शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख : हे ‘अकाली’ घडलेले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 01:38 IST

स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेला अकाली दल हा एकमेव प्रादेशिकपक्ष आहे. भाजपबरोबर या पक्षाची युती गेली चाळीस वर्षे होती. हे सर्व अकाली घडलेले नाही

शीख समाज हा अखंड भारताच्या पंजाब प्रांतात मोठ्या प्रमाणात राहत होता. टोळीयुद्धाने होणाऱ्या हल्ल्यांना परतवून लावणे, शेती, महिला, दागदागिने आदींचे संरक्षण करण्यासाठी प्रसंगी अकाली निधन झाले तरी तयार असणारे ‘शिरोमणी अकाली दल’ १९२० मध्ये स्थापन करण्यात आले होते. आत्माहुती दलात कधीही मरण येऊ शकते; म्हणून त्याला ‘अकाली’ म्हटले जात होते. अचानक निघून जाण्याला किंवा निधन होण्याला ‘अकाली’ म्हणून मराठीतही हा शब्द उपयोगात आणला जातो आहे. हा इतिहास यासाठी सांगायचा की, केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपच्या नेतृत्वाखाली ‘राष्टÑीय लोकशाही आघाडी’तून पंजाबमधील अकाली दल हा राजकीय पक्ष बाहेर पडला आहे. शेतीमालाच्या व्यापारासंबंधीच्या तीन विधेयकांना अकाली दलाने ठाम विरोध केला आणि केंद्रीय मंत्रिमंडळात असलेल्या एकमेव मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी राजीनामा दिला.

स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेला अकाली दल हा एकमेव प्रादेशिकपक्ष आहे. भाजपबरोबर या पक्षाची युती गेली चाळीस वर्षे होती. हे सर्व अकाली घडलेले नाही. भाजपला बहुमत मिळताच अनेक प्रादेशिक पक्षांनी त्यांची साथ सोडली आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, महाराष्टÑात शिवसेना, ओडिसामध्ये बिजू जनता दल, आंध्रात तेलुगू देशम, तमिळनाडूत अण्णा द्रमुक आणि द्रमुुक, पंजाबमध्ये अकाली दल, बिहारमध्ये प्रथम समता पक्ष, नंतर संयुक्त जनता दल, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दल, हरियाणात भारतीय लोकदल, इतक्या पक्षांची रेलचेल झाली होती. कॉँग्रेसचे वर्चस्व संपविण्यासाठी भाजपने अनेक वादग्रस्त भूमिका बाजूला ठेवून या पक्षांशी आघाडी केली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सहा वर्षे सरकारही चालविले. तेव्हा छोटे-मोठे चोवीस पक्ष सरकारमध्ये सहभागी झाले होते. अकाली दल, समता पक्ष, तेलुगू देशम, द्रमुक, तृणमूल कॉँग्रेस, बिजू जनता दल, शिवसेना आदी मोठे पक्ष होते. भाजपने सत्तरच्या दशकातील लोहियावाद्यांचा बिगर कॉँग्रेसवाद स्वीकारला होता. काँग्रेसने अनेक वेळा आघाडी सरकारला पसंती दिली नव्हती. मात्र २००४च्या सार्वत्रिकनिवडणुकांमध्ये बहुमत न मिळाल्याने कॉँग्रेसने आघाडीचा धर्म स्वीकारला. दहा वर्षे सरकारदेखील चालविले. २०१४मध्ये भाजपला प्रथमच बहुमत मिळाले. दुसºया बाजूला कॉँग्रेसही कमकुवत झाली. भाजपने २०१९ला पुन्हा स्पष्ट बहुमत मिळविताच प्रादेशिक पक्षांना किंमत देणे किंवा त्यांचे लाड करणे थांबविण्याचा तसेच स्वत:च्या पक्षाचा त्या-त्या प्रांतात विस्तार करण्याचा निर्णय घेतला. त्याचा पहिला फटका तेलुगू देशम, शिवसेना, तृणमूल काँग्रेस, बिजू जनता दल, संयुक्त जनता दल या पक्षांना बसला. मात्र, देशपातळीवर मतदारांनी भाजपला साथ दिली आणि राज्यातील राजकारणासाठी प्रादेशिक पक्षांना साथ दिली. यातून संघर्ष होत राहिले. भाजपला आता गरज राहिली नाही. शिवाय देशपातळीवर भाजपला आव्हान देण्याच्या अवस्थेत कॉँग्रेस पक्ष नाही. अनेक राज्यांतील प्रादेशिक पक्ष यांचा जनाधार हा कॉँग्रेसविरोधातून तयार झाला असल्याने त्यांना कॉँग्रेस पक्षही जवळ करू शकत नाही. ही सर्व प्रक्रिया गेली काही वर्षे घडत आलेली आहे.

काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत देशपातळीवर समर्थ पक्ष आणि कणखर नेतृत्वाला भारतीय मतदारांनी नेहमी साथ दिली आहे. नरेंद्र मोदी यांनी भाजपला आणि स्वत:च्या नेतृत्वाला हे वलय निर्माण करून दिले आहे. शिवाय प्रादेशिक पक्षांची ताकद संपविण्याचाही वारंवार प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातील शिवसेना या दुसºया क्रमांकाच्या जुन्या मित्राला अशी वागणूक देऊन त्यांनी स्वत:च्या पक्षाचा विस्तार केला. आज भाजप हा महाराष्ट्रातील सर्वाधिक जनाधार असलेला पक्ष बनला आहे आणि काँग्रेस शेवटच्या स्थानावर आहे. भाजपची ही खेळी यशस्वी झाली आहे. त्यामुळे हे सर्व ‘अकाली’ घडलेले नाही. याउलट आघाडीच्या राजकारणास नकार देणारे काँग्रेसचेच धोरण भाजप राबवीत आहे. हा प्रयोग पश्चिम बंगालमध्ये भाजप पुढील वर्षी करणार आहे. हे सर्व पूर्वनियोजित आहे, अकाली नाही.

शेतीमालाच्या व्यापारासंबंधीच्या तीन विधेयकांना अकाली दलाने ठाम विरोध केला आणि केंद्रीय मंत्रिमंडळात असलेल्या एकमेव मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी राजीनामा दिला. भाजपबरोबर या पक्षाची युती गेली चाळीस वर्षे होती.

टॅग्स :Shiromani Akali Dalशिरोमणी अकाली दलPunjabपंजाब