शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

नाणारची भरकटलेली दिशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 05:26 IST

हिंदुत्वासाठी एकत्र येऊन राजकारण करतो, अशा शपथा घेणाऱ्या शिवसेना-भाजपाची विकासाच्या धोरणावर मात्र टोकाची भूमिका आहे.

हिंदुत्वासाठी एकत्र येऊन राजकारण करतो, अशा शपथा घेणाऱ्या शिवसेना-भाजपाची विकासाच्या धोरणावर मात्र टोकाची भूमिका आहे. त्याचाच बळी नाणारचा प्रकल्प ठरला आहे. हा प्रकल्प रद्द करून महाराष्ट्राने पुन्हा एकदा नकारात्मक भूमिका बजावली आहे.ॅहिंदुत्व हा आमचा प्राण आहे. देशहितासाठी तो आम्ही जपतो आणि त्यासाठी एकत्र येऊन राजकारण करतो, अशा शपथा घेणाऱ्या शिवसेना-भारतीय जनता पक्षाची विकासाच्या धोरणावर मात्र टोकाची भूमिका आहे. त्याचाच बळी नाणारचा प्रकल्प ठरला आहे. इंडियन आॅईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन भारताच्या आघाडीवरील तेल कंपन्यांनी एकत्र येऊन तेल शुद्धीकरणासाठी ही कंपनी स्थापन केली होती. या कंपनीच्या उभारणीसाठी तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती. त्यासाठी सुमारे सहा हजार हेक्टर जागा हवी होती. चौदा गावांची ही जागा असणार होती. हा प्रकल्प उभारू दिला असता, तर थेट वीस हजार लोकांना रोजगार मिळणार होता आणि अप्रत्यक्ष पूरक व्यवसायातून ऐंशी हजार जणांना काम मिळणार होते. कोकणाच्या इतिहासात इतका मोठा प्रकल्प प्रथमच उभा राहणार होता. केवळ शिवसेनेच्या विरोधामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय फायद्यासाठी कोकणच्या विकासाचा बळी दिला आहे. सुमारे सहा हजार हेक्टर जागा अधिग्रहण करण्यासाठी काढण्यात आलेली अधिसूचना रद्द करून, हा प्रकल्पच आता होणार नाही, हे सांगण्यात आले. स्थानिक लोकांचा विरोध आणि शिवसेनेचा दबाव हे कारण दिले जाते. सौदी अरेबिया कच्च्या तेलाचा पुरवठा करणार होता. आपला देश तेलाच्या उत्पन्नात स्वयंपूर्ण नाही आणि भविष्यात तो होणारही नाही. आज ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक तेलाची गरज आयात केलेल्या तेलावरच भागविली जाते. परदेशातून कच्चे तेल आणून त्यावर येथे प्रक्रिया करणे अधिक किफायतशीर ठरते. असे प्रकल्प देशाच्या काही भागात यापूर्वीही उभारले आहेत. गुजरात किंवा हरयाणात हे प्रकल्प चालू आहेत. नाणारला उभ्या राहणाºया प्रकल्पाच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक लोकांना ते प्रकल्प प्रत्यक्ष जाऊन दाखविले होते. तेथे प्रदूषणाने हाहाकार उडालेला नाही, की त्या परिसराचे जीवन उद्ध्वस्त झालेले नाही. असे मोठे प्रकल्प उभारण्याचे काम हे राष्टÑ उभारणीच्या कामासारखे असते. रस्ते, रेल्वे प्रकल्प, कारखाने, धरणे, कालवे करताना जमीन लागणार, त्यातून काही जण विस्थापित होणार, हे गृहीत आहे. त्यांचे उत्तमरीत्या पुनर्वसन करणे, हा प्रकल्प उभारणीचा भाग असायला हवा. तो आता सर्वमान्य झाला आहे. महाराष्ट्राची वरदायिनी म्हणून ज्या कोयना धरणाच्या प्रकल्पाचे वर्णन केले जाते, त्या कोयनेच्या खोºयातील हजारो शेतकरी विस्थापित झाले होते. त्यांच्या पुनर्वसनासाठी त्याकाळी ना कायदे होते ना कोणत्या नियमावली होत्या. त्यांनी अनेक वर्षे मागण्या करून आपले पुनर्वसन करण्यासाठी झगडा केला. धरणच होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली असती, तर महाराष्टÑाच्या उभारणीमध्ये कोयना प्रकल्पाने दिलेल्या योगदानाची नोंद झाली असती का? मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गदेखील महाराष्ट्राच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे हा अभिमानाचा विषय म्हणून शिवसेना मिरवते. असे प्रकल्प किंवा नवे प्रयोग उभे राहिल्याशिवाय विकास कसा शक्य आहे. नाणारचा तेलशुद्धीकरण प्रकल्प हा देशाचा प्रकल्प आहे. यावरून छोट्या-छोट्या राजकीय फायद्यासाठी आपण संकुचित भूमिका घेत राहिलो, तर आंतरराष्टÑीय पातळीवरदेखील आपली नाचक्की होते. भारतात गुंतवणूक करण्यासाठी किंवा भारताशी व्यवहार करताना याचाच गांभीर्याने विचार केला जाऊ शकतो. एन्रॉनचा प्रकल्प उभारताना शिवसेना आणि भाजपाने किती दांभिक भूमिका घेतली होती, हे महाराष्टÑाने पाहिले आहे. नाणार प्रकल्प रद्द करण्यामागील भूमिकाही अनाकलनीय आहे. कोकणाचा विकास होत नाही, अशी ओरड करणारेच, आम्हीच कोकणाच्या विकासाचा ठेका घेतला आहे, अशी दुटप्पी भूमिका घेतात, तेव्हा आश्चर्य वाटते. नाणार प्रकल्प रद्द करून महाराष्ट्राने पुन्हा एकदा नकारात्मक भूमिका बजावली आहे. देशहिताच्या वल्गना करणाºयांना हे शोभत नाही. ही महाराष्ट्राची भरकटलेली विकासाची दिशा आहे, असेच म्हणावे लागेल. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येण्याची भूमिका घेणाºयांची विकासाच्या प्रश्नावर विरोधाभासाची भूमिका किती घातक आहे, हे आता लोकांनीच ओळखले पाहिजे.

टॅग्स :Nanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पnanar refinery projectनाणार प्रकल्प