शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

गावगाड्याचे अवघड कोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 16:19 IST

मिलिंद कुलकर्णी महाराषट्रातील १२ हजाराहून अधिक ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला. महाराषट्रात सत्तांतर झाल्यानंतर विधान परिषदेनंतरची ही दुसरी मोठी निवडणूक ...

मिलिंद कुलकर्णी

महाराषट्रातील १२ हजाराहून अधिक ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला. महाराषट्रात सत्तांतर झाल्यानंतर विधान परिषदेनंतरची ही दुसरी मोठी निवडणूक असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. सर्वच राजकीय पक्षांनी विजयाचा दावा केला असला तरी गावगाड्यातील गणित ज्याला समजते, त्याला या अवघड कोड्याचे उत्तर पुरते माहित असते. त्यामुळे या दाव्यांना कितपत महत्त्व द्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.चंद्रकांत पाटील, विखे पाटील, पेरे पाटील यांच्यासारख्या दिग्गजांना आपल्याच गावात सत्ता राखता आलेली नाही हा संदेश खूप काही सांगून जाणारा आहे. असे अनेक नेते आहेत, ज्यांना आपल्या गावातील सत्ता राखताना दमछाक झाली. खटाटोप करुन बहुमत जमवावे लागले. राजकारणाला गावापासून सुरुवात करावी लागते. सत्तेचे सोपान चढत असताना प्रत्येक पायरी जपून चढावी लागते. पाया विसरला की, कळसाला पोहोचूनही फायदा होत नाही. घसरगुंडीला वेळ लागत नाही. त्यामुळे चाणाक्ष राजकारणी गावाच्या राजकारणात प्रत्यक्ष सहभाग घेत नाही. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या पाळधी गावात समर्थकांच्या दोन्ही पॅनलना आशीर्वाद दिला. जो निवडून येईल, तो आपला, हे समीकरण फायद्याचे ठरले. कारण कोणीही नाराज होत नाही. माजी मंत्री गिरीश महाजन यांना मतदारसंघातील नेरी गावात बंडखोरी न शमवता आल्याने फटका बसला. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोथळी गावात निसटते बहुमत मिळाले. गावात पक्के पाय रोवून राजकारणाची शिडी चढावी लागते. त्यामुळे या निकालातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक आजी, माजी पदाधिकाºयांना फटका बसला. लोकप्रतिनिधींच्या नातलगांना पराभवाची नामुष्की पत्करावी लागली.नवख्यांना संधी, प्रस्थापितांना हादरा असे सरसकट विश्लेषणदेखील करता येणार नाही. कारण अनेकांनी वर्षानुवर्षे गावातील सत्ता राखली आहे. अण्णा हजारे, पोपटराव पवार यांनी निवडणूक होऊनदेखील गाव राखले. त्याचे कारणदेखील राजकारणातील नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांनी अभ्यासणे गरजेचे आहे. जनमानस कळणे, लोकहिताची कामे करणे, चुकीच्या कामांना पायबंद घालणे, जवळच्या कार्यकर्त्यांकडून चुकीची कामे होणार नाही, यासाठी दक्षता घेणे, प्रसंगी अशा लोकांना दूर सारणे, गुणवंत, कर्तुत्ववान कार्यकर्त्याला योग्य संधी देणे,  घराणेशाहीचा पुरस्कार न करणे अशी जाणीवपूर्वक राबविलेली धोरणे तुम्हाला स्वत:च्या गावात मानसन्मान मिळवून देतात. गावापेक्षा कुणीही मोठा नसतो, आणि गावच आपल्याला मोठे करते हे कायमस्वरुपी लक्षात ठेवले तर राजकारणात कितीही मोठे झालात तरी गावाचे प्रेम कायम राहील.बहुसंख्य ठिकाणी घराणेशाहीला मतदारांनी नाकारले हे या निवडणुकीचे मोठे वैशिष्टय राहिले आहे. अनेक नेत्यांनी आपल्या कुटुंबियांना उमेदवारी दिली. तालुका, जिल्ह्याला स्वत: पदे  भूषविलेली असताना गावाची सत्तादेखील ताब्यात ठेवण्याची हाव मतदारांना रुचत नाही, हे ठळकपणे समोर आले. मतदारांनी वेचून अशा उमेदवारांना पराभूत केले. स्वत: किती पदे उपभोगावी आणि घरात किती पदे असावी, असा कोणताही दंडक नसला तरी तेवढे तारतम्य सुजाण राजकीय नेत्याने ठेवायला हवे. ते सुटले तर सोबतीला कार्यकर्ते राहत नाही आणि पाठीमागे जनता नसते. अनेक नेत्यांची झालेली अशी अवस्था सभोवताली आपण बघत असतो.ग्रामपंचायतीचे सदस्य निवडून तर आले, आता खरी कसोटी राहील ती सरपंचपदाचे आरक्षण आणि त्यानंतर होणाऱ्या निवडणुकीच्यावेळी रंगणाऱ्या   मानापमान नाट्यातून काय घडते.  आरक्षण काय राहील, एकापेक्षा अधिक इच्छुक असले की, नेते, सूत्रधार यांची कसोटी लागणार आहे. तेव्हा पुन्हा दावे - प्रतिदावे केले जातील. पण एक स्पष्ट आहे, निधी ज्यांच्यामार्फत मिळू शकतो, राजकारणातील महत्वाकांक्षा कोणासोबत गेल्याने पूर्ण होऊ शकते, त्या आमदार, खासदार, सत्ताधारी पक्ष यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न प्रत्येक सरपंच करीत असतो. मग कोणत्याही पक्षाचा पटका गळ्यात घातला तरी त्याला वावगे वाटत नाही. गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणे हे त्याचे आद्यकर्तव्य असते. याची कल्पना राजकीय पक्षांनाही असते. गेल्यावेळी भाजपची सत्ता असल्याने ग्रामीण भागात भाजपची पाळेमुळे रुजल्याचा साक्षात्कार झाला होता. आता महाविकास आघाडीला ग्रामीण जनतेने पसंती दिली असल्याचा निष्कर्ष काढला गेला तर त्याचे आश्चर्य वाटू नये. 

 

टॅग्स :Jalgaonजळगाव