शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

भक्तिशास्त्र अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 00:28 IST

भक्ती ही भावावस्था आहे. शास्त्र आहे की दर्शन आहे. दर्शन हे एक शास्त्र आहे आणि दर्शन शास्त्र हा एक अनुभूतीचा विषय आहे. दर्शनशास्त्रकारांनी सांगितलेली प्रमेये जर अनुभवाच्या कसोटीवर उतरणार नसतील तर ते दर्शनशास्त्र दर्शन या संज्ञेला प्राप्त होऊ शकत नाही.

- डॉ. रामचंद्र देखणेभक्ती ही भावावस्था आहे. शास्त्र आहे की दर्शन आहे. दर्शन हे एक शास्त्र आहे आणि दर्शन शास्त्र हा एक अनुभूतीचा विषय आहे. दर्शनशास्त्रकारांनी सांगितलेली प्रमेये जर अनुभवाच्या कसोटीवर उतरणार नसतील तर ते दर्शनशास्त्र दर्शन या संज्ञेला प्राप्त होऊ शकत नाही. दर्शनाचा अर्थच मुळी साक्षात्कार किंवा अनुभूती असा आहे. जाणीव हा शब्द आपण व्यवहारात नेहमी वापरतो. जाणीव ही लौकिक अर्थाने अस्तित्वात आली तर तो अनुभव असतो आणि जाणीव जेव्हा अलौकिक पातळीवरून आविष्कृत होते तेव्हा ती अनुभूती होते. अलौकिक अनुभूती जेव्हा अलौकिकातून लौकिकाकडे वाटचाल करू लागते तेव्हा सामान्यांच्या जीवनातही दर्शन ही संकल्पना अनुभवता येते. दर्शनाने सांगितलेल्या प्रयोजनाच्या प्राप्तीची ज्याला तळमळ लागली आहे तोच दर्शनाकडे आकृष्ट होतो. दर्शन केवळ प्रयोजन सांगून थांबत नाही तर प्रयोजनाच्या प्राप्तीचा साधनमार्गही सांगत असतो. असे प्रज्ञाचक्षु श्री संत गुलाबराव महाराजांनी म्हटले आहे. दर्शने ही ज्ञानतत्त्वाने अधिष्ठित असतात. ज्ञानाच्या दोन अवस्था आहेत. एक परोक्षज्ञान आणि दुसरी अपरोक्षज्ञान. आपण ग्रंथ, संत, तत्त्ववेत्ते यांच्याकडून ऐकतो, श्रवण करतो आणि त्यातून जे ज्ञान मिळते ते परोक्षज्ञान होय. पण त्यानंतर जे ऐकले आहे, ज्याचे श्रवण घडले आहे त्याची प्रत्यक्ष अनुभूती घडते. ते प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे अपरोक्षज्ञान होय. भक्त, साधन, उपासक हे परोक्षज्ञानाचे रूपांतर अपरोक्षज्ञानात करतात. या अनुभूतीसाठी भक्ती आवश्यक ठरते. अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने ज्ञानप्राप्तीसाठी आणि अपरोक्षज्ञानासाठी आवरण आणि विक्षेप हे दोन प्रतिबंध आहेत आणि हे प्रतिबंध भक्तीनेच लय पावतात. भक्तीमध्ये सगुण भक्ती आहे. त्यात भगवंताची लीला आहे. त्या लीलेच्या वर्णनात दडलेले प्रेम आहे. भगवंताविषयीची आत्यंतिक ओढ अणि ध्यान आहे. हे ध्यान परिपूर्णतेकडे नेते. धावणारे मन ध्यानाने थांबते.तुकोबाराय म्हणतात, ‘‘आता कोठे द्यावे मन।तुझं चरण देखलिया।’’ म्हणजे सगुण भक्तीच्या महात्म्यज्ञानाने आचरणाची निवृत्ती होते तर लीला संकीर्तनाने विक्षेपाची निवृत्ती होते. म्हणूनच ज्ञानयोग किंवा अष्टांगयोगातील साधकांपेक्षाही मुक्त भक्त हाच खऱ्या अर्थाने भक्तिशास्त्राचा अधिकारी होतो. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक