शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा!

By admin | Updated: September 25, 2016 23:39 IST

राज्यात करवाढ करायची असेल तर सहसा ती अर्थसंकल्पीय अधिवेशनात करावी असे संकेत आहेत. पण वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या

राज्यात करवाढ करायची असेल तर सहसा ती अर्थसंकल्पीय अधिवेशनात करावी असे संकेत आहेत. पण वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या आठवड्यात मध्येच ती केली. राज्याच्या तिजोरीत भर पडावी म्हणून त्यांनी तसे केले असेलही; पण त्यामुळे अर्थसंकल्पाचे महत्त्व कमी झाले, हे नक्की. त्यानंतर काही दिवसात त्यांनी सरकारी जागा विकून किंवा त्यांची भाडी वाढवून महसूल गोळा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचा अर्थ राज्याच्या तिजोरीवरचे संकट वाढले आहे, असा निघतो. लोकांना आवडणाऱ्या, लोकप्रिय घोषणा करणे, त्यासाठी निधींची तरतूद करणे अशा गोष्टींकडे कल वाढला आणि राज्याच्या तिजोरीला अनेक बाजूंनी गळती सुरू झाली. महसूल वाढला पाहिजे याविषयी दुमत नाही, पण तो वाढत असताना ज्या योजना आपण राबवत आहोत त्यांची अवस्था काय आहे? त्यासाठी सरकार म्हणून आपली नेमकी जबाबदारी पाड पाडली जाते की नाही याचे आत्मपरीक्षण करण्याची मात्र एकाही विभागाची तयारी नाही, हे आजचे विदारक सत्य आहे. सरता आठवडा कुपोषणाच्या बातम्यांनी गाजला. अर्थमंत्र्यांनीच मध्यंतरी सांगितलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील आदिवासी कुपोषित बालकांची संख्या २३,००० आहे. शिवाय ५० हजार कुटुंंबे कुपोषणाच्या विळख्यात आहेत, तर १.९८ कोटी जनता उपाशी किंवा अर्धपोटी राहते आहे. १२५ तालुक्यांतील मानव विकास निर्देशांक खालावल्याचे समोर आले आहे. दोन कोटी नागरिकांची दिवसाला १२ रुपये खर्च करण्याचीही ऐपत नाही. हे एका विभागाचे चित्र आहे. आरोग्य विभागातही फार वेगळे चित्र नाही. ११ कोटी लोकसंख्या असणाऱ्या राज्यात शासकीय रुग्णालयांची संख्या ५१६ आहे. जागतिक आरोग्य सेवेच्या निकषानुसार ४० लोकसंख्येमागे एक बेड असणे अपेक्षित असताना आपल्याकडे ३५०० लोकसंख्येमागे एक बेड आहे. डिजिटल इंडिया असे सांगत असताना राज्यातल्या ५९,६३९ शाळांमध्ये संगणक नाहीत आणि ५२२ शाळांमध्ये साधे पिण्याचे पाणी देण्याची सोय नाही. आश्रमशाळांमधील दोन लाख विद्यार्थ्यांना स्वेटर आणि बूटदेखील वेळेवर देता आलेले नाहीत. या आर्थिक वर्षाचे सहा महिने पूर्ण झाले आणि सर्व विभागांनी मिळून आत्तापर्यंत खर्च केलेला निधी आहे फक्त २२ टक्के!आकडेवारीच्या आघाडीवर अशी अवस्था असताना विकासकामे एकाच भागात केंद्रित करण्याचे प्रयत्न स्वार्थ जोपासण्यापलीकडे जात नाहीत. मुंबई-पुणे महामार्गावर आणखी तीन-चार हजार कोटी खर्च करून सध्याच्या कंपनीला २०३५ पर्यंत टोलवाढ कशी देता येईल याचा विचार करतानाच राज्यातील अन्य भागातले रस्तेही दुरुस्त झाले पाहिजेत, ते भागही महाराष्ट्रात येतात हे बहुधा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गावीच नसावे. ते स्वत:चे खिसे भरण्याच्या योजना मात्र पुढे रेटतानाचे चित्र आहे. मुंबईचे रस्ते खड्डेयुक्त झालेले असताना ते दुरुस्त करण्याचे सोडून ठेकेदार व बिल्डरांना अटक करण्यात धन्यता मानण्याचे राजकारण केले पण त्याचे पुढे काय झाले हा प्रश्न अनुत्तरित आहे. जगभरातील विविध महाविद्यालयांचे प्रवेश पूर्ण झाले आणि ती कॉलेजेस सुरूही झाली. पण अद्याप महाराष्ट्रात नीट परीक्षेचा घोळ न संपल्याने सप्टेंबर संपत आला तरी अनेक मेडिकल कॉलेजेस सुरू झालेली नाहीत. गृहनिर्माण विभागाने पाच वर्षात ११ लाख घरे बांधण्याचे आश्वासन दिले. येत्या नोव्हेंबरात सरकारला दोन वर्षे पूर्ण होतील, अद्याप एकही घर बांधून झालेले नाही. ही जंत्री सांगण्याचे कारण म्हणजे राज्यापुढे काय वाढून ठेवले आहे याची जाणीव ठेवून काम करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सगळी लढाई एकाकी सुरू आहे. मुनगंटीवारांसारखे एक दोन मंत्री सोडले तर कोणीही त्यांच्या खांद्याला खांदा लावून राज्याचा डोलारा सावरतोय असे चित्र दुर्दैवाने दिसत नाहीे. अधिकारी गटबाजीत मग्न आहेत व मंत्री एकमेकांना उघडे पाडण्यात गुंतले आहेत. दुसरीकडे दोन्ही काँग्रेस आपापसातच भिडल्या आहेत. राज्याचे ‘जाणते राजे’ मात्र सामाजिक ऐक्य टिकले पाहिजे असे बोलत सध्याच्या परिस्थितीचे विश्लेषण करण्यात मग्न आहेत.- अतुल कुलकर्णी