शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जहरी प्रचाराचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 01:01 IST

देशाचे राजकारणच नव्हे तर त्याची मानसिकताही ज्या टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याने बदलली त्यात अडकलेले ए.डी. राजा आणि कनिमोझी यांच्यासह सगळेच आरोपी दिल्लीच्या सीबीआय कोर्टाने निर्दोष मुक्त केले आहे. त्यामुळे दरम्यानच्या दहा वर्षात झालेले डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकारवरील सारे आरोप, त्यासाठी अण्णा हजारेंपासून अनेकांनी केलेली आंदोलने आणि भाजपच्या लोकांनी एवढा काळ केलेला गदारोळ असे सारेच निरर्थक आणि हास्यास्पद ठरले आहे.

देशाचे राजकारणच नव्हे तर त्याची मानसिकताही ज्या टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याने बदलली त्यात अडकलेले ए.डी. राजा आणि कनिमोझी यांच्यासह सगळेच आरोपी दिल्लीच्या सीबीआय कोर्टाने निर्दोष मुक्त केले आहे. त्यामुळे दरम्यानच्या दहा वर्षात झालेले डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकारवरील सारे आरोप, त्यासाठी अण्णा हजारेंपासून अनेकांनी केलेली आंदोलने आणि भाजपच्या लोकांनी एवढा काळ केलेला गदारोळ असे सारेच निरर्थक आणि हास्यास्पद ठरले आहे. या खटल्यातील सारेच आरोपी निर्दोष ठरल्याने गेली दहा वर्षे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारविरुद्ध केले गेलेले राजकारण, प्रसार माध्यमांचा सारा प्रचार आणि सोशल मीडियावर आलेल्या सगळ्या शहाण्यांचा बरळ असे सारेच एका झटक्यात एका खोट्या किटाळासारखे दूर झाले आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि त्यांचे सरकार यांची बदनामी करणारे सारे सोहळेच विरोधकांनी जाणूनबुजून व राजकीय हेतूने उभे केले हे यामुळे स्पष्ट होऊन डॉ. सिंग यांची प्रतिमा पुन्हा एकवार लखलखीत स्वरूपात देशासमोर आली आहे. वास्तव हे की त्यांचे सरकार ज्या एका मोठ्या आरोपामुळे बदनाम केले गेले व त्यावर सत्तेतून पायउतार होण्याची पाळी आणली गेली तो साराच एक बनाव होता हेही यातून उघड झाले. तो आरोप करणाºयात आजचे अर्थमंत्री अरुण जेटली आणि त्यांचा कंपू आघाडीवर होता. त्यांचा पक्ष आणि परिवार त्यांच्यासोबत होता. शिवाय अण्णा हजारेंसारखी एरवी रिकामी असणारी माणसेही या प्रकाराचा लाभ घेऊन ‘गांधी’ होण्याच्या ईर्षेने दिल्लीत येऊन धडकली. देशातही मनमोहनसिंग यांचे सरकार व काँग्रेस पक्ष यांच्या विरोधात एक विषारी प्रचार केला गेला. खरे तर त्यात सारा देशच ढवळून निघाला. मनमोहनसिंग यांची थोरवी ही की त्यांच्याच सरकारने या प्रकाराचा छडा लावण्याची जबाबदारी सीबीआयकडे सोपविली. शिवाय आरंभापासून या तपासावर न्यायालयासह साºया विरोधकांचे लक्ष केंद्रित होते. हा तपास सुरू असतानाही टू-जी घोटाळ्याची चर्चा सातत्याने सुरू राहील याची काळजी विरोधक घेत राहिले. दरदिवशी केल्या जाणाºया या चिखलफेकीचा परिणाम हा की २०१४ च्या निवडणुकीत डॉ. सिंग यांचे सरकार पराभूत होऊन त्याजागी मोदींचे आजचे सरकार विराजमान झाले. या सरकारनेही गेली तीन वर्षे या प्रकरणाचा छडा लावण्याचे काम जारी ठेवले. एवढ्या साºया तपासणीनंतरही सीबीआयला त्यातील कोणत्याही आरोपीविरुद्ध विश्वासपात्र ठरेल असा एकही पुरावा सादर करता आला नाही. परिणामी सीबीआयच्याच न्यायालयाने यातील सारे आरोपी आता मुक्त केले आहेत. एखादी खोटी गोष्ट राष्ट्रीय पातळीवर सातत्याने उगाळत ठेवली की तिचे राजकीय परिणाम केवढे विपरीत होऊ शकतात याचे याहून मोठे उदाहरण दुसरे नाही. राजीव गांधी यांच्यावर बोफोर्स प्रकरणाचा आरोप गेली ३० वर्षे असाच केला जात आहे. त्यातही अद्याप कोणता विश्वसनीय पुरावा तपास यंत्रणांना पुढे करता आला नाही. बदनामीचे राजकारण करणे आणि कोणताही विधायक कार्यक्रम पुढे न करणे हे नकारात्मक राजकारणाचे चिन्ह आहे. गेली दहा वर्षे हा देश या राजकारणाच्या गोंधळात जगला आहे. खरे तर या प्रकरणात अरुण जेटली, त्यांचे साथीदार, सीबीआयची तपास यंत्रणा आणि त्यांना साथ देणारे सारे प्रचारवीर यांच्यावरच आता बदनामीचे खटले दाखल करून त्यांना आरोपीच्या पिंजºयात उभे करणे न्यायाचे आहे. या लोकांनी एका सभ्य नेत्याला बदनाम करण्यासाठी कोणतीही खालची पातळी गाठायला कमी केले नाही हे या निकालाने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर सीबीआयचा राजकीय वापर करणे व त्या माध्यमाने आपल्या विरोधकांना बदनाम करत व आरोपी ठरवत आपले स्वत:चे राजकारण पुढे नेणे या गोष्टीलाही आता आवर बसला पाहिजे. सीबीआय ही तशीही लोकांचा विश्वास गमावलेली तपास यंत्रणा आहे. ती एखाद्याचा हेतुपूर्वक छळ करुन तिच्याकडून आपले राजकारण करून घेते हे आता अनेकवार सिद्ध झाले आहे.

टॅग्स :2G Spectrum Scam2 जी स्पेक्ट्रम घोटाळा