शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

हे बदल सरकारला समजले का? शेतकऱ्यांना आधाराची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 08:20 IST

दगडांच्या राकट देशाने अनेक दुष्काळांचा सामना केला आहे. त्यामुळे ढोबळमानाने कुठल्या उपाययोजना करायच्या याचीही सरकारला माहिती आहे. गरज आहे ती दुष्काळ लवकर जाहीर करून त्या उपाययोजना नोकरशाहीमार्फत प्रभावीपणे राबविण्याची. पण हे होणार का?

राजेंद्र जाधव, शेती प्रश्नांचे अभ्यासक

मान्सूनचा बेभरवशीपणा, चंचलपणा नवीन नाही. हवामान बदलांमुळे दिवसेंदिवस तो वाढतच आहे. तरीही यावर्षी ऑगस्टमध्ये मान्सूनने प्रदीर्घ काळ मारलेली दडी चकवा देणारी होती. अल-निनोच्या प्रभावामुळे देशात नीचांकी पाऊस झाला. ऑगस्टमध्ये एवढा कमी पाऊस यापूर्वीच्या ऐतिहासिक दुष्काळातही पडला नव्हता. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात स्थिती भयावह आहे. कारण देशात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा ३६ टक्के कमी, तर राज्यात ५९ टक्के पाऊस झाला. यामुळे खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटली आहे. पिकांनी माना टाकल्या आहेत. कमी पावसासोबत तापमानात वाढ झाल्याने फुले गळत आहेत.

भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्याने आताच काही ठिकाणी विहिरी कोरड्या पडल्या आहेत. धरणामध्ये पाण्याचा मर्यादित साठा असून, तो शेतीसाठी वापरायचा की पिण्याच्या पाण्यासाठी? असा प्रश्न काही भागात निर्माण होणार आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे क्षेत्र घटणार आहे. पिके वाया गेल्यावर शेतकरी दुभत्या जनावरांच्या जोरावर वर्ष ढकलत असतो. वर्षातून दोनदा पिकांची काढणी होते. दुभती जनावरे मात्र वर्षभर शेतकऱ्यांना थोडे-थोडे उत्पन्न मिळवून देत असतात. दुष्काळामुळे चाऱ्याच्या किमती मान्सूनचा हंगाम संपण्यापूर्वीच वाढत आहेत. येणाऱ्या महिन्यात त्यामध्ये वाढ होऊन चारा विकत घेणे लहान शेतकऱ्यांना आवाक्याबाहेर जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने चारा छावण्यांचे नियोजन सुरू करण्याची गरज आहे.

खरीप हंगाम गेला वायाखरीप हंगाम वाया गेल्याने आणि रब्बीमध्ये उत्पन्नाची आशा नसल्याने शेतकऱ्यांपुढे घेतलेले कर्ज कसे फेडायचे, हा मोठा प्रश्न आहे. खरीप हंगाम संपला की खासगी सावकार आणि वित्तीय संस्था कर्ज परतफेडीचा तगादा लावतात. त्या ओझ्याखाली अनेक शेतकरी आत्महत्या करतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठण करण्यासाठी राज्य सरकारने मदत करण्याची गरज आहे.

शेतमालाचे भाव पाडण्याचे प्रयत्न एका बाजूला मान्सून साथ देत नसताना दुसरीकडे केंद्र सरकार शेतमालाचे भाव पाडण्यासाठी एकापाठोपाठ एक निर्णय घेत आहेत. दुष्काळी वर्षात उत्पादन घटले तर बाजारभावात वाढ होऊन शेतकऱ्यांचा तोटा कमी होतो. महागाई नियंत्रणात ठेवण्याच्या केंद्राच्या अट्टाहासाचा राज्यातील शेतकऱ्यांना फटका बसत आहे. केंद्र सरकारने असे निर्णय घेताना शेतकऱ्यांच्या हिताकडेही लक्ष द्यावे यासाठी राज्य सरकारने पाठपुरावा करण्याची गरज आहे. दुष्काळी वर्षात तग कसा धरायचा, हा शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे. राज्य आणि केंद्र सरकारने एकत्रितपणे मदत केली तर शेतकऱ्यांच्या समस्या कमी होऊन त्यांना जगण्याचे बळ मिळेल. 

शेतकऱ्यांना आधाराची गरज

पाण्याअभावी पेरलेल्या क्षेत्रातील पिकांची उत्पादकता घटण्याची शक्यता जास्त आहे. यातच हिवाळ्यात अल-निनोची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. ज्यामुळे रब्बीची पिके पक्व होताना तापमान सरासरीपेक्षा अधिक राहून गहू, हरभरा यांना फटका बसू शकतो आणि उन्हाळाही नेहमीपेक्षा अधिक कडक असू शकतो. थोडक्यात खरिपासोबत रब्बी हंगामातून शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळण्याची शक्यता कमी आहे. खरिपात बी-बियाणे, खते यासाठी शेतकऱ्यांनी खर्च केला आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांनी केलेली गुंतवणूकही निघणार नाही. या परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना आधार देऊन दुष्काळाच्या झळा कमी लागाव्यात यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार