शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
4
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
5
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
6
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
7
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
8
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
9
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
10
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
11
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
12
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
13
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
14
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
15
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
16
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
17
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
18
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
19
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
20
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?

किड्यांचे वाद अन् झाड बरबाद

By admin | Published: May 12, 2014 6:35 AM

भीक मागणे चांगले की लूट करणे? भिकारी श्रेष्ठ की लुटारू श्रेष्ठ? कोणी म्हणते लुटण्यापेक्षा भीक मागणे चांगले.

अमर हबीब 

भीक मागणे चांगले की लूट करणे? भिकारी श्रेष्ठ की लुटारू श्रेष्ठ? कोणी म्हणते लुटण्यापेक्षा भीक मागणे चांगले. भीक मागणारा तुमच्या मर्जी विरुद्ध हिसकावून घेत नाही. तो याचना करतो. तुमच्यातील कणव जागृत करतो. करुणेच्या प्रेरणेने तो तुम्हाला दान देण्यास उद्युक्त करतो. भीक मागणे ही पुरातन परंपरा आहे. साधू संन्यासी आपला उदरनिर्वाह लोकांनी दिलेल्या अन्नावरच करायचे. लुटणे पाप आहे. भीक मागणे हे दात्याला पुण्य प्राप्त करून देते. अर्थात, लुटण्यापेक्षा भीक मागणे श्रेष्ठ आहे. लुटणार्‍याच्या बाजूने वेगळे समर्थन येते. तो म्हणतो, माणसाचे माणूसपण त्याच्या स्वाभिमानात असते. मी कोणापुढे वाकत नाही. हात पुढे करीत नाही. मला जे हवे असते ते सरळ हिसकावून घेतो. लूटमार करायला धोका पत्करावा लागतो आणि कष्टही करावे लागतात. भिकारी ना धोका पत्करतो ना त्याची कष्टाची तयारी असते. लुटणे हे येर्‍या गबाळ्याचे काम नाही. त्याला जिगर लागते. दोन्ही बाजू वजनदार आहेत. अशा वेळेस निर्णय करणे मोठे कठीण होऊन जाते. भिकेचे उदात्तीकरण करावे की लुटीचे समर्थन करावे, काही समजत नाही. ही अडचण होण्याचे मुख्य कारण असे, की आपण फक्त दोनच पर्यायांचा विचार करतो. यापेक्षा अन्य पर्यायांचा विचार केला, तर हे दोन्ही पर्याय तकलादू आणि ताज्य आहेत, हे आपल्या लक्षात येईल. कोण्या एकेकाळी जेव्हा माणसाने शेती करायला सुरुवात केली तेव्हा एकदा शेतकर्‍यांकडे एवढे दाणे शिल्लक पडले की जेणे करून त्याला पुढच्या वर्षी अन्नासाठी रानोमाळ भटकायची गरज उरली नाही. शेतकर्‍यांकडे बचत निर्माण झाली. या बचतीवर काहींचा डोळा होता. काही जणांनी त्याच्याकडे याचना केली. ज्यांना जेवढे देणे शक्य होते तेवढे त्याने दिले. पण तो सर्वांच्या याचना पूर्ण करू शकत नव्हता. आपल्या गरजेपुरते त्याने ठेवून घेतले. तो देत नाही म्हटल्यावर काहींनी रातोरात त्यावर हल्ला केला व त्याच्याकडचे धान्य लुटून नेले. काम करून पिकविणारा शेतकरी आधी याचकांना बळी गेला नंतर लुटारूंनी त्याचा बळी घेतला. एकंदरीत नागवला गेला शेतकरी. पुन्हा तो राबला. पुन्हा पिकविले. पुन्हा जेव्हा बचत निर्माण झाली तेव्हा लुटारू टपूनच बसले होते. इकडून टोळी आली, तिने शेतकर्‍याला बडविले. तिकडून आली, तिने मारले. जे होते, ते सगळे लुटून नेले. शेतकर्‍याची बचत लुटारूंच्या घरात गेली. लुटारूंना उसंत मिळाली. त्यांनी पुढच्यावर्षी शेतकर्‍यांना लुटण्यासाठी नवी हत्यारे निर्माण केली. शेकडो वर्षे या अराजकतेला तोंड देत शेतकरी जमीन कसत होते. शेवटी ते म्हणाले, तुमच्या पैकी एकाने आम्हाला इतरांपासून संरक्षण द्यावे, आम्ही त्याला अर्धा माल देऊ. एका टोळीने हमी दिली. ती टोळी त्या प्रदेशाची राजा मानली गेली. शेती उत्पादनाचा ठरलेला हिस्सा महसूल झाला. लुटारूंमध्ये धाडस होते. ते धोका पत्करत होते. चार हात करण्याची त्यांची क्षमता होती. पण समाजातील सगळे लोक असे नव्हते. नसतातच. जे धाडसी नव्हते. जे कर्तबगार नव्हते, अंगचुकार होते. त्यांचीही शेतमालाला पाहून जीभ लवलवत होती. त्यांनी नवी शक्कल काढली. ते म्हणाले, तुला शेती करायला पाऊस लागतो. तो पाऊस जो इंद्रदेव देतो तो आमचे ऐकतो. तुला जर पाऊस हवा असेल, तर इंद्रदेव प्रसन्न करायला हवा. तू दाणे देऊन आम्हाला प्रसन्न कर आम्ही देवाला तुझी शिफारस करू. अशा नाना गोष्टी सांगून दाणे हस्तगत करणारा एक नवा वर्ग तयार झाला. तो पुरोहित वर्ग. लुटारूंमधून जसा राजा जन्माला आला तसा शेतकर्‍यांच्या दाण्यांची भीक मागणार्‍यांमधून पुरोहितवर्ग जन्माला आला. राजसत्ता आणि धर्मसत्ता एकाच उद्देशाने जन्माला आल्या आणि त्यांनी एकच काम केले ते म्हणजे शेतकर्‍यांचे दाणे फस्त करणे. शेतकर्‍यांना नागवणे. सगळा समाज भिकार्‍यांचा झाला, तर तो जगू शकत नाही, तसेच सगळा समाज लुटारूंचाही असू शकत नाही. भीक देणारा असल्याशिवाय भिकारी जगू शकत नाही, तसेच लुटायलाही कोणी तरी लागतोच, त्याच्या अस्तित्वाशिवाय लुटारूला अस्तित्व असू शकत नाही. भिकारी आणि लुटारू हे परोपजीवी किडे आहेत. ते कोणाच्यातरी अस्तित्वावर जगत असतात. उत्पादक हे खरे झाड आहे. शेतकरी असो की अन्य कोणी उत्पादक. त्यांच्या जीवावर अनेक लोक जगत असतात. त्यामुळेच त्यांना पोशिंंदा म्हटले आहे. लुटारू आणि भिकारी हे दोन्हीही झाड नासवणारे किडे आहेत. एक किडा म्हणतो, मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. दुसरा म्हणतो, तू नाही मी श्रेष्ठ आहे. या वादात बिचार्‍या झाडाकडे कोणी पाहत नाही. किडा जर झाडाला अपायकारक असेल, तर तो मारला पाहिजे; कारण झाड जगले पाहिजे. आज झाड कृश झाले आहे आणि लुटारू आणि याचक मालक झाले आहेत. खरा प्रश्न झाड कसे जगेल, हा असला पाहिजे.