शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

बहिरेपणा : वेळीच उपचार लाभदायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 00:25 IST

आपली बदलत चाललेली जीवनशैली, प्रदूषण यामुळे कर्णबधिर किंवा बहिरेपणा असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. हा मुख्यत: नैसर्गिक किंवा अपघाताने होणारा आजार म्हणून ओळखला जात असला तरी याची अनेकविध कारणे आहेत, हे येथे लक्षात घेतले पाहिजे.

- डॉ. शारदा तेलंग(कान, नाक, घसा विशेषज्ञ)आपली बदलत चाललेली जीवनशैली, प्रदूषण यामुळे कर्णबधिर किंवा बहिरेपणा असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. हा मुख्यत: नैसर्गिक किंवा अपघाताने होणारा आजार म्हणून ओळखला जात असला तरी याची अनेकविध कारणे आहेत, हे येथे लक्षात घेतले पाहिजे. कर्णबधिर रुग्णांच्या म्हणून काही वेगळ्याच समस्या नक्की असतात. त्यांच्या प्रश्नावर खºया अर्थाने २९ सप्टेंबर १९५१ पासून काम करण्यास सुरुवात झाली. याच दिवशी इटली देशातील रोम शहरात जागतिक कर्णबधिर महासंघाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा शेवटचा रविवार हा ‘आंतरराष्ट्रीय कर्णबधिर दिवस’ म्हणून ओळखला जातो.यानिमित्ताने कर्णबधिरांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात तसेच त्यांच्या समस्यांवर चर्चा, त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यासोबतच बहिरेपणा टाळण्यासाठी विविध माध्यमांतून जागृती होणे गरजेचे असते. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून कर्णबधिर रुग्णांचे जीवन सुसह्य करता येते तसेच बहिरेपणाचे प्रमाण कमी करण्यासाठीही अनेक उपचार उपलब्ध आहेत. आपल्या समाजात कर्णबधिरांचे प्रमाण लक्षणीय आहे. एखादी व्यक्ती अंध असल्यास ते सर्वांना माहीत असते. परंतु एखादी व्यक्ती बहिरी आहे, हे लगेचच जाणवत नाही.बहिरेपणा कधीच दुरुस्त होऊ शकत नाही, असा एक गैरसमज आहे. परंतु आधुनिक वैद्यकीय ज्ञानामुळे रुग्ण योग्य वेळीच डॉक्टरांकडे गेला, तर त्याला बहिरेपणा येणारही नाही. त्यातून एखाद्या व्यक्तीला बहिरेपणा आला असेल, तरीही त्यावर निश्चित उपचार उपलब्ध आहेत. दुसरा एक गैरसमज म्हणजे, बहिरी व्यक्ती कमी बुद्धिमत्तेची असावी. खरे तर त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल शंका घेणे चूक आणि अन्यायकारक आहे. फक्त कमी ऐकू येत असल्यामुळे त्या चर्चेत सहभागी होत नाहीत एवढेच.बºयाच व्यक्ती आपण हळूहळू बहिरे होत आहोत, आपणास कमी ऐकू येत आहे, हे सत्य लवकर स्वीकारत नाहीत. घरातील इतर लोक इतरांनाही लवकर सांगत नाहीत. उगीचच एक न्यूनगंड बाळगतात. तपासणी करून घेण्यासाठी टाळाटाळ करतात. ४० ते ५० टक्के बहिरेपणा आल्यानंतर डॉक्टरांकडे येतात आणि किंचित कमी ऐकू येते, असे सांगतात. खरे तर उपचार जेवढा लवकर सुरू होईल, तेवढा तो जास्त परिणामकारक आणि फायदेशीर. कारण बहिरेपणा वाढत गेल्यास रुग्णांच्या मानसिकतेवर परिणाम होतोच, त्याशिवाय कौटुंबिक, सामाजिक जीवनात मर्यादा येतात. त्याशिवाय त्यांच्या व्यवसायावरही वाईट परिणाम होतो आणि नैराश्य येणे, चिडचिडेपणा वाढणे या गोष्टीही विशेषत: वयस्कर लोकांमध्ये आढळतात. त्यामुळे कमी ऐकू येत आहे असे लक्षात आले की, त्वरित ईएनटी सर्जनचा सल्ला घेऊन लवकरात लवकर उपचार करणे हितकारक ठरते.बहिरेपणावर उपचार हा रुग्णाचे वय, बहिरेपणाची कारणे, प्रकार आणि तीव्रता यावर अवलंबून असतो. त्यासाठी काही तपासणी आवश्यक असतात. कानाची मशीनद्वारे संपूर्ण तपासणी ट्युनिंग फौर्क टेस्ट, आॅडिओमेट्री इत्यादी. इलेक्ट्रॉनिक आॅडिओमीटरच्या साहाय्याने प्रत्येक कानाची श्रवण क्षमता मोजता येते. तसेच बहिरेपणाचे प्रकार आणि कारण समजते. ही तपासणी करूनच उपचार ठरवावे लागतात. ध्वनिवहन यंत्रणेत दोष असतील तर योग्य औषधीने ते कमी होतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सnewsबातम्या