शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

बहिरेपणा : वेळीच उपचार लाभदायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 00:25 IST

आपली बदलत चाललेली जीवनशैली, प्रदूषण यामुळे कर्णबधिर किंवा बहिरेपणा असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. हा मुख्यत: नैसर्गिक किंवा अपघाताने होणारा आजार म्हणून ओळखला जात असला तरी याची अनेकविध कारणे आहेत, हे येथे लक्षात घेतले पाहिजे.

- डॉ. शारदा तेलंग(कान, नाक, घसा विशेषज्ञ)आपली बदलत चाललेली जीवनशैली, प्रदूषण यामुळे कर्णबधिर किंवा बहिरेपणा असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. हा मुख्यत: नैसर्गिक किंवा अपघाताने होणारा आजार म्हणून ओळखला जात असला तरी याची अनेकविध कारणे आहेत, हे येथे लक्षात घेतले पाहिजे. कर्णबधिर रुग्णांच्या म्हणून काही वेगळ्याच समस्या नक्की असतात. त्यांच्या प्रश्नावर खºया अर्थाने २९ सप्टेंबर १९५१ पासून काम करण्यास सुरुवात झाली. याच दिवशी इटली देशातील रोम शहरात जागतिक कर्णबधिर महासंघाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा शेवटचा रविवार हा ‘आंतरराष्ट्रीय कर्णबधिर दिवस’ म्हणून ओळखला जातो.यानिमित्ताने कर्णबधिरांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात तसेच त्यांच्या समस्यांवर चर्चा, त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यासोबतच बहिरेपणा टाळण्यासाठी विविध माध्यमांतून जागृती होणे गरजेचे असते. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून कर्णबधिर रुग्णांचे जीवन सुसह्य करता येते तसेच बहिरेपणाचे प्रमाण कमी करण्यासाठीही अनेक उपचार उपलब्ध आहेत. आपल्या समाजात कर्णबधिरांचे प्रमाण लक्षणीय आहे. एखादी व्यक्ती अंध असल्यास ते सर्वांना माहीत असते. परंतु एखादी व्यक्ती बहिरी आहे, हे लगेचच जाणवत नाही.बहिरेपणा कधीच दुरुस्त होऊ शकत नाही, असा एक गैरसमज आहे. परंतु आधुनिक वैद्यकीय ज्ञानामुळे रुग्ण योग्य वेळीच डॉक्टरांकडे गेला, तर त्याला बहिरेपणा येणारही नाही. त्यातून एखाद्या व्यक्तीला बहिरेपणा आला असेल, तरीही त्यावर निश्चित उपचार उपलब्ध आहेत. दुसरा एक गैरसमज म्हणजे, बहिरी व्यक्ती कमी बुद्धिमत्तेची असावी. खरे तर त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल शंका घेणे चूक आणि अन्यायकारक आहे. फक्त कमी ऐकू येत असल्यामुळे त्या चर्चेत सहभागी होत नाहीत एवढेच.बºयाच व्यक्ती आपण हळूहळू बहिरे होत आहोत, आपणास कमी ऐकू येत आहे, हे सत्य लवकर स्वीकारत नाहीत. घरातील इतर लोक इतरांनाही लवकर सांगत नाहीत. उगीचच एक न्यूनगंड बाळगतात. तपासणी करून घेण्यासाठी टाळाटाळ करतात. ४० ते ५० टक्के बहिरेपणा आल्यानंतर डॉक्टरांकडे येतात आणि किंचित कमी ऐकू येते, असे सांगतात. खरे तर उपचार जेवढा लवकर सुरू होईल, तेवढा तो जास्त परिणामकारक आणि फायदेशीर. कारण बहिरेपणा वाढत गेल्यास रुग्णांच्या मानसिकतेवर परिणाम होतोच, त्याशिवाय कौटुंबिक, सामाजिक जीवनात मर्यादा येतात. त्याशिवाय त्यांच्या व्यवसायावरही वाईट परिणाम होतो आणि नैराश्य येणे, चिडचिडेपणा वाढणे या गोष्टीही विशेषत: वयस्कर लोकांमध्ये आढळतात. त्यामुळे कमी ऐकू येत आहे असे लक्षात आले की, त्वरित ईएनटी सर्जनचा सल्ला घेऊन लवकरात लवकर उपचार करणे हितकारक ठरते.बहिरेपणावर उपचार हा रुग्णाचे वय, बहिरेपणाची कारणे, प्रकार आणि तीव्रता यावर अवलंबून असतो. त्यासाठी काही तपासणी आवश्यक असतात. कानाची मशीनद्वारे संपूर्ण तपासणी ट्युनिंग फौर्क टेस्ट, आॅडिओमेट्री इत्यादी. इलेक्ट्रॉनिक आॅडिओमीटरच्या साहाय्याने प्रत्येक कानाची श्रवण क्षमता मोजता येते. तसेच बहिरेपणाचे प्रकार आणि कारण समजते. ही तपासणी करूनच उपचार ठरवावे लागतात. ध्वनिवहन यंत्रणेत दोष असतील तर योग्य औषधीने ते कमी होतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सnewsबातम्या