शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विभाजनाच्या राजकारणाचा पराभव

By admin | Updated: February 10, 2015 23:39 IST

दिल्ली विधानसभेच्या ७० पैकी ६७ जागा जिंकून अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पार्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि

दिल्ली विधानसभेच्या ७० पैकी ६७ जागा जिंकून अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पार्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारसह भारतीय जनता पार्टीचा आणि संघ परिवाराच्या सगळ्या शाखोपशाखांचा न भूतो न भविष्यति असा पराभव केला आहे. केजरीवालांनी याआधी दिल्लीत ४९ दिवस त्यांचे अल्पमताचे सरकार चालविले. मात्र तेवढ्या दिवसात विजेचे दर ५० टक्क्यांनी कमी करण्याचा एक विक्रमी निर्णय त्याने घेतला. त्या तुलनेत दिल्लीत भाजपाचे सरकार सत्तारूढ होऊन नऊ महिने झाले आहेत. केजरीवालांनी दिल्लीचे मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर दिल्लीची सत्ता ही तेथील नायब राज्यपालांमार्फत मोदींच्या हाती आली आहे. त्यामुळे केंद्राएवढेच दिल्लीच्या स्थानिक सरकारवरही मोदींचे व भाजपाचे वर्चस्व मोठे आहे. या सरकारला दिल्लीच्या जनतेने अशी धूळ चारली असेल तर त्या सरकारने वर्षभरातच जनतेचा मोठा अपेक्षाभंग करून तिचा संताप आपल्यावर ओढवून घेतला असे म्हणावे लागेल. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने दिल्लीच्या सातही जागा जिंकल्या. नंतर महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा ही राज्ये जिंकून काश्मिरातही सत्तेत सहभागी होण्याची त्याने तयारी केली. दिल्लीच्या आताच्या निवडणुकीत मोदींनी सहा जाहीर सभा घेतल्या. अरुण जेटली, राजनाथसिंग, सीतारामन, गडकरी आणि स्मृती इराणी यांच्यासह एक डझन केंद्रीय मंत्री आणि दहा डझन खासदारांना दिल्लीतील प्रचाराला भाजपाने जुंपले. शिवाय संघाची देशभरातील हजारो माणसे या निवडणूक प्रचारासाठी त्याने काही काळ देशाच्या राजधानीत आणून ठेवली. तोपर्यंत मिळालेल्या विजयांनी आपण बेबंद आहोत आणि आपल्याला कुणीही अडवू वा थांबवू शकत नाही हा त्या पक्षाला चढलेला उन्माद दिल्लीच्या सामान्य मतदारांनी पार उतरवून दिला. दिल्लीने आजवर अनेक शाह्यांचा पराभव केला. आताचा तिने केलेला पराभव ‘अमित शाही’चा आहे असे एका भाष्यकाराचे म्हणणे येथे उल्लेखनीय ठरावे. मोदींचे सरकार बोलते फार करीत मात्र काहीच नाही ही गोष्ट त्यांच्याच पक्षाचे एक ज्येष्ठ नेते अरुण शौरी यांनीच परवा बोलून दाखविली. स्वयंपाकघरात नुसतीच भांडी वाजतात, जेवण मात्र बाहेर येत नाही असे ते म्हणाले होते. भाजपाची सरकारे ज्या राज्यांत सत्तेवर आली त्यांची स्वयंपाकघरेही अशी नुसतीच भांडी वाजवताना दिसत आहेत हे येथे उल्लेखनीय. मात्र भाजपाचा भपका मोठा, प्रचार अंगावर येणारा, भांडवली गुंतवणूक डोळ्यात भरणारी, प्रचारकांचा अहंकार दहशती वाटणारा, मोदींचे बोलणे हुकूमशहाचे वाटावे तसे आज्ञार्थी आणि संघ परिवार? त्याला तर कुठला धरबंधच नव्हता. लव्ह जिहाद काय, घरवापसी काय आणि हिंदू स्त्रियांनी दहा पोरे जन्माला घालावी काय? नरेंद्र मोदींचे सरकार सत्तारूढ होताच पुन्हा एकवार राम मंदिराची भाषा जागी झाली. सिंघलांनी काशी आणि मथुरेच्या देवळांची भाषा पुढे केली. आदित्यनाथ काय, प्राची काय, निरंजना काय आणि विश्व हिंदू परिषदेचे बेताल पुढारी काय. त्यांच्यातल्या अनेकांनी आणखी पुढे जाऊन देशात नथुराम गोडशाची मंदिरे उभी करण्याच्या घोषणा केल्या. गांधी, गांधी विचार आणि स्वातंत्र्य संग्राम यांची जमेल तेवढी विटंबना केली. मोदींनी स्वत: त्यात भाग घेतला नाही मात्र ते करणाऱ्यांना आवरण्याचा प्रयत्नही त्यांनी कधी केला नाही. देशातील सामान्य माणसांच्या मनाविरुद्ध जाणारी व देशाचे धार्मिक आणि मानसिक विभाजन घडवून आणणारी ही भाषा होती. दिल्लीच्या निवडणुकीने विभाजनाच्या या राजकारणाचाच निर्णायक पराभव केला आहे. केजरीवालांच्या निवडणूक प्रचाराचे कौतुकास्पद वैशिष्ट्य हे की त्यात जात, पात वा धर्माचा लवलेश नव्हता. अखेरच्या काळात दिल्लीच्या शाही इमामाने दिलेला पाठिंबा नाकारण्याचे धाडसही त्यांनी दाखविले. जात-धर्मावाचूनचे राजकारणच विकासाचे व माणुसकीचे राजकारण असते. केजरीवालांच्या आम आदमी पार्टीने ते केले व जनतेने त्याला आपला कौल दिला. किरण बेदी हे या निवडणुकीतील सर्वात दयनीय व केविलवाणे पात्र ठरले. दिल्लीत भाजपाचे सरकार असल्याने व नरेंद्र मोदी हे त्याचे प्रमुख असल्याने ही निवडणूक मोदी विरुद्ध केजरीवाल अशी होईल असेच भय भाजपाच्या मनात होते. तशा निवडणुकीतील मोदींचा पराभव ही राष्ट्रीय घटना ठरली असती म्हणून त्या पक्षाने किरण बेदींना आयत्यावेळी आपल्या उमेदवारीचे अवजड बाशिंग बांधले. मात्र बेदींचा आजवरचा राजकीय प्रवास आणि मोदींच्या व त्यांच्या अहंकारी स्वभावाचा लोकांना आलेला अनुभव त्यांच्या विरोधात जाणारा ठरला. भाजपा आणि संघ परिवाराच्या देश विभाजनाच्या राजकारणाचाही या निवडणूक निकालांनी पराभव केला आहे. तो घडवून आणल्याबद्दल अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. ही निवडणूक काँग्रेस पक्षानेही आपल्या उरल्यासुरल्या ताकदीनिशी लढविली. गेल्या निवडणुकीत त्याला आठ जागा मिळाल्या होत्या. मात्र त्यातली एकही जागा तो पक्ष यावेळी राखू शकला नाही. पक्षाचे नेतृत्व आणि कार्यकर्त्यांचा वर्ग जनतेपासून दूर गेल्याचे हे लक्षण आहे आणि त्यासाठी काँग्रेस पक्षाला फार मोठे परिश्रम यापुढे करावे लागणार आहेत.