शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
7
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
8
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
9
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
10
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
11
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
12
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
13
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
14
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
15
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
16
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
17
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
18
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
19
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
20
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!

आजचा अग्रलेख : हे ‘अकाली’ घडलेले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 01:38 IST

स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेला अकाली दल हा एकमेव प्रादेशिकपक्ष आहे. भाजपबरोबर या पक्षाची युती गेली चाळीस वर्षे होती. हे सर्व अकाली घडलेले नाही

शीख समाज हा अखंड भारताच्या पंजाब प्रांतात मोठ्या प्रमाणात राहत होता. टोळीयुद्धाने होणाऱ्या हल्ल्यांना परतवून लावणे, शेती, महिला, दागदागिने आदींचे संरक्षण करण्यासाठी प्रसंगी अकाली निधन झाले तरी तयार असणारे ‘शिरोमणी अकाली दल’ १९२० मध्ये स्थापन करण्यात आले होते. आत्माहुती दलात कधीही मरण येऊ शकते; म्हणून त्याला ‘अकाली’ म्हटले जात होते. अचानक निघून जाण्याला किंवा निधन होण्याला ‘अकाली’ म्हणून मराठीतही हा शब्द उपयोगात आणला जातो आहे. हा इतिहास यासाठी सांगायचा की, केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपच्या नेतृत्वाखाली ‘राष्टÑीय लोकशाही आघाडी’तून पंजाबमधील अकाली दल हा राजकीय पक्ष बाहेर पडला आहे. शेतीमालाच्या व्यापारासंबंधीच्या तीन विधेयकांना अकाली दलाने ठाम विरोध केला आणि केंद्रीय मंत्रिमंडळात असलेल्या एकमेव मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी राजीनामा दिला.

स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेला अकाली दल हा एकमेव प्रादेशिकपक्ष आहे. भाजपबरोबर या पक्षाची युती गेली चाळीस वर्षे होती. हे सर्व अकाली घडलेले नाही. भाजपला बहुमत मिळताच अनेक प्रादेशिक पक्षांनी त्यांची साथ सोडली आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, महाराष्टÑात शिवसेना, ओडिसामध्ये बिजू जनता दल, आंध्रात तेलुगू देशम, तमिळनाडूत अण्णा द्रमुक आणि द्रमुुक, पंजाबमध्ये अकाली दल, बिहारमध्ये प्रथम समता पक्ष, नंतर संयुक्त जनता दल, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दल, हरियाणात भारतीय लोकदल, इतक्या पक्षांची रेलचेल झाली होती. कॉँग्रेसचे वर्चस्व संपविण्यासाठी भाजपने अनेक वादग्रस्त भूमिका बाजूला ठेवून या पक्षांशी आघाडी केली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सहा वर्षे सरकारही चालविले. तेव्हा छोटे-मोठे चोवीस पक्ष सरकारमध्ये सहभागी झाले होते. अकाली दल, समता पक्ष, तेलुगू देशम, द्रमुक, तृणमूल कॉँग्रेस, बिजू जनता दल, शिवसेना आदी मोठे पक्ष होते. भाजपने सत्तरच्या दशकातील लोहियावाद्यांचा बिगर कॉँग्रेसवाद स्वीकारला होता. काँग्रेसने अनेक वेळा आघाडी सरकारला पसंती दिली नव्हती. मात्र २००४च्या सार्वत्रिकनिवडणुकांमध्ये बहुमत न मिळाल्याने कॉँग्रेसने आघाडीचा धर्म स्वीकारला. दहा वर्षे सरकारदेखील चालविले. २०१४मध्ये भाजपला प्रथमच बहुमत मिळाले. दुसºया बाजूला कॉँग्रेसही कमकुवत झाली. भाजपने २०१९ला पुन्हा स्पष्ट बहुमत मिळविताच प्रादेशिक पक्षांना किंमत देणे किंवा त्यांचे लाड करणे थांबविण्याचा तसेच स्वत:च्या पक्षाचा त्या-त्या प्रांतात विस्तार करण्याचा निर्णय घेतला. त्याचा पहिला फटका तेलुगू देशम, शिवसेना, तृणमूल काँग्रेस, बिजू जनता दल, संयुक्त जनता दल या पक्षांना बसला. मात्र, देशपातळीवर मतदारांनी भाजपला साथ दिली आणि राज्यातील राजकारणासाठी प्रादेशिक पक्षांना साथ दिली. यातून संघर्ष होत राहिले. भाजपला आता गरज राहिली नाही. शिवाय देशपातळीवर भाजपला आव्हान देण्याच्या अवस्थेत कॉँग्रेस पक्ष नाही. अनेक राज्यांतील प्रादेशिक पक्ष यांचा जनाधार हा कॉँग्रेसविरोधातून तयार झाला असल्याने त्यांना कॉँग्रेस पक्षही जवळ करू शकत नाही. ही सर्व प्रक्रिया गेली काही वर्षे घडत आलेली आहे.

काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत देशपातळीवर समर्थ पक्ष आणि कणखर नेतृत्वाला भारतीय मतदारांनी नेहमी साथ दिली आहे. नरेंद्र मोदी यांनी भाजपला आणि स्वत:च्या नेतृत्वाला हे वलय निर्माण करून दिले आहे. शिवाय प्रादेशिक पक्षांची ताकद संपविण्याचाही वारंवार प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातील शिवसेना या दुसºया क्रमांकाच्या जुन्या मित्राला अशी वागणूक देऊन त्यांनी स्वत:च्या पक्षाचा विस्तार केला. आज भाजप हा महाराष्ट्रातील सर्वाधिक जनाधार असलेला पक्ष बनला आहे आणि काँग्रेस शेवटच्या स्थानावर आहे. भाजपची ही खेळी यशस्वी झाली आहे. त्यामुळे हे सर्व ‘अकाली’ घडलेले नाही. याउलट आघाडीच्या राजकारणास नकार देणारे काँग्रेसचेच धोरण भाजप राबवीत आहे. हा प्रयोग पश्चिम बंगालमध्ये भाजप पुढील वर्षी करणार आहे. हे सर्व पूर्वनियोजित आहे, अकाली नाही.

शेतीमालाच्या व्यापारासंबंधीच्या तीन विधेयकांना अकाली दलाने ठाम विरोध केला आणि केंद्रीय मंत्रिमंडळात असलेल्या एकमेव मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी राजीनामा दिला. भाजपबरोबर या पक्षाची युती गेली चाळीस वर्षे होती.

टॅग्स :Shiromani Akali Dalशिरोमणी अकाली दलPunjabपंजाब