शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

काम मिळत नाही अन् कामाची माणसंही मिळत नाहीत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 22:21 IST

वैद्यकीय क्षेत्रात अजूनही हजारो रुग्णांमागे एक डॉक्टर ही स्थिती नाही

 

धर्मराज हल्लाळे

एकिकडे काम मिळत नाही ही ओरड आहे. ज्यामुळे बेरोजगारीचा टक्का कमी होत नाही. त्याचवेळी अनेक उद्योग व्यवसायात कौशल्य असणारी माणसं मिळत नाहीत. म्हणजेच कामाची माणसं मिळत नाहीत, असाही सूर उमटतो. ही विसंगती असली तरी वस्तुस्थिती आहे. त्यात बदल करण्यासाठी केंद्र शासनाने देशपातळीवर २०२५ पर्यंत ५० टक्के विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देण्याचे धोरण समोर ठेवले आहे. हेतू उत्तम आहे. परंतु, त्याची वाटचाल कशी होते, यावरच यश अवलंबून आहे. स्थानिक गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रमांची निर्मिती करण्याचा विचार आहे. जसा अभ्यासक्रमांचा विचार केला, तसाच स्थानिक पातळीवर कोणत्या प्रकारचे मनुष्यबळ किती प्रमाणात लागणार आहेत, याचाही अंदाज आला पाहिजे. प्रत्येक ज्ञानशाखेचे निश्चितच महत्त्व आहे. परंतु, किती विद्यार्थ्यांनी कोणते शिक्षण घ्यावे, याची कसलीही आखणी नाही. त्याला मर्यादाही घालता येत नाहीत. मुळातच जे ताट वाढून ठेवलेले आहे, त्यावरच उदरभरण करणे हाच पर्याय उरतो. बारावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर आजही ग्रामीण महाराष्ट्रात मोठ्या संख्येने पारंपरिक शिक्षण देणारे महाविद्यालये मोठ्या संख्येने आहेत. त्याला व्यावसायिक शिक्षणाची जोड देण्याचा विचार नव्या धोरणात मांडला आहे, तो नक्कीच स्वागतार्ह आहे. परंतु, आजघडीला विज्ञान, वाणिज्य शाखेला किमान काही रोजगार मार्ग उपलब्ध आहे. मात्र कला शाखेच्या विद्यार्थ्यांना शिक्षक, प्राध्यापक होण्यापलिकडे काय करता येईल, हा मोठा प्रश्न आहे. आज नाही म्हणायला विद्यार्थी मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षेचा मार्ग अनुसरत आहेत. मात्र तिथेही नुसतीच गर्दी आहे. किती जणांना संधी मिळेल, हे मोठे कोडे आहे. तरीही लाखोंच्या संख्येने कला शाखेची पदवी मिळालेला मोठा वर्ग पुढे काय करायचे म्हणून स्पर्धा परीक्षेचा पर्याय निवडतो. ज्यांनी गुणवत्ता सिद्ध केली, सेट-नेट परीक्षांमध्ये यश मिळविले त्यांनाही नोकरी मिळत नाही. मुळातच गेली अनेक वर्षे भरती प्रक्रियाच थंड आहे. त्यातही जितक्या जागा उपलब्ध आहेत, त्याच्या किती तरी पटीने पदव्या घेऊन रांगा लागलेल्या आहेत. 

वैद्यकीय क्षेत्रात अजूनही हजारो रुग्णांमागे एक डॉक्टर ही स्थिती नाही. वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या मर्यादित, जागा मर्यादित तरीही डॉक्टरांना स्पर्धा करावी लागत असली, तरी इतर क्षेत्राइतका भयावह रोजगाराचा प्रश्न वैद्यकीय क्षेत्रात नाही. तुलनेने अभियांत्रिकी क्षेत्रात मात्र निघालेले भरमसाठ महाविद्यालय उपलब्ध जागा तुलनेने विद्यार्थी कमी, अशी स्थिती आहे. आम्हाला किती डॉक्टरांची गरज आहे? किती अभियंते लागणार आहेत? किती शिक्षक लागणार आहेत? याचा काही अभ्यास केला जाणार आहे का, हा प्रश्न आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक धोरणातील व्यावसायिक शिक्षणाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. बाराव्या पंचवार्षिक योजनेतील निष्कर्षानुसार भारतामध्ये विविध क्षेत्रात कार्यरत असणाºया १९ ते २४ या वयोगटांतील ५ टक्के लोकांनीही व्यावसायिक शिक्षण घेतलेले नव्हते. हा टक्का वाढविण्याचा प्रयत्न येणाºया ५ वर्षांमध्ये केला जाणार आहे. मात्र केवळ व्यावसायिक शिक्षण देऊन चालणार नाही, त्याचबरोबर समाजाच्या गरजांचाही अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. शिवाय, आजघडीला व्यावसायिक शिक्षण देणाºया अनेक संस्था अस्तित्वात आहेत. तेथीलच विद्यार्थी किती गुणवत्ता घेऊन बाहेर पडतात, याचेही कधी तरी अवलोकन करण्याची गरज आहे. आजच्या स्थितीत जे विद्यार्थी व्यावसायिक शिक्षण घेत आहेत, त्यांना तरी रोजगार मिळतो का अथवा ते तरी विद्यार्थी रोजगारक्षम शिक्षण घेऊन बाहेर पडतात का? हा चिंतनाचा विषय आहे. अन्यथा केवळ पदव्यांचे भेंडोळे घेऊन बेरोजगारांचे तांडेच्या तांडे बाहेर पडतील आणि पुन्हा आपण हेच म्हणू, कामाची माणसं मिळत नाहीत.

शाळा-महाविद्यालयांपासून विद्यापीठापर्यंत सर्वच संस्थांना व्यावसायिक शिक्षणासाठी जोडावे लागणार आहे. मात्र त्यासाठी अभ्यासक्रमाचे एकत्रिकरण करण्याचे आवाहन आहे. शिक्षण धोरणानुसार शासन समिती गठित करुन मंत्रालयाचा ताळमेळ बसवील, अशी अपेक्षा आहे. याशिवाय भविष्यात ज्ञानशाखांची बंधने असणार नाहीत, हे विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. आज कला शाखेत रूची असणारा विद्यार्थी अकाऊंटस् विषयाकडे वळू शकत नाही. अथवा अकाऊंटस् शिक्षणारा विद्यार्थी इतिहास अभ्यासू शकत नाही. ही बंधने दूर झाली, तर विद्यार्थ्यांना बहुपर्यायी शिक्षण मिळेल. ज्यामुळे आवडीच्या क्षेत्रात पुढे जाता येईल. सदर पारंपरिक शिक्षण शिकत असतानाच काही कौशल्ये आत्मसात करता आली तर विद्यार्थ्यांना रोजगार मिळविणे शक्य होईल. मात्र कौशल्याचा अंतर्भाव कुचकामी असता कामा नये. नावापुरते कौशल्य आणि नावापुरतेच गुणांकन असेल तर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न होईल.

टॅग्स :jobनोकरीEmployeeकर्मचारीdoctorडॉक्टरMedicalवैद्यकीय