शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
4
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
5
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
6
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
7
उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
8
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
9
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
10
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
11
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
12
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
14
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
15
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
16
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
17
रात्री खोकल्याचं औषध प्यायला, पण सकाळी उठलाच नाही; ५ वर्षाच्या मुलाच्या मृत्युनं खळबळ!
18
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
19
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
20
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...

जहरी प्रचाराचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 01:01 IST

देशाचे राजकारणच नव्हे तर त्याची मानसिकताही ज्या टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याने बदलली त्यात अडकलेले ए.डी. राजा आणि कनिमोझी यांच्यासह सगळेच आरोपी दिल्लीच्या सीबीआय कोर्टाने निर्दोष मुक्त केले आहे. त्यामुळे दरम्यानच्या दहा वर्षात झालेले डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकारवरील सारे आरोप, त्यासाठी अण्णा हजारेंपासून अनेकांनी केलेली आंदोलने आणि भाजपच्या लोकांनी एवढा काळ केलेला गदारोळ असे सारेच निरर्थक आणि हास्यास्पद ठरले आहे.

देशाचे राजकारणच नव्हे तर त्याची मानसिकताही ज्या टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याने बदलली त्यात अडकलेले ए.डी. राजा आणि कनिमोझी यांच्यासह सगळेच आरोपी दिल्लीच्या सीबीआय कोर्टाने निर्दोष मुक्त केले आहे. त्यामुळे दरम्यानच्या दहा वर्षात झालेले डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकारवरील सारे आरोप, त्यासाठी अण्णा हजारेंपासून अनेकांनी केलेली आंदोलने आणि भाजपच्या लोकांनी एवढा काळ केलेला गदारोळ असे सारेच निरर्थक आणि हास्यास्पद ठरले आहे. या खटल्यातील सारेच आरोपी निर्दोष ठरल्याने गेली दहा वर्षे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारविरुद्ध केले गेलेले राजकारण, प्रसार माध्यमांचा सारा प्रचार आणि सोशल मीडियावर आलेल्या सगळ्या शहाण्यांचा बरळ असे सारेच एका झटक्यात एका खोट्या किटाळासारखे दूर झाले आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि त्यांचे सरकार यांची बदनामी करणारे सारे सोहळेच विरोधकांनी जाणूनबुजून व राजकीय हेतूने उभे केले हे यामुळे स्पष्ट होऊन डॉ. सिंग यांची प्रतिमा पुन्हा एकवार लखलखीत स्वरूपात देशासमोर आली आहे. वास्तव हे की त्यांचे सरकार ज्या एका मोठ्या आरोपामुळे बदनाम केले गेले व त्यावर सत्तेतून पायउतार होण्याची पाळी आणली गेली तो साराच एक बनाव होता हेही यातून उघड झाले. तो आरोप करणाºयात आजचे अर्थमंत्री अरुण जेटली आणि त्यांचा कंपू आघाडीवर होता. त्यांचा पक्ष आणि परिवार त्यांच्यासोबत होता. शिवाय अण्णा हजारेंसारखी एरवी रिकामी असणारी माणसेही या प्रकाराचा लाभ घेऊन ‘गांधी’ होण्याच्या ईर्षेने दिल्लीत येऊन धडकली. देशातही मनमोहनसिंग यांचे सरकार व काँग्रेस पक्ष यांच्या विरोधात एक विषारी प्रचार केला गेला. खरे तर त्यात सारा देशच ढवळून निघाला. मनमोहनसिंग यांची थोरवी ही की त्यांच्याच सरकारने या प्रकाराचा छडा लावण्याची जबाबदारी सीबीआयकडे सोपविली. शिवाय आरंभापासून या तपासावर न्यायालयासह साºया विरोधकांचे लक्ष केंद्रित होते. हा तपास सुरू असतानाही टू-जी घोटाळ्याची चर्चा सातत्याने सुरू राहील याची काळजी विरोधक घेत राहिले. दरदिवशी केल्या जाणाºया या चिखलफेकीचा परिणाम हा की २०१४ च्या निवडणुकीत डॉ. सिंग यांचे सरकार पराभूत होऊन त्याजागी मोदींचे आजचे सरकार विराजमान झाले. या सरकारनेही गेली तीन वर्षे या प्रकरणाचा छडा लावण्याचे काम जारी ठेवले. एवढ्या साºया तपासणीनंतरही सीबीआयला त्यातील कोणत्याही आरोपीविरुद्ध विश्वासपात्र ठरेल असा एकही पुरावा सादर करता आला नाही. परिणामी सीबीआयच्याच न्यायालयाने यातील सारे आरोपी आता मुक्त केले आहेत. एखादी खोटी गोष्ट राष्ट्रीय पातळीवर सातत्याने उगाळत ठेवली की तिचे राजकीय परिणाम केवढे विपरीत होऊ शकतात याचे याहून मोठे उदाहरण दुसरे नाही. राजीव गांधी यांच्यावर बोफोर्स प्रकरणाचा आरोप गेली ३० वर्षे असाच केला जात आहे. त्यातही अद्याप कोणता विश्वसनीय पुरावा तपास यंत्रणांना पुढे करता आला नाही. बदनामीचे राजकारण करणे आणि कोणताही विधायक कार्यक्रम पुढे न करणे हे नकारात्मक राजकारणाचे चिन्ह आहे. गेली दहा वर्षे हा देश या राजकारणाच्या गोंधळात जगला आहे. खरे तर या प्रकरणात अरुण जेटली, त्यांचे साथीदार, सीबीआयची तपास यंत्रणा आणि त्यांना साथ देणारे सारे प्रचारवीर यांच्यावरच आता बदनामीचे खटले दाखल करून त्यांना आरोपीच्या पिंजºयात उभे करणे न्यायाचे आहे. या लोकांनी एका सभ्य नेत्याला बदनाम करण्यासाठी कोणतीही खालची पातळी गाठायला कमी केले नाही हे या निकालाने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर सीबीआयचा राजकीय वापर करणे व त्या माध्यमाने आपल्या विरोधकांना बदनाम करत व आरोपी ठरवत आपले स्वत:चे राजकारण पुढे नेणे या गोष्टीलाही आता आवर बसला पाहिजे. सीबीआय ही तशीही लोकांचा विश्वास गमावलेली तपास यंत्रणा आहे. ती एखाद्याचा हेतुपूर्वक छळ करुन तिच्याकडून आपले राजकारण करून घेते हे आता अनेकवार सिद्ध झाले आहे.

टॅग्स :2G Spectrum Scam2 जी स्पेक्ट्रम घोटाळा