शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बदनामी, शिक्षा आणि अपात्रता : कायदा काय सांगतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 08:42 IST

युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आरोप सिद्ध झाला असे न्यायालयाला वाटले तर आरोपीला शिक्षा ठोठावण्यापूर्वी आरोपीला शिक्षेबद्दल काही म्हणावयाचे असल्यास ते ऐकून घेतले जाते.

- फिरदौस मिर्झा

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर एकुणातच एखादी व्यक्ती / समूहाची बदनामी, त्यातून होणारी शिक्षा, लोकप्रतिनिधी म्हणून अपात्रता याच्याशी संबंधित कायद्यांच्या स्वरूपाबद्दल चर्चा सुरू झाली आहे. घटनेचे १९ वे कलम विचार स्वातंत्र्याचे रक्षण करते. परंतु कायद्याने त्यावर काही बंधने घातली आहेत. दुसऱ्या कोणाच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचेल असे बोलणे, लिहिणे ही भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ४९९ नुसार बदनामी ठरते आणि त्यासाठी दोन वर्षांचा साधा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते. कायद्याने हा गुन्हा अदखलपात्र ठरवला आहे. याचा अर्थ पोलिस गुन्हा दाखल करून घेऊ शकत नाहीत. परंतु ज्याला आपली बदनामी झाली आहे, असे वाटते तो न्यायालयात खटला दाखल करू शकतो.

न्यायालय पुरावा दाखल करून घेते; आरोपीला साक्षीदार तपासण्याची संधी दिली जाते; युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आरोप सिद्ध झाला असे न्यायालयाला वाटले तर आरोपीला शिक्षा ठोठावण्यापूर्वी आरोपीला शिक्षेबद्दल काही म्हणावयाचे असल्यास ते ऐकून घेतले जाते. आरोपीचे पूर्वायुष्य समाजातील प्रतिष्ठा वगैरे लक्षात घेऊन शिक्षा ठोठावली जाते. बदनामीच्या गुन्ह्यासाठी दिली जाणारी शिक्षा केवळ दंडाच्या स्वरूपात किंवा एक दिवस ते २ वर्षे साधा कारावास किंवा दोन्ही अशी असू शकते. दंडाची रक्कम किती असावी किंवा कमीत कमी किती काळ तुरुंगवासाची शिक्षा ठोठावावी हे कायदा स्पष्ट करत नाही. लोकांच्या भल्यासाठी जे सत्य सांगणे आवश्यक आहे, त्याला कायदा बदनामी मानत नाही.

लोकांच्या प्रश्नांना हात घालणे, दुसऱ्यावर ठपका ठेवण्याचा कायदेशीर अधिकार असणे आणि तसे करणे, अधिकृत व्यक्तीने आरोप करणे, स्वतःच्या किंवा इतरांच्या हितरक्षणासाठी एखाद्याने आरोप करणे, लोकांच्या भल्यासाठी सावध करणे, या गोष्टींचा अपवाद केला गेला आहे. अट एकच- भावना चांगली हवी. आरोपीने तसे केले तर तो निर्दोष ठरतो. प्रत्येक वेळी एखादे विधान बदनामी होत नाही. २०१४ च्या संसदेशी तुलना करता २०१९ च्या संसदेत गुन्हेगारी खटले दाखल असलेल्या खासदारांची संख्या २६ टक्क्यांनी वाढलेली आहे. शिष्ट गुन्ह्यांसाठी शिक्षा झाली असेल तर राज्य विधिमंडळ किंवा संसदेतून आमदार- खासदाराला अपात्र ठरवण्याची तरतूद लोकप्रतिनिधी कायदा १९७१च्या आठव्या कलमात आहे. शिक्षा ठोठावली जाईल त्या दिवसापासून ही अपात्रता लागू होते.

तुरुंगवास संपल्यानंतर सहा वर्षापर्यंत निवडणूक प्रक्रियेत भाग घेता येत नाही. या गुन्ह्यांचे प्रकारही वेगवेगळे केले गेले आहेत. विविध गटांत वैमनस्य निर्माण केल्याबद्दल दंडाची शिक्षा झाली असेल किंवा लाचखोरी, लैंगिक गुन्ह्याचे आरोप सिद्ध झाल्यास संबंधिताला अपात्र ठरवले जाईल. साठेबाजी, नफेखोरी, अन्न तसेच औषधातील भेसळ, हुंडा प्रतिबंधक कायदा अशा प्रकरणात आरोपीला सहा महिन्यांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास लोकप्रतिनिधी म्हणून ती व्यक्ती अपात्र ठरेल आणि अंतिमतः कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरल्याने किमान दोन वर्षे वा त्याहून अधिक शिक्षा झालेली व्यक्ती लोकप्रतिनिधी म्हणून अपात्र ठरवली जाईल. राहुल गांधी यांचे प्रकरण या शेवटच्या वर्गात मोडते.

१९८९ साली आठव्या कलमाला उपकलम चार जोडण्यात आले. खासदार, आमदार यांना अपवाद करून आपोआप अपात्र ठरवण्यासाठी शिक्षा फर्मावल्यानंतर तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला. परंतु सर्वोच्च न्यायालयाने लिली थॉमस विरुद्ध केंद्र सरकार या दाव्यात हे उपकलम घटनाबाह्य ठरवले. त्यानंतर संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दुसऱ्या कारकिर्दीत वटहुकूम काढून अशाच अपवादाची तरतूद करण्यात आली. परंतु राहुल गांधी यांनीच त्या वटहुकूमाला विरोध केला होता.

खटला चालवणाऱ्या न्यायालयाने दोषी ठरवणे, शिक्षा फर्मावणे याचा अर्थ आरोपींच्या पुढे आता कोणताच मार्ग उरला नाही, असा होत नाही. तो अपिलात जाऊ शकतो. कायदे मंडळाचे सदस्यत्व पुढे चालू ठेवायचे असेल तर शिक्षा रद्दबातल ठरवावी इतकेच नव्हे तर शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करता येते. अलीकडेच लक्षद्वीपमधल्या एका खासदाराच्या बाबतीत असे घडले आहे. त्याला शिक्षा होऊन अपात्र ठरवले गेले. पोटनिवडणूक जाहीर झाली; परंतु दरम्यान त्याच्या शिक्षेला स्थगिती मिळवून त्याचे सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आले.

टॅग्स :Courtन्यायालयIndiaभारत