शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

...देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 07:49 IST

मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडण्यावरून महाराष्ट्रात जे गलिच्छ राजकारण झाले, ते पाहून देवसुद्धा म्हणाले असतील, बंद होतो ते बरे होते. 

- विनायक पात्रुडकरकार्यकारी संपादक लाेकमत, मुंबई

धर्माधिष्ठित राजकारणाचे आपण सारेच बळी आहोत. त्यामुळे जिथे धर्म येतो त्याचा पुरेपूर वापर करून        घेण्यात राजकीय मंडळी वाक्‌बगार असतात.        कोरोनामुळे जवळपास आठ महिने बंद असलेल्या धर्मस्थळाची दारे उघडण्यावरून यथेच्छ टीका झाली. विरोधी पक्षाच्या नेते मंडळींनी घंटानाद, थाळीनाद वगैरे आंदोलने केली. यात कुठलाही राजकीय पक्ष मागे नव्हता. ओवैसीच्या एमआयएमने औरंगाबादमध्ये, प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरात आंदोलने केली. मनसेने त्र्यंबकेश्वरचा प्रश्न लावून धरला होता. बाकी भाजपच्या नेते मंडळींची राज्यभर ठिकठिकाणी आंदोलने सुरूच होती. जैन मंदिरांसाठी उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागली. 

गेल्या महिन्या-दोन महिन्यात देवदर्शनासाठी ही राजकीय मंडळी अक्षरश: आसुसलेली दिसली.  यातील कितीजण नियमित देवळात जातात, हा संशोधनाचा मुद्दा ठरेल. परंतु राजकीय पोळी भाजण्यासाठी देवालये हा प्रमख मुद्दा ठरला होता. कोरोनामुळे होणाऱ्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी अनियंत्रित गर्दी असणाऱ्या ठिकाणी सरकारनेच बंदी घातली होती.  एका अर्थाने ही बंदी समर्थनीय होती. परंतु  हिंदुत्वाच्या नावाखाली आघाडीचे सरकार  चालविणाऱ्या शिवसेनेला कोंडीत पकडण्याची ही संधी होती. ती संधी साधण्याचा भाजप नेत्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. या वादात राज्यपाल कोश्यारी यांनीही उडी घेतली होती. राजकीय वादाची ही फोडणी दिवाळीआधी बरीच खुशखुशीत ठरली होती. खरे तर मंदिरे बंद ठेवून लोकशाही विकास  आघाडीला असा कोणता फायदा होणार होता, याचा विचार व्हायला पाहिजे होता. उलट शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याने त्यांना तर बंद मंदिरे ही अडचणीची बाब ठरत होती. त्याचाच फायदा भाजपने घेतला. अखेर ही ‘श्रीं’ची इच्छा असे म्हणत पाडव्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरे उघडण्यास काही अटी- शर्तीवर परवानगी दिली. काही चर्चना मात्र या अटी-शर्ती जाचक असल्याचे नमूद करीत चर्च उघडण्यास नकार दिला. लॉकडाऊन शिथिल होत असताना आज - ना - उद्या मंदिरे उघडणार, हे स्पष्ट होते. परंतु त्याचा राजकीय फायदा उठवीत याच गोष्टीचे राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय भांडवल केले गेले.

 ज्या महाराष्ट्रात दलितांसाठी मंदिरे उघडण्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नाशिकच्या काळा राम मंदिरात आंदोलन करावे लागले. तसेच साने गुरुजींनी विठ्ठल मंदिर दलितांना खुले होण्यासाठी सत्याग्रह केला होता. आज त्याच महाराष्ट्रात प्रार्थनास्थळे बंद असल्याने तिथल्या पंचक्रोशीतील अर्थकारण ठप्प झाले होते. अनेकांचे रोजगार बुडाले होते. मंदिराबाहेर हार-तुरे विकणाऱ्यांचे हातावर पोट असते, त्यांची मोठी बिकट अवस्था झाली होती. ही गोष्ट नक्की खरी आहे. ज्या देवस्थानांभोवती ही मंडळी रोजगारनिर्मिती करीत होती, त्या देवस्थानांकडे, मंदिराच्या व्यवस्थापनांकडे, विश्वस्तांकडे इतके दिवस साठवलेला पैसा कुठे गेला? असा प्रश्न उपस्थित केला तर मोठी अडचणीची गोष्ट ठरण्याची शक्यता आहे. ज्या मंदिराभोवती ही हातावर पोट असणारी मंडळी जगत होती त्यांना या मंदिर व्यवस्थानाने किती मदत केली? त्यांच्या उपासमारीचा प्रश्न या विश्वस्त मंडळांनी सोडविला का? भाविकांच्या श्रद्धेवर चालणाऱ्या देवस्थानांपैकी किती संस्थांनी अशा स्वरूपाची मदत केली, याची माहिती लोकांपुढे यायला हवी. 

खरेतर सद्‌गुरु वामनराव पै यांनी देवळात जाणारा भाविक हा देवापुढे नतमस्तक होतो आणि डोळे बंद करून नामस्मरण किंवा प्रार्थना करतो, असे म्हटले आहे. याचा अर्थ भाविक मनातल्या मनातच देवाचे सगुण रूप साकार स्वरूपात अनुभवत असतो. तेव्हा देव मनात असताना देवालयात गर्दी करण्याची खरेच गरज आहे का? याचाही विचार भक्तांनी करायला हवा. कोरोनामुळे संसर्ग वाढून हकनाक आजारी पडण्यापेक्षा सरकारी नियम पाळले तर कोरोनावर नक्की मात करू, असा विश्वास निर्माण करण्याची गरज आहे. देवावर भरवसा हवाच, त्याचबरोबर या विषाणूचे   आक्रमण टाळण्यासाठी नियमाचे काटेकोर पालनही हवे. अन्यथा महाराष्ट्राची ‘दिल्ली’ झाल्याशिवाय राहणार   नाही.

टॅग्स :Templeमंदिरcorona virusकोरोना वायरस बातम्याShiv SenaशिवसेनाBJPभाजपा