शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

दिल्लीत लोकशाही जिंकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 06:43 IST

अधिकारांच्या वादावरून लोकनियुक्त सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालाने जनतेच्या सार्वभौमत्वाचा, लोकशाहीचा आणि राज्यघटनेस अभिप्रेत असलेल्या विधिमंडळास उत्तरदायी अशा मंत्रिमंडळ शासनव्यवस्थेचा विजय झाला आहे.

अधिकारांच्या वादावरून लोकनियुक्त सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालाने जनतेच्या सार्वभौमत्वाचा, लोकशाहीचा आणि राज्यघटनेस अभिप्रेत असलेल्या विधिमंडळास उत्तरदायी अशा मंत्रिमंडळ शासनव्यवस्थेचा विजय झाला आहे. आपण दिल्लीत बसून संपूर्ण देशावर राज्य करत असताना अरविंद केजरीवाल यांच्या नव्याने स्थापन झालेल्या आम आदमी पार्टीने पहिल्याच निवडणुकीत ७० पैकी ६७ जागा जिंकून दिल्ली काबीज करावी हे आधी काँग्रेसच्या व नंतर भाजपाच्याही पचनी पडले नव्हते. नायब राज्यपालरूपी आपल्या मर्जीतील हस्तकाला हाताशी धरून केजरीवाल यांच्या दिल्लीच्या प्रशासनात खो घालण्याचे उद्योग त्यातूनच सुरु झाले. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा नाही त्यामुळे मनासारखे काम करता येत नाही, असे नेहमी पालुपद लावणाऱ्या केजरीवालांना हे आयते निमित्त मिळाले. त्यातून दिल्लीचे प्रशासन लोककल्याणकारी कारभाराऐवजी संघर्षातच अडकून पडले. सर्वोच्च न्यायालयाने एका परीने केजरीवाल व केंद्र सरकार या दोघांचेही कान टोचल्याने दिल्लीचा राज्यकारभार रुळावर येईल आणि भविष्यात कुणाचेही सरकार आले तरी तो तसाच सुरु राहील, अशी आशा आहे. भारतीय संघराज्यात राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्लीचे (एनसीटी) नेमके स्थान काय, दिल्लीचे विधिमंडळ व मंत्रिमंडळ यांचे नेमके अधिकार काय आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून नायब राज्यपाल लोकनियुक्त सरकारच्या कारभारात कुठे आणि कुठवर नाक खुपसू शकतात हे संघर्षाचे तीन मुद्दे या निकालाने निर्णायक स्वरूपात निकाली निघाले आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले की, ‘एनसीटी’ हा केंद्रशासित प्रदेश असला तरी देशातील अशा अन्य प्रदेशांहून दिल्लीला वेगळा आणि खास दर्जा राज्यघटनेने दिला आहे. जनतेने थेट निवडून दिलेले विधिमंडळ व त्यास उत्तरदायी असलेले मंत्रिमंडळ अशी लोकशाहीशी सुसंगत शासनव्यवस्था हे या विशेष दर्जाचे प्रमुख लक्षण आहे. राज्याचा दर्जा नसला तरी, काही अपवाद वगळता राज्यांच्या अखत्यारितील सर्व विषयांवर कायदे करण्याचा अधिकार दिल्ली सरकारला आहे. केंद्राने नेमलेले प्रशासक या नात्याने नायब राज्यपाल प्रशासकीय प्रमुख असले तरी ‘एनसीटी’चे लोकनियुक्त सरकार हे केंद्राचे मांडलिक नाही. नायब राज्यपालांनी सरकारच्या झारीतील शुक्राचार्य म्हणून काम करणे अपेक्षित नाही. सरकारने प्रत्येक निर्णय नायब राज्यपालांच्या संमतीने घेण्याची गरज नाही. सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची नायब राज्यपालांना वेळोवेळी माहिती दिली की पुरे. त्यापैकी काही निर्णयांवर मतभेद असतील तर त्या बाबी राष्ट्रपतींकडे अभिप्रायासाठी धाडण्याचा अधिकार नायब राज्यपालांना जरूर आहे. मात्र हा अधिकार त्यांनी सरधोपटपणे वापरणे अपेक्षित नाही. मंत्रिमंडळ व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनही काही मार्ग निघाला नाही तरच नायब राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे धाव घ्यावी. १९९१ मध्ये राज्यघटनेत दुरुस्ती करून दिल्लीला हा विशेष दर्जा दिला गेला.त्यातून स्थापन झालेल्या शासनव्यवस्थेच्या सर्व अंगांनी सार्वभौम जनतेच्या कल्याणासाठी आपण अस्तित्वात आलो आहोत व त्यासाठीच आपल्याला अधिकार दिले आहेत याचे भान ठेवण्याची गरज आहे, असे कानही न्यायालयाने टोचले. केंद्र सरकारने पाळलेले सूचक मौन सोडले तर या निकालाचे सर्वदूर स्वागत झाले. असाच संघर्ष सुरु असलेल्या पुद्दुचेरी या दक्षिणेतील अगदी छोट्या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनाही या निकालाने स्फुरण चढले. एरवी केंद्राच्या हातचे राजकीय बाहुले म्हणून ज्यांचा सर्रास वापर केला जातो त्या राज्यांच्या राज्यपालांनीही यावरून धडा घ्यावा, असाही सूर उमटला. पण हा निकाल फक्त दिल्लीपुरता आणि दिल्लीसाठीच आहे, हे विसरून चालणार नाही. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा हे केजरीवालांचे रास्त स्वप्न असले तरी तूर्तास तरी आपण तशा राज्याचे मुख्यमंत्री नाही याचे भान ठेवून त्यांनी काम करावे व केंद्रानेही आपल्या मर्यादा ओळखून त्यांना काम करू द्यावे, यातच दिल्लीवासीयांचे कल्याण आहे.

टॅग्स :delhiदिल्ली