शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
4
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
5
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
6
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
7
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
8
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
9
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
10
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
11
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
12
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
13
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
14
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
15
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
16
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
17
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
18
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
19
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले

बहिरेपणा : वेळीच उपचार लाभदायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 00:25 IST

आपली बदलत चाललेली जीवनशैली, प्रदूषण यामुळे कर्णबधिर किंवा बहिरेपणा असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. हा मुख्यत: नैसर्गिक किंवा अपघाताने होणारा आजार म्हणून ओळखला जात असला तरी याची अनेकविध कारणे आहेत, हे येथे लक्षात घेतले पाहिजे.

- डॉ. शारदा तेलंग(कान, नाक, घसा विशेषज्ञ)आपली बदलत चाललेली जीवनशैली, प्रदूषण यामुळे कर्णबधिर किंवा बहिरेपणा असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. हा मुख्यत: नैसर्गिक किंवा अपघाताने होणारा आजार म्हणून ओळखला जात असला तरी याची अनेकविध कारणे आहेत, हे येथे लक्षात घेतले पाहिजे. कर्णबधिर रुग्णांच्या म्हणून काही वेगळ्याच समस्या नक्की असतात. त्यांच्या प्रश्नावर खºया अर्थाने २९ सप्टेंबर १९५१ पासून काम करण्यास सुरुवात झाली. याच दिवशी इटली देशातील रोम शहरात जागतिक कर्णबधिर महासंघाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा शेवटचा रविवार हा ‘आंतरराष्ट्रीय कर्णबधिर दिवस’ म्हणून ओळखला जातो.यानिमित्ताने कर्णबधिरांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात तसेच त्यांच्या समस्यांवर चर्चा, त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यासोबतच बहिरेपणा टाळण्यासाठी विविध माध्यमांतून जागृती होणे गरजेचे असते. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून कर्णबधिर रुग्णांचे जीवन सुसह्य करता येते तसेच बहिरेपणाचे प्रमाण कमी करण्यासाठीही अनेक उपचार उपलब्ध आहेत. आपल्या समाजात कर्णबधिरांचे प्रमाण लक्षणीय आहे. एखादी व्यक्ती अंध असल्यास ते सर्वांना माहीत असते. परंतु एखादी व्यक्ती बहिरी आहे, हे लगेचच जाणवत नाही.बहिरेपणा कधीच दुरुस्त होऊ शकत नाही, असा एक गैरसमज आहे. परंतु आधुनिक वैद्यकीय ज्ञानामुळे रुग्ण योग्य वेळीच डॉक्टरांकडे गेला, तर त्याला बहिरेपणा येणारही नाही. त्यातून एखाद्या व्यक्तीला बहिरेपणा आला असेल, तरीही त्यावर निश्चित उपचार उपलब्ध आहेत. दुसरा एक गैरसमज म्हणजे, बहिरी व्यक्ती कमी बुद्धिमत्तेची असावी. खरे तर त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल शंका घेणे चूक आणि अन्यायकारक आहे. फक्त कमी ऐकू येत असल्यामुळे त्या चर्चेत सहभागी होत नाहीत एवढेच.बºयाच व्यक्ती आपण हळूहळू बहिरे होत आहोत, आपणास कमी ऐकू येत आहे, हे सत्य लवकर स्वीकारत नाहीत. घरातील इतर लोक इतरांनाही लवकर सांगत नाहीत. उगीचच एक न्यूनगंड बाळगतात. तपासणी करून घेण्यासाठी टाळाटाळ करतात. ४० ते ५० टक्के बहिरेपणा आल्यानंतर डॉक्टरांकडे येतात आणि किंचित कमी ऐकू येते, असे सांगतात. खरे तर उपचार जेवढा लवकर सुरू होईल, तेवढा तो जास्त परिणामकारक आणि फायदेशीर. कारण बहिरेपणा वाढत गेल्यास रुग्णांच्या मानसिकतेवर परिणाम होतोच, त्याशिवाय कौटुंबिक, सामाजिक जीवनात मर्यादा येतात. त्याशिवाय त्यांच्या व्यवसायावरही वाईट परिणाम होतो आणि नैराश्य येणे, चिडचिडेपणा वाढणे या गोष्टीही विशेषत: वयस्कर लोकांमध्ये आढळतात. त्यामुळे कमी ऐकू येत आहे असे लक्षात आले की, त्वरित ईएनटी सर्जनचा सल्ला घेऊन लवकरात लवकर उपचार करणे हितकारक ठरते.बहिरेपणावर उपचार हा रुग्णाचे वय, बहिरेपणाची कारणे, प्रकार आणि तीव्रता यावर अवलंबून असतो. त्यासाठी काही तपासणी आवश्यक असतात. कानाची मशीनद्वारे संपूर्ण तपासणी ट्युनिंग फौर्क टेस्ट, आॅडिओमेट्री इत्यादी. इलेक्ट्रॉनिक आॅडिओमीटरच्या साहाय्याने प्रत्येक कानाची श्रवण क्षमता मोजता येते. तसेच बहिरेपणाचे प्रकार आणि कारण समजते. ही तपासणी करूनच उपचार ठरवावे लागतात. ध्वनिवहन यंत्रणेत दोष असतील तर योग्य औषधीने ते कमी होतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सnewsबातम्या