शहरं
Join us  
Trending Stories
1
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
2
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
3
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
4
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
5
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
6
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
7
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
8
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
9
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
10
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
11
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
12
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
13
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
14
Tarot Card: येत्या आठवड्यात वर्ष बदलतेय, त्याबरोबर भाग्यही बदलणार? वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
15
भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार
16
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात भाजपा-शिंदेसेनेची युती अधांतरी, कार्यकर्त्यांत संभ्रम; गिरीश महाजनांना साकडं
17
आपल्या मुलांसाठी LIC च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; जबरदस्त रिटर्नसह मिळेल इन्शुरन्स, पटापट पाहा डिटेल्स
18
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
19
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
20
Post Office Investment Scheme: दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

ख्रिस्ती नागरिकांना असुरक्षित वाटते का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 17:49 IST

गोव्यात ‘जनमत कौला’संदर्भात चालू असलेल्या वादामुळे एक नवीनच प्रश्न उपस्थित झाला आहे, तो आहे गोव्यातील ख्रिस्ती लोकसंख्येला या भूमीत असुरक्षित वाटते का?

- राजू नायक

गेल्या १० वर्षात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवतेय ती म्हणजे, गोवा सोडून ख्रिस्ती लोकांचे पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारणे. अधिक प्रगतीशील जीवनपद्धतीसाठी लोक मोठ्या संख्येने पोर्तुगाल, ब्रिटन व कॅनडात स्थायिक होऊ लागले असून त्यांना पोर्तुगाल संबंधांचा त्यासाठी फायदा मिळतो. ख्रिस्ती वाचकप्रियता असलेल्या त्यांच्या वृत्तपत्रांमध्ये गोवा ‘स्वतंत्र’ झालाच नाही, तो भारताने सैन्य पाठवून काबीज केला, असा उल्लेख वारंवार केला जातो.

‘वावराडय़ांचो इश्ट’ या रोमन कोकणी वृत्तपत्रात व दुस-या एका इंग्रजी वृत्तपत्रात तसे लेख छापून आलेले आहेत. तसे करताना हे लेखक एका सर्वोच्च न्यायालयाच्या १९६० दशकात दिलेल्या निकालाचा हवाला संदर्भ सोडून देतात.  नागरिकत्वाच्या प्रश्नावर एका गोवेकर ख्रिस्ती पाद्रीने गुदरलेल्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की गोव्याचे भारताने ‘सामिलीकरण’ करून घेतले. ‘त्यामुळे लोकपाठिंब्याने मिळविलेली ही गोवा मुक्ती नसून सैन्य पाठवून भारताने हा प्रांत काबीज केला,’ असा दावा काही ख्रिस्ती विचारवंत करतात. तसे करून पोर्तुगालशी असलेल्या आपल्या सांस्कृतिक वारशाला ते अभिमानाने मिरवत असतात.

‘जनमत कौला’च्या वादात हा प्रश्न नव्याने उद्भवण्याचे कारण म्हणजे गोवा मुक्ती श्रेष्ठ की जनमत कौलाचा विजय श्रेष्ठ याविषयावरचे विचारमंथन. गोवा फॉरवर्ड या प्रादेशिक पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाईंनी हल्लीच जनमत कौल श्रेष्ठ अशी भूमिका घेतल्याने त्यावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. रा. स्व. संघाचे बंडखोर व नव्याने स्थापन केलेल्या पक्षाचे प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी त्यांचा निषेध करून निवडणुकीत सरदेसाईंना धडा शिकविण्याचे आव्हान दिले आहे. सरदेसाईंनीही ते आव्हान स्वीकारून वेलिंगकर हे राष्ट्रवादाच्या आडून ‘महाराष्ट्रवाद’ चालवत असल्याचा आरोप केला. लेखक उदय भेंब्रे यांनी सरदेसाई यांच्यावर दांभिकपणाचा आरोप करून ते स्वातंत्र्यलढा व स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करीत असल्याचे मत मांडले.

गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रवक्ते प्रशांत नाईक यांनी जनमत कौलाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी मुद्दामच हा वाद उकरून काढला गेला व गोवेकर असल्याचा अभिमान तरुणांमध्ये जागृत करणे हा त्यामागचा उद्देश असल्याचे मत मांडले आहे.

एक गोष्ट खरी आहे की गोव्यात ख्रिस्ती अल्पसंख्य होत असल्यामुळे असुरक्षितपणाची भावना ख्रिस्ती समाजामध्ये आहे. गोव्याची लोकसंख्या गेल्या ५० वर्षात दुप्पट वाढली. त्यात अन्य भाषिक लोकांचा भरणा अधिक आहे. त्यामुळे ख्रिस्ती लोकसंख्या आज केवळ २१ टक्के बनली आहे. हिंदुत्ववादाच्या देशातील वाढत्या प्रभावामुळेही व अन्न तसेच पेहरावातील फरकामुळेही त्यांना लक्ष्य बनविले जात असल्याने अल्पसंख्य हवालदील बनल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील ख्रिस्ती नागरिकांची अस्वस्थता त्यांना बचावात्मक भूमिका घेण्यास भाग पाडू लागल्याचे निरीक्षकांचे मत आहे. जनमत कौलातील नेते ज्ॉक सिकैरा यांचा पुतळा विधानसभा संकुलात उभारावा व जनमत कौलाचा धडा पाठय़पुस्तकात समाविष्ट करावा अशाही मागण्या गोवा फॉरवर्डने आपल्या भूमिकेच्या पुष्टय़र्थ पुढे केल्या आहेत.

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत)

टॅग्स :goaगोवा