शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘मुक्काम पोस्ट’ गावात नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:29 IST

गावात नसणा-या पशुवैद्यकांना निलंबित करा, हे सामान्य जनतेच्या मनातील विधान केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी परवा नागपुरातील एका कार्यक्रमात केले.

गावात नसणा-या पशुवैद्यकांना निलंबित करा, हे सामान्य जनतेच्या मनातील विधान केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी परवा नागपुरातील एका कार्यक्रमात केले. क्षणभरासाठी सा-यांनाच हायसे वाटले. गडकरी बोलले म्हणजे आता पशुवैद्यकीय अधिकारी गावात जातील, तिथेच मुक्काम करतील, प्रामाणिकपणे सेवा देतील असे कुणाला वाटले असेल तर ती एक काव्यात्मक कल्पनाच समजावी. गडकरीच नव्हे तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील वारंवार यासंदर्भात खंत व्यक्त केली आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील त्यांच्या जनता दरबारात ऊर्जाखात्यातील अशा अनिवासी, प्रवासी अधिका-यांना निलंबित केले होते. गावातील सरपंचापासून ते देशाच्या पंतप्रधानापर्यंत साºयांच्याच मुखातील ही चिंता आहे. पण त्याचे फलित अद्यापही सापडलेले नाही. केवळ पशुवैद्यकीय अधिकारीच नाही तर शिक्षक, ग्रामसेवक, पटवारी, बँकेचा अधिकारी, डॉक्टर असे कुणीही सरकारी-निमसरकारी अधिकारी-कर्मचारी गावात राहायला तयार नाहीत. कारण गावकºयांच्या सेवेपेक्षा सर्वांना स्वत:ची नोकरी व कुुटुंबीय अधिक प्रिय आहेत. सरकारने दबाव टाकला, इशारे दिले, विशेष भत्तादेखील दिला. मात्र तरीदेखील ही मंडळी गावात मुक्कामी राहत नाहीत. या अधिकारी-कर्मचाºयांचे गावात नावालाच घर असते. ते कागदोपत्रीच असते. सरकारच्या फाईल्समध्ये पत्ता एक आणि प्रत्यक्ष मुक्काम वेगळाच, असे चित्र दिसून येते. त्यांच्या या चलाखीला वरिष्ठांचे पाठबळ असल्यामुळे, किंबहुना त्यांच्यातील तो देवाण-घेवाणीतील व्यवहार असल्याने त्याबाबत कुणाचीही तक्रार राहत नाही. याचा फटका गावकºयांना सहन करावा लागतो. पाणी डोक्यावरुन गेले की गावकरी याविरुद्ध आवाज उठवितात, अधिकाºयांना निवेदन लिहून देतात. पण याचा काडीमात्रही उपयोग होत नाही. या निवेदनांना गंभीरतेने घेण्यातच येत नाही. कर्मचारी संघटनांच्या पाठबळामुळे या कर्मचाºयांना कुणाचीही भीती नाही. एरवी सरकारविरुद्ध आक्रमक होणाºया संघटना या विषयांबाबत नमते घेतात. ‘तुम्ही गावातच राहा’, असे सांगण्याचे धाडस अद्याप एकाही कर्मचारी संघटनेत नाही. नितीन गडकरी यांचा हा संताप प्रातिनिधिक आहे. त्यांचे मूळ गाव असलेल्या धापेवाडा येथील ‘डेअरी फार्म’ पशुवैद्यकांच्या बेजबाबदारपणामुळे बंद करावे लागले. इथे देशाचा एक वजनदार नेता एका सामान्य पशुवैद्यकासमोर हतबल होतो, तेथे इतरांची काय अवस्था?

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी