाही तर शिक्षक, ग्रामसेवक, पटवारी, बँकेचा अधिकारी, डॉक्टर असे कुणीही सरकारी-निमसरकारी अधिकारी-कर्मचारी गावात राहायला तयार नाहीत. कारण गावकºयांच्या सेवेपेक्षा सर्वांना स्वत:ची नोकरी व कुुटुंबीय अधिक प्रिय आहेत. सरकारने दबाव टाकला, इशारे दिले, विशेष भत्तादेखील दिला. मात्र तरीदेखील ही मंडळी गावात मुक्कामी राहत नाहीत. या अधिकारी-कर्मचाºयांचे गावात नावालाच घर असते. ते कागदोपत्रीच असते. सरकारच्या फाईल्समध्ये पत्ता एक आणि प्रत्यक्ष मुक्काम वेगळाच, असे चित्र दिसून येते. त्यांच्या या चलाखीला वरिष्ठांचे पाठबळ असल्यामुळे, किंबहुना त्यांच्यातील तो देवाण-घेवाणीतील व्यवहार असल्याने त्याबाबत कुणाचीही तक्रार राहत नाही. याचा फटका गावकºयांना सहन करावा लागतो. पाणी डोक्यावरुन गेले की गावकरी याविरुद्ध आवाज उठवितात, अधिकाºयांना निवेदन लिहून देतात. पण याचा काडीमात्रही उपयोग होत नाही. या निवेदनांना गंभीरतेने घेण्यातच येत नाही. कर्मचारी संघटनांच्या पाठबळामुळे या कर्मचाºयांना कुणाचीही भीती नाही. एरवी सरकारविरुद्ध आक्रमक होणाºया संघटना या विषयांबाबत नमते घेतात. ‘तुम्ही गावातच राहा’, असे सांगण्याचे धाडस अद्याप एकाही कर्मचारी संघटनेत नाही. नितीन गडकरी यांचा हा संताप प्रातिनिधिक आहे. त्यांचे मूळ गाव असलेल्या धापेवाडा येथील ‘डेअरी फार्म’ पशुवैद्यकांच्या बेजबाबदारपणामुळे बंद करावे लागले. इथे देशाचा एक वजनदार नेता एका सामान्य पशुवैद्यकासमोर हतबल होतो, तेथे इतरांची काय अवस्था?

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी