शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

ख्रिस्ती नागरिकांना असुरक्षित वाटते का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 17:49 IST

गोव्यात ‘जनमत कौला’संदर्भात चालू असलेल्या वादामुळे एक नवीनच प्रश्न उपस्थित झाला आहे, तो आहे गोव्यातील ख्रिस्ती लोकसंख्येला या भूमीत असुरक्षित वाटते का?

- राजू नायक

गेल्या १० वर्षात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवतेय ती म्हणजे, गोवा सोडून ख्रिस्ती लोकांचे पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारणे. अधिक प्रगतीशील जीवनपद्धतीसाठी लोक मोठ्या संख्येने पोर्तुगाल, ब्रिटन व कॅनडात स्थायिक होऊ लागले असून त्यांना पोर्तुगाल संबंधांचा त्यासाठी फायदा मिळतो. ख्रिस्ती वाचकप्रियता असलेल्या त्यांच्या वृत्तपत्रांमध्ये गोवा ‘स्वतंत्र’ झालाच नाही, तो भारताने सैन्य पाठवून काबीज केला, असा उल्लेख वारंवार केला जातो.

‘वावराडय़ांचो इश्ट’ या रोमन कोकणी वृत्तपत्रात व दुस-या एका इंग्रजी वृत्तपत्रात तसे लेख छापून आलेले आहेत. तसे करताना हे लेखक एका सर्वोच्च न्यायालयाच्या १९६० दशकात दिलेल्या निकालाचा हवाला संदर्भ सोडून देतात.  नागरिकत्वाच्या प्रश्नावर एका गोवेकर ख्रिस्ती पाद्रीने गुदरलेल्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की गोव्याचे भारताने ‘सामिलीकरण’ करून घेतले. ‘त्यामुळे लोकपाठिंब्याने मिळविलेली ही गोवा मुक्ती नसून सैन्य पाठवून भारताने हा प्रांत काबीज केला,’ असा दावा काही ख्रिस्ती विचारवंत करतात. तसे करून पोर्तुगालशी असलेल्या आपल्या सांस्कृतिक वारशाला ते अभिमानाने मिरवत असतात.

‘जनमत कौला’च्या वादात हा प्रश्न नव्याने उद्भवण्याचे कारण म्हणजे गोवा मुक्ती श्रेष्ठ की जनमत कौलाचा विजय श्रेष्ठ याविषयावरचे विचारमंथन. गोवा फॉरवर्ड या प्रादेशिक पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाईंनी हल्लीच जनमत कौल श्रेष्ठ अशी भूमिका घेतल्याने त्यावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. रा. स्व. संघाचे बंडखोर व नव्याने स्थापन केलेल्या पक्षाचे प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी त्यांचा निषेध करून निवडणुकीत सरदेसाईंना धडा शिकविण्याचे आव्हान दिले आहे. सरदेसाईंनीही ते आव्हान स्वीकारून वेलिंगकर हे राष्ट्रवादाच्या आडून ‘महाराष्ट्रवाद’ चालवत असल्याचा आरोप केला. लेखक उदय भेंब्रे यांनी सरदेसाई यांच्यावर दांभिकपणाचा आरोप करून ते स्वातंत्र्यलढा व स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करीत असल्याचे मत मांडले.

गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रवक्ते प्रशांत नाईक यांनी जनमत कौलाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी मुद्दामच हा वाद उकरून काढला गेला व गोवेकर असल्याचा अभिमान तरुणांमध्ये जागृत करणे हा त्यामागचा उद्देश असल्याचे मत मांडले आहे.

एक गोष्ट खरी आहे की गोव्यात ख्रिस्ती अल्पसंख्य होत असल्यामुळे असुरक्षितपणाची भावना ख्रिस्ती समाजामध्ये आहे. गोव्याची लोकसंख्या गेल्या ५० वर्षात दुप्पट वाढली. त्यात अन्य भाषिक लोकांचा भरणा अधिक आहे. त्यामुळे ख्रिस्ती लोकसंख्या आज केवळ २१ टक्के बनली आहे. हिंदुत्ववादाच्या देशातील वाढत्या प्रभावामुळेही व अन्न तसेच पेहरावातील फरकामुळेही त्यांना लक्ष्य बनविले जात असल्याने अल्पसंख्य हवालदील बनल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील ख्रिस्ती नागरिकांची अस्वस्थता त्यांना बचावात्मक भूमिका घेण्यास भाग पाडू लागल्याचे निरीक्षकांचे मत आहे. जनमत कौलातील नेते ज्ॉक सिकैरा यांचा पुतळा विधानसभा संकुलात उभारावा व जनमत कौलाचा धडा पाठय़पुस्तकात समाविष्ट करावा अशाही मागण्या गोवा फॉरवर्डने आपल्या भूमिकेच्या पुष्टय़र्थ पुढे केल्या आहेत.

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत)

टॅग्स :goaगोवा