शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

हडेलहप्पी नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 22:57 IST

एखादा जनहिताचा प्रकल्प राबवित असताना सरकार, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी जनतेला विश्वासात घ्यायला हवे. हडेलहप्पी करुन प्रकल्प रेटून नेऊ नये.

मिलिंद कुलकर्णीएखादा जनहिताचा प्रकल्प राबवित असताना सरकार, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी जनतेला विश्वासात घ्यायला हवे. हडेलहप्पी करुन प्रकल्प रेटून नेऊ नये. असे केल्यास जनसामान्यांमध्ये असंतोष निर्माण होतो, सरकारच्या भूमिकेविषयी अविश्वास निर्माण होतो, प्रकल्प खरोखर जनहिताचा असला तरी प्रखर विरोधामुळे एकतर तो लांबतो किंवा रद्द होतो, या गोष्टी टाळण्यासाठी संवाद आणि समन्वय आवश्यक आहे.यापूर्वी एन्रॉन, जैतापूर, सरदार सरोवर, समृध्दी या आणि अन्य प्रकल्पांविषयी असेच वाद उद्भवले. सत्तेवर कोणताही राजकीय पक्ष असो, त्याची भूमिका ही ‘सरकारी’ असते, हे देखील स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी आणि विरोधी भूमिकेत राजकीय पक्षांची भाषा वेगवेगळी असते, हेदेखील जनतेने अनुभवले. एन्रॉन समुद्रात बुडवायला निघालेली मंडळी नंतर तेच वाचविण्यासाठी करीत असलेला खटाटोप सामान्य जनतेने पाहिला आहे. सरदार सरोवर प्रकल्पातून महाराष्ट्राला वीज मिळाली; पण आदिवासी बांधवांचे मोठे विस्थापन झाले. पुनर्वसित वसाहतींमध्ये अद्यापही पुरेशा सुविधा नाहीत. अनेक कुुटुंबांचे अद्याप पूर्णत: पुनर्वसन झालेले नाही. शासकीय कार्यालयांच्या चकरा मारुन थकलेल्या आदिवासी बांधवांना नैराश्याने ग्रासले आहे.जळगाव जिल्ह्यात अशाच दोन प्रकल्पांविषयी जनमानसात असंतोष व्यक्त होत आहे. भादली (ता.जळगाव) येथील शेतकऱ्यांची शेतजमीन नवीन रेल्वे मार्गासाठी अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव आहे. या जमिनीचा जिल्हा प्रशासनाने ठरवून दिलेला मोबदला पुरेसा नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. याच गावातील काही जमीन महामार्गासाठी अधिग्रहित झाली असता, त्यांना दिलेल्या मोबदल्यापेक्षा हा कमी असल्याचे कारण शेतकरी बांधवांकडून दिले जात आहे. रेल्वेला जमीन देण्यास शेतकरी अनुत्सुक आहेत. त्यांनी आंदोलने करुन शासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रश्न मार्गी लागलेला नाही. शेतकºयांचे म्हणणे समजून घेऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यायला हवा. परंतु तसे होताना दिसत नाही. रेल्वे आणि महामार्ग प्राधीकरण ही केंद्र शासनाची महामंडळे आहेत. मग मोबदल्यामध्ये एवढी भिन्नता कशी? भिन्नता असेल तर ती दूर करण्यासाठी खरे तर लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करायला हवेत. शासकीय अधिकाºयांना मर्यादा आहेत, त्यामुळे ही अपेक्षा चुकीची ठरणार नाही. परंतु त्या पातळीवर निराशा दिसून येते.दुसरा विषय हा जळगाव शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलासंबंधी आहे. काही बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठी उड्डाणपुलाच्या नकाशा व आराखड्यात बदल करण्यात आल्याची तक्रार शिवाजीनगरातील रहिवाशांनी केली आहे. महापालिकेत ना हरकत दाखल्यासाठी सादर केलेला आराखडा वेगळा होता, तर आता निविदेसाठी तयार असलेला आराखडा वेगळा असल्याचा रहिवाशांचा दावा आहे. रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका या शासनाच्या संबंधित यंत्रणांमधील गोंधळामुळे एकूणच या प्रकरणाविषयी संशय निर्माण होऊ लागला आहे. कोणताही जबाबदार अधिकारी समोर येऊन यासंबंधी भूमिका मांडायला तयार नाही. रहिवाशांनी तर आंदोलनांतर न्यायालयात जाण्याची तयारी चालवली आहे.विकास कामांमध्ये पारदर्शकता, जनतेशी संवाद आणि समन्वय नसणे या बाबींमुळे कामांना विरोध होतो, ती लांबतात, निर्मिती खर्चात वाढ होते आणि नागरिक सुविधांपासून वंचित राहतात. केवळ प्रशासनाच्या हडेलहप्पी भूमिकेमुळे हे घडते. 

टॅग्स :Jalgaonजळगाव