शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

आरडाओरड करूनही भाजपा लक्ष देईना, सेनेचा खेळ सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 03:58 IST

जे मुंबईत घडले ते पुण्यात घडतेच असे नाही़ महाराष्ट्रात घडविता येते ते विदर्भात जमविता येईल असेही नाही. नुसत्या घोषणा, भाषेची वा धर्माची चर्चा, वा धर्मद्वेषाचे नुसतेच पुरस्कार, जुन्या पिढ्यांची पुण्याई एवढ्यावरच पक्ष चालत नसतात.

भारताच्या रंगमंचावर सुरू असलेल्या राजकीय महानाट्यात एक विनोदी प्रवेश आहे आणि त्या प्रवेशाने त्या कंटाळवाण्या नाटकात थोडीशी गंमत आणली आहे. या प्रवेशात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही दोन पात्रे आहेत आणि त्यांच्यात ‘सोडवेना, धरवेना’ अशा ओढाताणीचा खेळ चालला आहे. त्या खेळालाही आता चार वर्षे झाल्याने तो संपावा असे प्रेक्षकांना वाटू लागले आहे. पण भाजपा ही पार्टी आपली अहंता सोडायला तयार नसल्याने आणि शिवसेना ही तिची जिद्द संपवित नसल्याने त्या खेळात अजून रममाण आहे. सेनेचा एक पाय सत्तेत आहे आणि तिच्या म्हणण्यानुसार तो सत्तेसाठी नसून जनसेवेसाठी आहे, उलट भाजपाचे सारे हातपाय व डोकेही सत्तेत आहे. तो पक्ष मात्र जनसेवेऐवजी ईश्वरी सेवेची भाषा बोलणारा आहे. त्यातून भाजपाने बांधलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी या मोटेबाहेर सेनेला स्थान नाही. एकेकाळी तिला शरदकाकांविषयी विश्वास वाटला होता, पण ते काकाच ऐनवेळी भाजपाच्या मदतीला व फडणवीसांचे सरकार वाचवायला त्या पक्षाकडे गेले. (त्यांचे अनेक सहकारी ईडी किंवा सीबीआय या तपास यंत्रणांखाली अडकले असण्याचाही तो नाइलाज आहे). तसे शरदकाका हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ पुढारी असले तरी अविश्वसनीयतेबाबतचीही त्यांची ज्येष्ठता श्रेष्ठ दर्जाची आहे. या स्थितीत सेनेने स्वबळावर निवडणुका लढविण्याची भाषा बोलणे व त्यासाठी जास्तीत जास्त आक्रमक पवित्रे घेणे समजण्याजोगे आहे. तरीही उद्धव ठाकरे यांनी साईबाबांच्या साक्षीने शिर्डीत भाजपावर केलेला देशद्रोहाचा आरोप गंभीर म्हणावा असा आहे. ‘खोटे बोलून सत्ता मिळविणे हा देशद्रोहच’ असा घणाघाती घाव त्यांनी भाजपावर घातला आहे. भाजपा त्याला उत्तर देणार नाही, कारण या भाषेतली खरी हवा त्या पक्षाला समजणारी आहे. जाऊन जाऊन कुठे जातील आणि जायला तरी त्यांच्याजवळ दुसरी जागा कुठे आहे हे भाजपाला पक्के ठाऊक आहे. त्यामुळे लहान मुलांनी भांडणात शिवीगाळ केली तसेच हे आहे, असा भाजपाचा पवित्रा राहील. सेनेला काँग्रेससोबत जाता येत नाही. राष्ट्रवादीवर तिचा विश्वास नाही, बसपा-शेकाप किंवा रिपब्लिकन हे पक्ष तर तिच्या रिंगणाबाहेरचेच आहेत. त्यातून देवेंद्र फडणवीस अनेकवार नम्रपणे म्हणाले आहेत, ‘आम्हाला युतीशिवाय गत्यंतर नाही.’ सेनेने बहुधा त्यांचा नम्रपणा त्यांच्या खऱ्या अर्थानिशी अद्याप समजून घेतला नाही. जे मुंबईत घडले ते पुण्यात घडतेच असे नाही आणि महाराष्ट्रात घडविता येते ते विदर्भात जमविता येईल असेही नाही. नुसत्या घोषणा, भाषेची वा धर्माची चर्चा वा धर्मद्वेषाचे नुसतेच पुरस्कार आणि जुन्या पिढ्यांची पुण्याई एवढ्यावरच पक्ष चालत नसतात. त्यांच्यामागे विकासाचे काम असावे लागते. सेनेचा त्याच्याशी संबंध नाही, तिला सरकारविरोधी आंदोलन करता येत नाही, विरोधकांच्या आंदोलनात सहभागी होता येत नाही, सरकारात राहून त्यावर लहानसहान दगडफेक करणे तिला जमणारे आहे. शिवाय सेनेने धर्माची व राम मंदिराची भाषा उचलली आहे. त्यामुळे स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणविणारा दुसरा कोणताही पक्ष वा संघटना सेनेसोबत येणार नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीपर्यंत सर्व काही विसरून व केलेली शिवीगाळ मुकाट्याने गिळून सेनेला भाजपासोबतच जावे लागणार आहे. फावल्या वेळात आपली माणसे जोडून ठेवणे आणि त्यातले कोपरे बाहेर जाणार नाहीत याची काळजी घेणेच तिला भाग आहे. सेनेची सध्याची दगडफेक हा त्याच मर्यादित राजकारणाचा भाग आहे. एक पर्याय आणखीही आहे, भाजपा व सेनेने निवडणूक स्वतंत्रपणे लढवायची व स्वतंत्र युती करायची. पण आपल्यापेक्षा भाजपाचे आमदार जास्त असल्याचा अनुभव पूर्वीसारखाच याही वेळी येईल याची धास्ती सेनेला आहे. त्यामुळे आरोप व शिवीगाळ यांच्या मदतीने आपले वजन व उपद्रवमूल्य वाढविता येईल तेवढे वाढवून घेणे हा सेनेचा प्रयास आहे आणि त्या प्रयासात आता सेनेचे सगळेच पुढारी चांगले तरबेज झाले आहेत. त्यांचे दु:ख एकच आहे, आम्ही आरडाओरड केली तरी भाजपावाले मात्र आमच्याकडे गंभीरपणे सोडा, पण ढुंकूनही पाहत नाही. त्यामुळे राजकारणातला हा विनोदी प्रवेश येत्या निवडणुकीपर्यंत आपल्याला पाहावा लागेल एवढेच!

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे