शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

आरडाओरड करूनही भाजपा लक्ष देईना, सेनेचा खेळ सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 03:58 IST

जे मुंबईत घडले ते पुण्यात घडतेच असे नाही़ महाराष्ट्रात घडविता येते ते विदर्भात जमविता येईल असेही नाही. नुसत्या घोषणा, भाषेची वा धर्माची चर्चा, वा धर्मद्वेषाचे नुसतेच पुरस्कार, जुन्या पिढ्यांची पुण्याई एवढ्यावरच पक्ष चालत नसतात.

भारताच्या रंगमंचावर सुरू असलेल्या राजकीय महानाट्यात एक विनोदी प्रवेश आहे आणि त्या प्रवेशाने त्या कंटाळवाण्या नाटकात थोडीशी गंमत आणली आहे. या प्रवेशात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही दोन पात्रे आहेत आणि त्यांच्यात ‘सोडवेना, धरवेना’ अशा ओढाताणीचा खेळ चालला आहे. त्या खेळालाही आता चार वर्षे झाल्याने तो संपावा असे प्रेक्षकांना वाटू लागले आहे. पण भाजपा ही पार्टी आपली अहंता सोडायला तयार नसल्याने आणि शिवसेना ही तिची जिद्द संपवित नसल्याने त्या खेळात अजून रममाण आहे. सेनेचा एक पाय सत्तेत आहे आणि तिच्या म्हणण्यानुसार तो सत्तेसाठी नसून जनसेवेसाठी आहे, उलट भाजपाचे सारे हातपाय व डोकेही सत्तेत आहे. तो पक्ष मात्र जनसेवेऐवजी ईश्वरी सेवेची भाषा बोलणारा आहे. त्यातून भाजपाने बांधलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी या मोटेबाहेर सेनेला स्थान नाही. एकेकाळी तिला शरदकाकांविषयी विश्वास वाटला होता, पण ते काकाच ऐनवेळी भाजपाच्या मदतीला व फडणवीसांचे सरकार वाचवायला त्या पक्षाकडे गेले. (त्यांचे अनेक सहकारी ईडी किंवा सीबीआय या तपास यंत्रणांखाली अडकले असण्याचाही तो नाइलाज आहे). तसे शरदकाका हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ पुढारी असले तरी अविश्वसनीयतेबाबतचीही त्यांची ज्येष्ठता श्रेष्ठ दर्जाची आहे. या स्थितीत सेनेने स्वबळावर निवडणुका लढविण्याची भाषा बोलणे व त्यासाठी जास्तीत जास्त आक्रमक पवित्रे घेणे समजण्याजोगे आहे. तरीही उद्धव ठाकरे यांनी साईबाबांच्या साक्षीने शिर्डीत भाजपावर केलेला देशद्रोहाचा आरोप गंभीर म्हणावा असा आहे. ‘खोटे बोलून सत्ता मिळविणे हा देशद्रोहच’ असा घणाघाती घाव त्यांनी भाजपावर घातला आहे. भाजपा त्याला उत्तर देणार नाही, कारण या भाषेतली खरी हवा त्या पक्षाला समजणारी आहे. जाऊन जाऊन कुठे जातील आणि जायला तरी त्यांच्याजवळ दुसरी जागा कुठे आहे हे भाजपाला पक्के ठाऊक आहे. त्यामुळे लहान मुलांनी भांडणात शिवीगाळ केली तसेच हे आहे, असा भाजपाचा पवित्रा राहील. सेनेला काँग्रेससोबत जाता येत नाही. राष्ट्रवादीवर तिचा विश्वास नाही, बसपा-शेकाप किंवा रिपब्लिकन हे पक्ष तर तिच्या रिंगणाबाहेरचेच आहेत. त्यातून देवेंद्र फडणवीस अनेकवार नम्रपणे म्हणाले आहेत, ‘आम्हाला युतीशिवाय गत्यंतर नाही.’ सेनेने बहुधा त्यांचा नम्रपणा त्यांच्या खऱ्या अर्थानिशी अद्याप समजून घेतला नाही. जे मुंबईत घडले ते पुण्यात घडतेच असे नाही आणि महाराष्ट्रात घडविता येते ते विदर्भात जमविता येईल असेही नाही. नुसत्या घोषणा, भाषेची वा धर्माची चर्चा वा धर्मद्वेषाचे नुसतेच पुरस्कार आणि जुन्या पिढ्यांची पुण्याई एवढ्यावरच पक्ष चालत नसतात. त्यांच्यामागे विकासाचे काम असावे लागते. सेनेचा त्याच्याशी संबंध नाही, तिला सरकारविरोधी आंदोलन करता येत नाही, विरोधकांच्या आंदोलनात सहभागी होता येत नाही, सरकारात राहून त्यावर लहानसहान दगडफेक करणे तिला जमणारे आहे. शिवाय सेनेने धर्माची व राम मंदिराची भाषा उचलली आहे. त्यामुळे स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणविणारा दुसरा कोणताही पक्ष वा संघटना सेनेसोबत येणार नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीपर्यंत सर्व काही विसरून व केलेली शिवीगाळ मुकाट्याने गिळून सेनेला भाजपासोबतच जावे लागणार आहे. फावल्या वेळात आपली माणसे जोडून ठेवणे आणि त्यातले कोपरे बाहेर जाणार नाहीत याची काळजी घेणेच तिला भाग आहे. सेनेची सध्याची दगडफेक हा त्याच मर्यादित राजकारणाचा भाग आहे. एक पर्याय आणखीही आहे, भाजपा व सेनेने निवडणूक स्वतंत्रपणे लढवायची व स्वतंत्र युती करायची. पण आपल्यापेक्षा भाजपाचे आमदार जास्त असल्याचा अनुभव पूर्वीसारखाच याही वेळी येईल याची धास्ती सेनेला आहे. त्यामुळे आरोप व शिवीगाळ यांच्या मदतीने आपले वजन व उपद्रवमूल्य वाढविता येईल तेवढे वाढवून घेणे हा सेनेचा प्रयास आहे आणि त्या प्रयासात आता सेनेचे सगळेच पुढारी चांगले तरबेज झाले आहेत. त्यांचे दु:ख एकच आहे, आम्ही आरडाओरड केली तरी भाजपावाले मात्र आमच्याकडे गंभीरपणे सोडा, पण ढुंकूनही पाहत नाही. त्यामुळे राजकारणातला हा विनोदी प्रवेश येत्या निवडणुकीपर्यंत आपल्याला पाहावा लागेल एवढेच!

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे