शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

फाशीचा दोर तुमच्या मानेच्या मापाचा आहे? -मग, तुम्हीच दोषी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2024 08:06 IST

केवळ पावसाने पाणी साठलेल्या रस्त्यावरून वाहन नेले या आरोपाखाली एखाद्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कसा लावता येऊ शकतो?

- अमित आनंद तिवारी, वकील, सर्वोच्च न्यायालय

दिल्लीच्या राजेंद्रनगर भागातील अभ्यासवर्गात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांच्या अकाली मृत्यूचा धक्का ओसरत नाही तोच पोलिसांनी मनोज कथुरिया नामक एसयूव्ही चालकाला अटक केल्याने नागरिकांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर भयावह घाला घातला गेला आहे.  या चालकाचा अपराध काय? - तर ज्या ठिकाणी त्या तीन मुलांचा मृत्यू झाला त्या अभ्यासिकेच्या समोर पाण्याने भरलेल्या रस्त्यावर त्याने गाडी घातली होती. 

यासंबंधीच्या बातमीत म्हटल्यानुसार, या कथुरियाने पावसामुळे साचलेल्या पाण्यात वाहन घातल्याने उडालेल्या पाण्यामुळे कोचिंग क्लासच्या तळघरातील वाचनालयात पाणी घुसले, असा आरोप त्याच्यावर आहे. पोलिसांनी त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला, त्यामुळे कायदेशीर तरतुदी आणि सामान्य तर्कसंगतीला हरताळ फासला गेला आहे.

कथुरिया यांच्या अटकेमुळे ‘अंधेर नगरी चौपट राजा’ या भारतेंदू हरिश्चंद्र यांच्या नाटकाची आठवण येते. राजा आणि त्याच्या राजवटीतला सावळागोंधळ यावरचे हे नाटक प्रसिद्ध आहे. या नाटकातल्या राज्यात एक बकरा मरतो. त्याला कोणी मारले हे ठरवताना कारभारी फाशीच्या दोरखंडात ज्याची मान बसते त्याला दोषी ठरवतात. येथे तसेच काहीसे घडताना दिसते आहे. कथुरिया यांच्या अटकेसंबंधीची वस्तुस्थिती आणि परिस्थिती याविषयी गंभीर चिंता व्यक्त होत असून, गंभीर घटना घडल्यावर एखाद्याला बळीचा बकरा बनवून त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालण्याची प्रवृत्ती वाढते आहे हेच यातून दिसते.

पोलिसांनी कथुरिया यांच्यावर थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी बादरायण संबंध जोडून ठेवलेले आरोप पूर्णपणे फेटाळून न लावता न्यायालयातही कथुरिया यांना जामीन नामंजूर केला गेला आणि १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले. पोलिसांनी हडेलहप्पी करून एखाद्याचे व्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेतले असल्याचे जाणवले, तर त्याला पहिल्या पायरीवर न्यायालयातच वचक बसावा, असा संकेत आहे. या घटनेत तसेही झालेली दिसत नाही. कथुरिया हे भर पावसात पाणी साठलेल्या रस्त्यातून वाहन हाकत होते, याव्यतिरिक्त  त्यांचे काही चुकले आहे असे यासंबंधीच्या बातमीत म्हटलेले नाही. केवळ पावसाने पाणी साठलेल्या रस्त्यावरून वाहन नेले म्हणून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा एखाद्यावर कसा लावता येऊ शकतो?

आता हाच तर्क लावायचा झाला तर तो दिल्लीच्या पोलिस आयुक्तांनाही लावता येईल. जर रस्ता पाण्याने भरलेला होता तर त्यांनी तो वाहतुकीला बंद का केला नाही, असा थेटच प्रश्न यासंदर्भात विचारता येऊ शकतो. पण, तसेही झालेले नाही.पोलिसी कारवायांचा आतापर्यंतचा इतिहास पाहता दिल्ली पोलिसांनी एखाद्याच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालण्याचेही हे काही पहिले उदाहरण नाही.  न्यायालयातही कथुरिया यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली गेली. संशयिताला जामीन देण्याच्या प्रकरणात कशी हेळसांड होते याचेही हे द्योतक होय.

व्यक्तीचे स्वातंत्र्य हिरावले जात असेल तर घटनेने उपलब्ध करून दिलेला तो पहिला बचाव असतो. संशयितासंबंधी बहुतेक कनिष्ठ न्यायालये तांत्रिक वागतात. पोलिसांनी आरोपीला समोर उभे केले की त्याला तुरुंगात पाठवून देतात. याही प्रकरणात हेच झालेले दिसते. तळघरात घुसलेल्या पाण्यात गुदमरून तरुण विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे प्रकरण बरेच गंभीर असल्याने कथुरियांवर झालेल्या अन्यायाची फारशी चर्चा देशात होताना दिसत नाही.

‘अंधेर नगरी’ या नाटकात चौपट राजाच्या हुकूमशाही आणि अविवेकी राजवटीचा शेवट कसा होतो, हेही पाहण्यासारखे आहे. या नाटकात दोषींचा शोध घेण्याची जबाबदारी असलेला गुरू शेवटी राजालाच फाशी घ्यायला सांगतो. आपण त्या स्तराला पोहोचायचे आहे का?

 

टॅग्स :delhiदिल्ली