शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

‘मुक्काम पोस्ट’ गावात नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:29 IST

गावात नसणा-या पशुवैद्यकांना निलंबित करा, हे सामान्य जनतेच्या मनातील विधान केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी परवा नागपुरातील एका कार्यक्रमात केले.

गावात नसणा-या पशुवैद्यकांना निलंबित करा, हे सामान्य जनतेच्या मनातील विधान केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी परवा नागपुरातील एका कार्यक्रमात केले. क्षणभरासाठी सा-यांनाच हायसे वाटले. गडकरी बोलले म्हणजे आता पशुवैद्यकीय अधिकारी गावात जातील, तिथेच मुक्काम करतील, प्रामाणिकपणे सेवा देतील असे कुणाला वाटले असेल तर ती एक काव्यात्मक कल्पनाच समजावी. गडकरीच नव्हे तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील वारंवार यासंदर्भात खंत व्यक्त केली आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील त्यांच्या जनता दरबारात ऊर्जाखात्यातील अशा अनिवासी, प्रवासी अधिका-यांना निलंबित केले होते. गावातील सरपंचापासून ते देशाच्या पंतप्रधानापर्यंत साºयांच्याच मुखातील ही चिंता आहे. पण त्याचे फलित अद्यापही सापडलेले नाही. केवळ पशुवैद्यकीय अधिकारीच नाही तर शिक्षक, ग्रामसेवक, पटवारी, बँकेचा अधिकारी, डॉक्टर असे कुणीही सरकारी-निमसरकारी अधिकारी-कर्मचारी गावात राहायला तयार नाहीत. कारण गावकºयांच्या सेवेपेक्षा सर्वांना स्वत:ची नोकरी व कुुटुंबीय अधिक प्रिय आहेत. सरकारने दबाव टाकला, इशारे दिले, विशेष भत्तादेखील दिला. मात्र तरीदेखील ही मंडळी गावात मुक्कामी राहत नाहीत. या अधिकारी-कर्मचाºयांचे गावात नावालाच घर असते. ते कागदोपत्रीच असते. सरकारच्या फाईल्समध्ये पत्ता एक आणि प्रत्यक्ष मुक्काम वेगळाच, असे चित्र दिसून येते. त्यांच्या या चलाखीला वरिष्ठांचे पाठबळ असल्यामुळे, किंबहुना त्यांच्यातील तो देवाण-घेवाणीतील व्यवहार असल्याने त्याबाबत कुणाचीही तक्रार राहत नाही. याचा फटका गावकºयांना सहन करावा लागतो. पाणी डोक्यावरुन गेले की गावकरी याविरुद्ध आवाज उठवितात, अधिकाºयांना निवेदन लिहून देतात. पण याचा काडीमात्रही उपयोग होत नाही. या निवेदनांना गंभीरतेने घेण्यातच येत नाही. कर्मचारी संघटनांच्या पाठबळामुळे या कर्मचाºयांना कुणाचीही भीती नाही. एरवी सरकारविरुद्ध आक्रमक होणाºया संघटना या विषयांबाबत नमते घेतात. ‘तुम्ही गावातच राहा’, असे सांगण्याचे धाडस अद्याप एकाही कर्मचारी संघटनेत नाही. नितीन गडकरी यांचा हा संताप प्रातिनिधिक आहे. त्यांचे मूळ गाव असलेल्या धापेवाडा येथील ‘डेअरी फार्म’ पशुवैद्यकांच्या बेजबाबदारपणामुळे बंद करावे लागले. इथे देशाचा एक वजनदार नेता एका सामान्य पशुवैद्यकासमोर हतबल होतो, तेथे इतरांची काय अवस्था?

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी