शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

तणावमुक्तीच करेल तरुणांची व्यसनमुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 13:03 IST

87 साली संयुक्त राष्ट्रसंघाने 26 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय अमली पदार्थविरोधी दिन म्हणून प्रतिवर्षी पाळला जावा असा निर्णय घेण्यात आला. त्या निमित्ताने...

डॉ. अजित मगदूम, सामाजिक कार्यकर्ते, मुंबई -युक्त राष्ट्र संघाने १९६१, १९७१ तसेच १९८८ मध्ये आंतरराष्ट्रीय परिषदा भरवल्या होत्या. त्यानंतरही १९९८ व २०१६ या दोन वर्षीही विशेष अशा परिषदा भरवल्या त्यात मुख्यतः  अमलीपदार्थांची मागणी व पुरवठा कमी करण्यावर भर देण्यात आला. परंतु झाले याउलट. अमली पदार्थांच्या विविध  देशातल्या वापराचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले.  भारताच्या संविधानातील कलम ४७ मध्ये म्हटल्याप्रमाणे अमली पदार्थांवर नियंत्रण आणि बंदी आणण्याबाबत देशाची जबाबदारी असल्याचे म्हटल्याने तसेच भारत हा आंतरराष्ट्रीय करारावर सही करणारा एक देश असल्याने भारत सरकारने सुरुवातीला मागणी आणि पुरवठा कमी करणे तसेच उपचाराची व्यवस्था करणे या त्रिसूत्रीवर काम करण्याचे निश्चित केले. परंतु त्याप्रमाणे कारवाई झाली नसल्याने अमली पदार्थांचे सेवन व व्यापार जोर धरू लागला. भारतात अफू,गांजा हेराॅइन हे तीन महत्त्वाच्या अंमली पदार्थांच्या वापराचे प्रमाण सर्वाधिक असून मेथामेफेटाइनचे  प्रमाण वाढले आहे. ड्रग इंजेक्ट करण्याचे प्रमाणही भारतात खूप मोठं आहे.  

खरेदी-विक्रीअमली पदार्थांच्या खरेदी-विक्री  व्यवहाराची पद्धत आता हायटेक झाली आहे. आता समोरासमोर येऊन  पेडलर्स मार्फत खरेदी करणं कमी झालं आहे. डार्कनेट, मोबाईल मेसेंजर यांच्याशी ऑनलाईन संपर्काद्वारे व्यवहार होत आहेत. पैसेही बिटकॉइन या आभासी चलनाद्वारे दिले जातात. पदार्थ पोचवण्यासाठी कुरियर सेवा आहेच. म्हणजे कुणालाही या व्यवहाराचा मागमूसही लागत नाही. केवळ देशांतर्गत नव्हे, तर इतर देशातही असेच व्यवहार होतात.  अनेक प्रतिबंधित औषधांतून अमली पदार्थ वेगळे करण्याचे धंदेही सुरू आहेत. डॉक्टरांकडून औषध चिट्ठी घेऊन देशातील अनेक ठिकाणाहून एकाच औषध चिठ्ठीद्वारा ही प्रतिबंधित औषधे गोळा केली जातात व त्यातून अमली पदार्थ किंवा प्रतिबंधित रसायने वेगळी करून पुन्हा ड्रग निर्मिती केली जाते. या सगळ्या उच्च तंत्रज्ञानाने आता ग्राहक व विक्रेता यांचा कुठेही सरळ संबंध नसल्याने त्यांना शोधून काढून कायदेशीर कारवाई करणे अवघड झाले आहे अलीकडेच गुजरात मधील मुंद्रा बंदरात 21 हजार कोटींचे हीरोइन साबण वड्याच्या रूपाने अफगाणिस्तानातून आलेले पकडून ते जप्त करण्यात आल. हे हेरॉईन चेन्नई येथील एका ट्रेडिंग कंपनीने आयात केले होते अशा पद्धतीने अमली द्रव्यांचा आपल्या देशात सुळसुळाट वाढल्याने तरुण पिढी त्याची शिकार बनत असल्याचे चित्र आहे. 

व्यसनाची कारणे -  बेरोजगारी. -  नोकरीत कामाचे वाढलेले तास.-  मित्रांचे दडपण. -  व्यसन जन्य पदार्थांची सहज उपलब्धता. -  प्रसिद्ध चित्रपट कलावंतांकडून होणाऱ्या  छुप्या जाहिराती. -  कुटुंबातला दुरावा व ताण तणाव.-  पालकांचा पाल्यांशी अभ्यासाव्यतिरिक्त संवादाचा अभाव. -  महामारी मुळे ओढवलेले आर्थिक प्रश्न. आई-वडिलांचे तणावपूर्ण संबंध. 

उपाय काय?पालकांनी मुलांसाठी गुणवत्तापूर्ण वेळ दिला पाहिजे. आज मुलांना पालकांचा सहवास पुरेसा मिळत नाही. पालक घरात असले तरी मोबाईलवर त्यांचाही बराच वेळ जाताना दिसतो. त्याऐवजी त्यांनी मुलांशी  गप्पा, मौजमजा, खेळ विनोद यात वेळ घालवला तर घरातलं वातावरण ताजेतवाने उत्साही व तणावमुक्त होण्यास  मदत होईल. प्रेमाचे, जिव्हाळ्याचे नाते संबंध असणे गरजेचे आहे.शासन, प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य व्यवस्था समाजसेवी संस्था इ. सर्वांनी मिळून ठोस उपाययोजना आखून त्याची पाळेमुळे उखडून टाकली पाहिजेत.