शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खोटी स्वप्ने दाखवू नका

By admin | Updated: December 10, 2014 01:12 IST

नागपुरात मेट्रो दौडविण्याचे दिवास्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील जनतेला दाखविले आहे.

नागपुरात मेट्रो दौडविण्याचे दिवास्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील जनतेला दाखविले आहे. 10 हजार कोटी रुपये खचरून पूर्ण करावयाच्या या प्रकल्पाचा 50 टक्के खर्च केंद्र सरकारने, तर उरलेला 25-25 टक्के खर्च राज्य शासनाने व नागपूर महापालिकेने करावयाचा आहे. मुळात केंद्राची आर्थिक प्रकृती नाजूक आहे. पेट्रोल व डिङोलच्या किमती कमी करण्याचे आश्वासन पूर्ण करताच त्या दोहोंवरही प्रत्येक लिटरमागे अडीच रुपयांचा लेव्ही कर त्या सरकारने लावला आहे. त्यातून 1क् हजार कोटी रुपये जमायला काही महिन्यांचा काळ लागणार आहे. या रकमेचा विनियोग ते सरकार नागपूरच्या मेट्रोवर अर्थातच करणार नाही. इकडे महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगून त्यावर साडेतीन लक्ष कोटींचे प्रचंड कर्ज असल्याचे म्हटले आहे. या खडखडाटाची जागा खणखणाट घेईल, असे ते म्हणाले असले, तरी तसे व्हायला बराच काळ जावा लागेल. पाच वर्षापूर्वी राज्यावरील कर्जाचा भार दीड लक्ष कोटींचा होता. तो आता दुपटीहून अधिक वाढला आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी तर राज्याच्या एकूण खर्चात 4क् टक्क्यांची कपात करावी लागणार असल्याचे जाहीर करून, ती कपात विकासकामांनाही लागू करावी लागेल, असे म्हटले आहे.. आणि नागपूरची महापालिका? ती तर कजर्बाजारीपणाने कधीचीच खंगली आहे. आता एलबीटी बंद होणार असल्याने तिचे आर्थिक अपंगत्व आणखीच वाढणार आहे. कर्मचा:यांचे पगार करायला बँकांमधील ठेवी मोडीत काढण्याची पाळी आलेली. ही महापालिका मेट्रो रेल्वेचा अडीच हजार कोटी रुपयांचा खर्च करील, ही शक्यताही दुरापास्त आहे. त्यातून पंतप्रधानांनी हा प्रकल्प पाच वर्षात पूर्ण करण्याची सूचना केली आहे. त्यासाठी दर वर्षी करावा लागणारा अडीच हजार कोटी रुपयांचा खर्च या वर्षापासूनच केंद्र, राज्य व महापालिका यांना करावा लागणार आहे. आर्थिक साह्यावाचून नागपुरातल्या मिहानच्या स्वप्नाचे काय झाले, ते सा:यांच्या डोळ्यांसमोर आहे. कुठलीशी फ्रेंच कंपनी नागपूरला स्मार्ट बनविण्याचे स्वप्न नुकतीच दाखवून गेली. तिच्या स्वप्नात मेट्रो नाही आणि मिहानही नाही. अशा वेळी पडणारा प्रश्न, पैशांवाचून ही मेट्रो उभी राहणार कशी व धावणार कशी, हा आहे. तो विचारायचा यासाठी, की अशाच स्वप्नांच्या मागे लागून नागपूरचा नागरिक याआधी बुडाला आहे. मिहान येणार, त्यासाठी विमानतळ होणार, तो झाला की जगभरची चीजवस्तू नागपुरात उतरणार आणि भारतभरच्या निर्यातीला येथून वाट मिळणार, असे स्वप्न ते दाखविणा:यांनी एकेकाळी रंगविले. परिणामी, मिहानभोवतीच्या जमिनीच्या किमती वाढणार, असे वाटून नागपूर व विदर्भातीलच नव्हे, तर त्या सा:या परिसरातील अनेकांनी आपले किडूकमिडूक विकून त्या जमिनी विकत घेतल्या. त्यात दलाल, ठेकेदार व बडे भांडवलदारही आले. अनेक राजकारण्यांनीही त्यात आपल्या जमीनदा:या कायम केल्या. मिहानमध्ये नोक:या मिळणार म्हणून अनेक आशाळभूतांनी त्यासाठी मोठाल्या पदव्या प्राप्त केल्या. दहा वर्षात मिहानचे मढे झाले. लाखो रुपये वेचून फुटाफुटांनी घेतलेल्या जमिनी वा:यामोलाने विकाव्या लागल्या. ज्यांनी कमवायचे, त्यांनी कमावून घेतले; पण जे बुडाले, त्यांच्यावर आत्महत्येची पाळी आली. गेल्या काळात विदर्भातील शेतक:यांनीच आत्महत्या केल्या असे नाही; तर व्यापारी, जमिनीचे विक्रेते, ठेकेदार आणि जमिनीच्या किमतीमागे धावलेले आशाळभूत अशा सा:यांनाच तो मार्ग पत्करावा लागला. मेट्रोचे स्वप्न नवे आहे. मेट्रो येणार, ती पाच वर्षात पूर्ण होणार आणि जमिनीवरून चालणारे आपण आकाशातून प्रवास करणार, ही नागपूरकरांना लागलेली आशा मोठी आहे. स्वाभाविकच मेट्रोच्या मार्गाभोवतीच्या जमिनींचे भाव अस्मानाला टेकणार म्हणून त्या खरेदी करायला लोक पुन्हा पुढे सरसावले आहेत. आहे ते विकून त्या जमिनी पदरात पाडून घेण्याची स्पर्धा त्यांच्यात आहे आणि हे सारे मुद्दलातले सरकारी धन विचारात न घेताच सुरू झाले आहे. हे सारे एवढय़ा आकांताने सांगायचे तरी कशासाठी? मिहानमध्ये जे वाटय़ाला आले, ते मेट्रोपायी लोकांच्या वाटय़ाला येऊ नये म्हणून. सरकारने लोकांना अशी खोटी स्वप्ने दाखवू नयेत. मिहानसाठी नागपूरकरांनी मोजलेली किंमत मोठी आहे. केंद्र, राज्य व नागपूर महापालिका या तिन्ही ठिकाणी भाजपा सत्तारूढ आहे. त्यामुळे मेट्रोविषयीचा आशावाद बळावणार असला, तरी हा प्रकल्प राजकारणाने पूर्ण होणार नसून, अर्थकारणाने मार्गी लागणार आहे, हे लक्षात घेतलेच पाहिजे.