शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पित्रोदांना कानपिचक्या देणाऱ्या राहुल गांधींचे कौतुक करायचे की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 05:11 IST

राहुल गांधींनी सॅम पित्रोदा या आपल्या वरिष्ठ सहकाऱ्याला; त्याने शीखविरोधी दंगलीविषयी अपमानकारक उद्गार काढल्याबद्दल केवळ दटावलेच नाही, तर क्षमा मागायलाही भाग पाडले.

राहुल गांधींनी सॅम पित्रोदा या आपल्या वरिष्ठ सहकाऱ्याला; त्याने शीखविरोधी दंगलीविषयी अपमानकारक उद्गार काढल्याबद्दल केवळ दटावलेच नाही, तर क्षमा मागायलाही भाग पाडले. ज्या माणसाने सारा भारत तारांवाचून जोडून दिला त्या विज्ञानवादी संशोधकाबाबत राहुल गांधींनी एवढी कडक भूमिका घेतली असेल; तर त्यांचे नेतृत्व प्रस्थापित झाले असल्याचा तो संकेत आहे. त्याचवेळी पक्ष व त्याची प्रतिमा जपण्यासाठी कोणत्याही प्रबळ व्यक्तीला ठणकावण्याची त्यांची तयारी आहे हेही त्यातून साऱ्यांच्या लक्षात येणारे आहे.

या तुलनेत नरेंद्र मोदी आणि त्यांचे साथीदार अमित शहा यांच्या भाषणातला जोर आणि वागण्यातील दुबळेपणही समजून घ्यावे असे आहे. त्यांच्या पक्षातील गिरिराजसिंगांपासून स्मृती इराणीपर्यंत आणि प्रज्ञासिंह ठाकूरपासून रावसाहेब दानवेंपर्यंत अनेकांनी आजवर जे अकलेचे तारे तोडले व पक्षाची प्रतिमा डागाळली त्यांना साध्या शब्दांनीही या पुढाºयांनी कधी सुनावले नाही. उलट त्यांच्या पोरकट व वाचाळपणाचा त्यांना आनंदच झाला असावा असे वाटायला लावणारे त्यांचे वर्तन राहिले. गांधीजींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडणारी मूर्ख स्त्री आणि तिचा सत्कार करणारे मूर्खजन किंवा ‘गोडसेने गांधीजींऐवजी नेहरूंना मारले असते तर बरे झाले असते’ असे बेशरम उद्गार काढणारे त्यांच्या पक्षाचे पुढारी, कोणत्याही दटावणीवाचून मोकळे राहिले. परिणामी त्यांची ग्रामपातळीवरची बालके आणखीच बेताल बोलताना व वागताना दिसली.

उत्तर प्रदेशातील हत्यांकाडे, गुजरातमधील नरसंहार, ओडिशामधील जळीत कांड, झारखंड आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांची मुक्ताफळे या सा-या गोष्टी मोदींना ठाऊक असणा-याच आहेत आणि त्यावर त्यांनी जराही नापसंती दाखविली नसेल तर त्या त्यांना मान्य होणाºया व पसंत पडणा-या आहेत असेच समजले पाहिजे. संघटनेतील सगळ्या ब-यावाईट प्रकाराबद्दल संबंधितांना जबाबदार धरले जात नसेल तर त्या सा-यांची जबाबदारी नेतृत्वावर येते ही बाब मोदींना माहीत नसावी असे कोण म्हणेल? स्वत: मोदींनीच महात्मा गांधींपासून राहुल यांच्यापर्यंत जी शेलकी भाषा त्यांच्या भाषणात वापरली, शरद पवार, ममता बॅनर्जी किंवा नवीन पटनायक यांना ज्या तºहेची नावे ठेवली तो सारा प्रकार त्यांच्या अनुयायांना आवडला असावा व त्याचमुळे त्यांनी त्याविषयी नाराजी न दर्शविता त्यावर टाळ्या वाजवल्या असाव्या. नेते पक्ष दुरुस्त करतात आणि नेतेच पक्ष बिघडवितातही.

जगातील अनेक देश, समाज, पक्ष व संघटना नेत्यांच्या चिथावणीमुळे किंवा प्रोत्साहनामुळे कशा बिघडल्या याची अनेक उदाहरणे येथे सांगता येतील. भारताच्या सभ्य राजकारणाला हे विकृत वळण ज्यांनी दिले त्यांना काय म्हणायचे? आणि तसे वळण देऊ पाहणा-यांना जे घाबरतात व सुखावतात त्यांची प्रशंसा किती करावी? टाइम या जागतिक नियतकालिकाने मोदींना ‘देशाचा दुभंगकर्ता पुढारी’ म्हटले व तसा त्यांचा फोटो आपल्या मुखपृष्ठावर छापला. त्या चित्राचा व विशेषणाचा अर्थ समजूनही न घेता महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष दानवे म्हणाले, ही जगाने केलेली मोदींची प्रशंसा आहे अशी समजूतदार व शून्य बुद्धीची माणसे ज्या पक्षात प्रदेशाध्यक्ष असतात त्या पक्षाला आणि त्याच्या नेत्याला म्हणायचे तरी काय? आणि ते समजतील तरी काय? विरोधी पक्षांना नावे ठेवली, त्यांच्या पुढा-यांना मोठीमोठी नावे ठेवली आणि इतिहासाचे खोटे दाखले दिले तरी ज्यांचे पक्ष सुखावतात त्या नेत्यांचे एक बरे असते. त्यांना अभ्यास लागत नाही, वाचन लागत नाही, काही समजून घ्यावेसे वाटत नाही.

कारण त्यांनी कोणतीही मुक्ताफळे उधळली, चुकीचे संदर्भ दिले किंवा त्यांच्या माहितीत विसंगती- तफावत आढळली, तरी समोरच्या आज्ञाधारकांचा वर्ग टाळ्याच वाजवीत असतो. या पार्श्वभूमीवर पित्रोदासारख्यांना जाहीर कानपिचक्या देणाऱ्या राहुल गांधींचे कौतुक करायचे की नाही?

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक