शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नियतीचा नाईलाज नको, नियत साफ हवी!

By किरण अग्रवाल | Updated: June 5, 2022 10:30 IST

Destiny should not be cured, intension should be clear : आमदारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला बसण्याची वेळ आलेली अकोलेकरांनी पाहिली.

- किरण अग्रवाल

यंदा नेहमीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हा अधिकचा पाऊस वादळी वाऱ्यासह झाला, तर मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागू शकेल. त्यापासून बचावायचे, तर नियत साफ ठेवून, म्हणजे संबंधित कामांमधून ‘काही’ हाती लागेल, याची अपेक्षा न बाळगता ती तातडीने उरकायला हवीत.

 

नियतीचा फेरा चुकत नाही, असे म्हणतात. यातील अंधश्रद्धा घडीभर बाजूस ठेवून ते एकवेळ खरेही मानूया; पण नियत साफ असली, तर अनेक फेरे टाळता येतात, हेही तितकेच खरे. आपल्याकडे सरकारी यंत्रणेमार्फत होणाऱ्या कामांमध्ये तेच दिसत नाही, म्हणून अस्मानी संकटाला सुलतानी बेफिकिरीची जोड लाभून जाते. उन्हाळे-पावसाळे तोंडावर येतात व प्रसंगी सरूनही जातात, तरी त्यासंबंधी उपाय योजनांची कामे सरत नाहीत, यामागेही संबंधितांची नियत साफ नसल्याचेच कारण देता यावे.

 

यंदा कडाक्याच्या उन्हात सारेजण भाजून निघत असताना, जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावत पहिल्याच फटक्यात एक बळी घेतला आहे. बार्शी-टाकळीचा एक तरुण सतीश भाऊराव शिरसाट हा त्याच्या दुचाकीने अकोला येथे खासगी नोकरीच्या कामावर येत असताना, वादळी वाऱ्यामुळे अंगावर झाड पडून त्याचा मृत्यू झाला. पित्याच्या पश्चात आपल्या आईचा एकुलता एक आधार असलेला हा तरुण नियतीने हिरावून घेतला. या दुर्दैवी घटनेबद्दल समाज मनात हळहळ असणे स्वाभाविक आहे. अखेर निसर्गापुढे कोणाचे काही चालत नाही, हे खरेच, पण अशा घटना घडून जातात तेव्हा त्यातून संकेत वा बोध घेऊन यापुढे तसे काही होणार नाही, याची काळजी घ्यायची असते. तेच होताना दिसत नाही.

 

मान्सून व मान्सून पूर्व पावसात वादळी वाऱ्यामुळे शहरात वृक्ष उन्मळून दुर्घटना घडत असतात. हा नेहमीचाच अनुभव आहे. यंदाचा मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावून गेला, तरी स्थानिक प्रशासनातर्फे शहरातील धोकादायक वृक्ष छाटणी केली गेलेली दिसत नाही. इतकेच कशाला, विविध भागातील पावसाळी नाले माती व कचऱ्याने बुजले गेलेले आहेत; पण त्यांची सफाई अजून झालेली नाही. ग्रामीण भागात शेत शिवारातील पाणंद रस्त्यांचा प्रश्न याच स्तंभात गेल्या आठवड्यात मांडला होता. त्यासाठी चक्क आमदारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला बसण्याची वेळ आलेली अकोलेकरांनी पाहिली.

 

विशेष म्हणजे, अकोला जिल्हा परिषदेच्या १५९ शाळांमधील सुमारे सव्वातीनशेपेक्षा अधिक वर्गखोल्या धोकादायक स्थितीत असल्याचे पुढे आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील २८५ शाळांमधील ६०८, तर वाशिम जिल्ह्यातील २२९ शाळांमधील ४२९ वर्गखोल्या शिकस्त आहेत. काही ठिकाणी या खोल्यांच्या दुरुस्तीसाठी निधीही मंजूर आहे, पण काम हाती घेतले गेलेले नाही त्यामुळे पावसाळ्यात या धोकादायक खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना बसवून शिकवणे म्हणजे त्यांच्या जिवाशी खेळ खेळण्यासारखेच ठरेल. सद्यस्थितीत काही खोल्यांमध्ये विद्यार्थी बसतही नाहीत, परंतु या खोल्या शाळेच्या आवारातच असल्याने वादळी वाऱ्यासह होणाऱ्या पावसात काय आपत्ती कोसळेल, हे सांगता येऊ नये. संबंधित मुख्याध्यापक याबाबत तणावात आहेत, पण यंत्रणा मठ्ठ.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती निवारण कक्ष असतो. जिल्ह्यात पूरग्रस्त होणारी गावे कोणती अगर कोणत्या गावांना पुराचा फटका बसतो, याची माहिती असते, यादृष्टीने या कक्षामधील जुळवाजुळव सुरू झाली आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब; परंतु इतर कामांच्या बाबतीतली उदासीनता पाहता, संबंधितांची नियत साफ नसल्यामुळेच ही कामे रेंगाळल्याचे म्हणता यावे. कारण निधी मंजूर असूनही कामे केली जात नसतील, तर संबंधितांची कर्तव्यपूर्तीची नियत नसावी, असाच त्याचा अर्थ घ्यावा लागेल. विशेष म्हणजे कोरोना काळात सुमारे दोन वर्षे शाळा बंद पडून होत्या, तेव्हा शिकस्त वर्गखोल्यांची कामे करून घेता आली असती, पण तेवढे शहाणपण दाखविले गेले नाही, हे दुर्दैव.

 

सारांशात, मान्सूनपूर्व पावसाने घेतलेला बळी लक्षात घेता, संभाव्य अप्रिय घटना टाळण्यासाठी सर्वच संबंधित यंत्रणांनी गतिमान होणे गरजेचे आहे. वेळच्यावेळी संबंधित कामे केली गेली नाहीत, तर नियतीला दोष देण्याखेरीज आपल्या हाती काही उरणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका