शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

रंगलेल्या गालांचा मुका अन् घसरलेली लायकी

By यदू जोशी | Updated: September 18, 2021 06:56 IST

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सभ्यतेचं विसर्जन चाललंय. एकमेकांविरुद्ध वाट्टेल ते बोलण्याची स्पर्धा लागली आहे.

यदु जोशी

दहा दिवसांच्या गणरायांचं विसर्जन व्हायला एक दिवस बाकी आहे, पण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सभ्यतेचं विसर्जन चाललंय. एकमेकांविरुद्ध वाट्टेल ते बोलण्याची स्पर्धा लागली आहे. पूर्वीही प्रत्येक पक्षात एक शाऊटिंग ब्रिगेड असायची पण तिचा वापर कधीकाळी व सोईनुसार करवून घ्यायचे. आता असभ्य भाषा मुख्य बनली असून, सभ्यता अडगळीत पडत चालली आहे. ‘राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे’ हे प्रवीण दरेकरांचं विधान त्याचंच लक्षण आहे. त्यांना प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी महिला आघाडीच्या रुपाली चाकणकरांचं, ‘महिलांचा अपमान करणाऱ्यांचा गाल आणि थोबाडही आम्ही रंगवू शकतो’, हे विधानही राऊडी स्टाईलचंच. 

दरेकरांना सुरेखाताई पुणेकर यांच्यासारख्यांचे रंगलेले गाल दिसले पण त्यामागचे कष्ट, बांधिलकी आणि समर्पण दिसलं नाही. ठाण्याच्या पहिल्या लावणी महोत्सवात फाटकी साडी घालून गेलेल्या  सुरेखाताईंनी स्वत:चं विश्व तर निर्माण केलंच पण लावणी सातासमुद्रापार नेली. महिलांच्या भरगच्च उपस्थितीत त्यांचे शेकडो कार्यक्रम झाले. बीभत्सपणा, अंगप्रदर्शनाला फाटा देत संस्कारक्षम, ठेवणीतली लावणी त्यांनी घराघरापर्यंत पोहोचवली. सुरेखाताई अन् त्यांच्या दोन बहिणी लोकांकडे धुणीभांडी करायच्या, त्यातून साठलेल्या पैशांतून सुरेखाताई कथ्थक शिकल्या. हजारो मुलींना त्यांनी कलावंत म्हणून घडवलं. लावणी जातीपातीपलिकडे नेली. 

राष्ट्रवादीला डिवचताना  लोककलावंतीणी अन् लोककलेचा उपमर्द झाल्याची उपरतीही दरेकरांना झालेली नाही. यमुनाबाई वाईकर, विठाबाई नारायणगावकर, छाया-माया खुटेगावकर, शकुंतलाबाई नगरकर, मधु कांबीकरांपासून मंगला बनसोडेपर्यंतच्या लावणी/तमाशा कलावंतांनी समाजाचं निखळ मनोरंजन करताना दरवेळी गाल रंगवले, उच्चभ्रू समाजानं हिणवलेल्या कलाप्रांतात ठसा उमटवला. गर्दीतून कोणी नवथर स्टेजवर येईल आणि काही अशीतशी हरकत करेल; अशी कोणाची हिंमत होत नसे. समाजातील काही विशिष्ट लोकांनी अनैतिकतेचा ठप्पा मारलेल्या या कलाप्रकाराची पालखी वाहणाऱ्या या लोककलावंतीणींचा नैतिक धाकच तसा होता. हे सगळं दरेकर यांना समजलं असतं तर त्यांना कलावंत महिलांचे फक्त लाल गाल न दिसता त्यांचं योगदान दिसलं असतं. 

‘पिंजरा’ सिनेमा खूप गाजला, पण समाजानं लोककला म्हणून स्वीकारलेला तमाशा ‘पिंजरा’ने सामाजिकदृष्ट्या अस्पृश्य केला. लावणी, तमाशाकडील लोकांचा ओढा कमी करण्यासाठी तमाशाला सिनेमांमध्ये नेहमीच बदनाम केलं गेलं,  असं मानणारा लोककलावंतांचा मोठा वर्ग आजही आहे. गाल रंगवून सिनेमा, टीव्हीचा पडदा गाजवणाऱ्या अनेक नट्या वेगवेगळ्या पक्षात गेल्या, तेव्हा त्यांच्या रंगवलेल्या गालांवर कोणी बोललं नाही. पण सुरेखा पुणेकरांसारखी अत्यंत लोकप्रिय लावणीसम्राज्ञी राजकारणात प्रवेश करत असताना दरेकर यांना हे असं विधान करावंसं वाटावं? 

दिल्लीत काँग्रेस टार्गेटवर पण...

गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील भाजपचे नेते हे शिवसेना व राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांना ‘टार्गेट’ का करत असावेत? खरंतर उद्या भाजपला राज्यात काही चमत्कार करायचा तर या दोन पक्षांपैकीच एकाची मदत घ्यावी लागणार आहे. तरीही दोन पक्षांना खच्ची करण्याचं का चाललं आहे? की वरून तसे काही आदेश आहेत? राष्ट्रीय पातळीवर मोदी-शहा हे काँग्रेसला अधिकाधिक नाऊमेद करताना दिसतात, पण राज्यातील भाजपच्या नेत्यांचा निशाणा काँग्रेसवर नाही. शेवटी केंद्राचं राजकारण वेगळं, राज्याचं वेगळं. एकतर काँग्रेसच्या मंत्र्यांची काही प्रकरणं नसावीत किंवा भाजपच्या राज्यातील नेत्यांना ती काढायची नसावीत. काँग्रेसला असं अभय देण्यामागची काहीतरी रणनीती नक्कीच असली पाहिजे. राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपच्या रडारवर शिवसेना, राष्ट्रवादी आहेत पण काँग्रेस नाही. प्रादेशिक पक्षांची स्पेस घेता येईल तितकी घ्यावी, असं सूत्र दिसतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये बोलताना ‘आज माजी अन् एकत्रित आले तर भावी सहकारी’ असा भाजपबाबत उल्लेख करून गुगली टाकली. चंद्रकांत पाटील काल म्हणाले, ‘मला माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवस वाट पहा’... महाराष्ट्रात वेगळं काही घडणार तर नाही? 

भाजपचं वेगळेपण

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात  चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात भाजपचे राज्यातील काही नेते दिल्लीला गेले होते. दिल्लीतील महाराष्ट्राच्या मंत्र्यांशी प्रदेश भाजपचा पुढेही ‘कनेक्ट’ राहील, असं चंद्रकांतदादा म्हणाले होते. ते अन्  देवेंद्र फडणवीस तेवढ्यावरच थांबले नाहीत. केंद्रातील मराठी मंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकारी अन् भाजपचे राज्यातील पदाधिकारी यांची नावं समन्वयासाठी निश्चित झाली अन् काम सुरू झालं. गणेशोत्सवानंतर केंद्रातील मंत्र्यांचे विभागवार दौरे होणार आहेत. विश्वास पाठक, ओमप्रकाश शेटे, अमित चव्हाण हे भाजप-संघाची पार्श्वभूमी असलेले तिघे अनुक्रमे रावसाहेब दानवे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड या मंत्र्यांकडे ओएसडी म्हणून जाणीवपूर्वक नेमण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे विषय भाजप मार्गी लावत आहे.

टॅग्स :Politicsराजकारण