शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

बहिरेपणा : वेळीच उपचार लाभदायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 00:25 IST

आपली बदलत चाललेली जीवनशैली, प्रदूषण यामुळे कर्णबधिर किंवा बहिरेपणा असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. हा मुख्यत: नैसर्गिक किंवा अपघाताने होणारा आजार म्हणून ओळखला जात असला तरी याची अनेकविध कारणे आहेत, हे येथे लक्षात घेतले पाहिजे.

- डॉ. शारदा तेलंग(कान, नाक, घसा विशेषज्ञ)आपली बदलत चाललेली जीवनशैली, प्रदूषण यामुळे कर्णबधिर किंवा बहिरेपणा असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. हा मुख्यत: नैसर्गिक किंवा अपघाताने होणारा आजार म्हणून ओळखला जात असला तरी याची अनेकविध कारणे आहेत, हे येथे लक्षात घेतले पाहिजे. कर्णबधिर रुग्णांच्या म्हणून काही वेगळ्याच समस्या नक्की असतात. त्यांच्या प्रश्नावर खºया अर्थाने २९ सप्टेंबर १९५१ पासून काम करण्यास सुरुवात झाली. याच दिवशी इटली देशातील रोम शहरात जागतिक कर्णबधिर महासंघाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा शेवटचा रविवार हा ‘आंतरराष्ट्रीय कर्णबधिर दिवस’ म्हणून ओळखला जातो.यानिमित्ताने कर्णबधिरांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात तसेच त्यांच्या समस्यांवर चर्चा, त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यासोबतच बहिरेपणा टाळण्यासाठी विविध माध्यमांतून जागृती होणे गरजेचे असते. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून कर्णबधिर रुग्णांचे जीवन सुसह्य करता येते तसेच बहिरेपणाचे प्रमाण कमी करण्यासाठीही अनेक उपचार उपलब्ध आहेत. आपल्या समाजात कर्णबधिरांचे प्रमाण लक्षणीय आहे. एखादी व्यक्ती अंध असल्यास ते सर्वांना माहीत असते. परंतु एखादी व्यक्ती बहिरी आहे, हे लगेचच जाणवत नाही.बहिरेपणा कधीच दुरुस्त होऊ शकत नाही, असा एक गैरसमज आहे. परंतु आधुनिक वैद्यकीय ज्ञानामुळे रुग्ण योग्य वेळीच डॉक्टरांकडे गेला, तर त्याला बहिरेपणा येणारही नाही. त्यातून एखाद्या व्यक्तीला बहिरेपणा आला असेल, तरीही त्यावर निश्चित उपचार उपलब्ध आहेत. दुसरा एक गैरसमज म्हणजे, बहिरी व्यक्ती कमी बुद्धिमत्तेची असावी. खरे तर त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल शंका घेणे चूक आणि अन्यायकारक आहे. फक्त कमी ऐकू येत असल्यामुळे त्या चर्चेत सहभागी होत नाहीत एवढेच.बºयाच व्यक्ती आपण हळूहळू बहिरे होत आहोत, आपणास कमी ऐकू येत आहे, हे सत्य लवकर स्वीकारत नाहीत. घरातील इतर लोक इतरांनाही लवकर सांगत नाहीत. उगीचच एक न्यूनगंड बाळगतात. तपासणी करून घेण्यासाठी टाळाटाळ करतात. ४० ते ५० टक्के बहिरेपणा आल्यानंतर डॉक्टरांकडे येतात आणि किंचित कमी ऐकू येते, असे सांगतात. खरे तर उपचार जेवढा लवकर सुरू होईल, तेवढा तो जास्त परिणामकारक आणि फायदेशीर. कारण बहिरेपणा वाढत गेल्यास रुग्णांच्या मानसिकतेवर परिणाम होतोच, त्याशिवाय कौटुंबिक, सामाजिक जीवनात मर्यादा येतात. त्याशिवाय त्यांच्या व्यवसायावरही वाईट परिणाम होतो आणि नैराश्य येणे, चिडचिडेपणा वाढणे या गोष्टीही विशेषत: वयस्कर लोकांमध्ये आढळतात. त्यामुळे कमी ऐकू येत आहे असे लक्षात आले की, त्वरित ईएनटी सर्जनचा सल्ला घेऊन लवकरात लवकर उपचार करणे हितकारक ठरते.बहिरेपणावर उपचार हा रुग्णाचे वय, बहिरेपणाची कारणे, प्रकार आणि तीव्रता यावर अवलंबून असतो. त्यासाठी काही तपासणी आवश्यक असतात. कानाची मशीनद्वारे संपूर्ण तपासणी ट्युनिंग फौर्क टेस्ट, आॅडिओमेट्री इत्यादी. इलेक्ट्रॉनिक आॅडिओमीटरच्या साहाय्याने प्रत्येक कानाची श्रवण क्षमता मोजता येते. तसेच बहिरेपणाचे प्रकार आणि कारण समजते. ही तपासणी करूनच उपचार ठरवावे लागतात. ध्वनिवहन यंत्रणेत दोष असतील तर योग्य औषधीने ते कमी होतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सnewsबातम्या