शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
8
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
9
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
10
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
11
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
12
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
13
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
14
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
15
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
16
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
17
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
18
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
19
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
20
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट

पित्रोदांना कानपिचक्या देणाऱ्या राहुल गांधींचे कौतुक करायचे की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 05:11 IST

राहुल गांधींनी सॅम पित्रोदा या आपल्या वरिष्ठ सहकाऱ्याला; त्याने शीखविरोधी दंगलीविषयी अपमानकारक उद्गार काढल्याबद्दल केवळ दटावलेच नाही, तर क्षमा मागायलाही भाग पाडले.

राहुल गांधींनी सॅम पित्रोदा या आपल्या वरिष्ठ सहकाऱ्याला; त्याने शीखविरोधी दंगलीविषयी अपमानकारक उद्गार काढल्याबद्दल केवळ दटावलेच नाही, तर क्षमा मागायलाही भाग पाडले. ज्या माणसाने सारा भारत तारांवाचून जोडून दिला त्या विज्ञानवादी संशोधकाबाबत राहुल गांधींनी एवढी कडक भूमिका घेतली असेल; तर त्यांचे नेतृत्व प्रस्थापित झाले असल्याचा तो संकेत आहे. त्याचवेळी पक्ष व त्याची प्रतिमा जपण्यासाठी कोणत्याही प्रबळ व्यक्तीला ठणकावण्याची त्यांची तयारी आहे हेही त्यातून साऱ्यांच्या लक्षात येणारे आहे.

या तुलनेत नरेंद्र मोदी आणि त्यांचे साथीदार अमित शहा यांच्या भाषणातला जोर आणि वागण्यातील दुबळेपणही समजून घ्यावे असे आहे. त्यांच्या पक्षातील गिरिराजसिंगांपासून स्मृती इराणीपर्यंत आणि प्रज्ञासिंह ठाकूरपासून रावसाहेब दानवेंपर्यंत अनेकांनी आजवर जे अकलेचे तारे तोडले व पक्षाची प्रतिमा डागाळली त्यांना साध्या शब्दांनीही या पुढाºयांनी कधी सुनावले नाही. उलट त्यांच्या पोरकट व वाचाळपणाचा त्यांना आनंदच झाला असावा असे वाटायला लावणारे त्यांचे वर्तन राहिले. गांधीजींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडणारी मूर्ख स्त्री आणि तिचा सत्कार करणारे मूर्खजन किंवा ‘गोडसेने गांधीजींऐवजी नेहरूंना मारले असते तर बरे झाले असते’ असे बेशरम उद्गार काढणारे त्यांच्या पक्षाचे पुढारी, कोणत्याही दटावणीवाचून मोकळे राहिले. परिणामी त्यांची ग्रामपातळीवरची बालके आणखीच बेताल बोलताना व वागताना दिसली.

उत्तर प्रदेशातील हत्यांकाडे, गुजरातमधील नरसंहार, ओडिशामधील जळीत कांड, झारखंड आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांची मुक्ताफळे या सा-या गोष्टी मोदींना ठाऊक असणा-याच आहेत आणि त्यावर त्यांनी जराही नापसंती दाखविली नसेल तर त्या त्यांना मान्य होणाºया व पसंत पडणा-या आहेत असेच समजले पाहिजे. संघटनेतील सगळ्या ब-यावाईट प्रकाराबद्दल संबंधितांना जबाबदार धरले जात नसेल तर त्या सा-यांची जबाबदारी नेतृत्वावर येते ही बाब मोदींना माहीत नसावी असे कोण म्हणेल? स्वत: मोदींनीच महात्मा गांधींपासून राहुल यांच्यापर्यंत जी शेलकी भाषा त्यांच्या भाषणात वापरली, शरद पवार, ममता बॅनर्जी किंवा नवीन पटनायक यांना ज्या तºहेची नावे ठेवली तो सारा प्रकार त्यांच्या अनुयायांना आवडला असावा व त्याचमुळे त्यांनी त्याविषयी नाराजी न दर्शविता त्यावर टाळ्या वाजवल्या असाव्या. नेते पक्ष दुरुस्त करतात आणि नेतेच पक्ष बिघडवितातही.

जगातील अनेक देश, समाज, पक्ष व संघटना नेत्यांच्या चिथावणीमुळे किंवा प्रोत्साहनामुळे कशा बिघडल्या याची अनेक उदाहरणे येथे सांगता येतील. भारताच्या सभ्य राजकारणाला हे विकृत वळण ज्यांनी दिले त्यांना काय म्हणायचे? आणि तसे वळण देऊ पाहणा-यांना जे घाबरतात व सुखावतात त्यांची प्रशंसा किती करावी? टाइम या जागतिक नियतकालिकाने मोदींना ‘देशाचा दुभंगकर्ता पुढारी’ म्हटले व तसा त्यांचा फोटो आपल्या मुखपृष्ठावर छापला. त्या चित्राचा व विशेषणाचा अर्थ समजूनही न घेता महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष दानवे म्हणाले, ही जगाने केलेली मोदींची प्रशंसा आहे अशी समजूतदार व शून्य बुद्धीची माणसे ज्या पक्षात प्रदेशाध्यक्ष असतात त्या पक्षाला आणि त्याच्या नेत्याला म्हणायचे तरी काय? आणि ते समजतील तरी काय? विरोधी पक्षांना नावे ठेवली, त्यांच्या पुढा-यांना मोठीमोठी नावे ठेवली आणि इतिहासाचे खोटे दाखले दिले तरी ज्यांचे पक्ष सुखावतात त्या नेत्यांचे एक बरे असते. त्यांना अभ्यास लागत नाही, वाचन लागत नाही, काही समजून घ्यावेसे वाटत नाही.

कारण त्यांनी कोणतीही मुक्ताफळे उधळली, चुकीचे संदर्भ दिले किंवा त्यांच्या माहितीत विसंगती- तफावत आढळली, तरी समोरच्या आज्ञाधारकांचा वर्ग टाळ्याच वाजवीत असतो. या पार्श्वभूमीवर पित्रोदासारख्यांना जाहीर कानपिचक्या देणाऱ्या राहुल गांधींचे कौतुक करायचे की नाही?

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक