शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

तणावमुक्तीच करेल तरुणांची व्यसनमुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 13:03 IST

87 साली संयुक्त राष्ट्रसंघाने 26 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय अमली पदार्थविरोधी दिन म्हणून प्रतिवर्षी पाळला जावा असा निर्णय घेण्यात आला. त्या निमित्ताने...

डॉ. अजित मगदूम, सामाजिक कार्यकर्ते, मुंबई -युक्त राष्ट्र संघाने १९६१, १९७१ तसेच १९८८ मध्ये आंतरराष्ट्रीय परिषदा भरवल्या होत्या. त्यानंतरही १९९८ व २०१६ या दोन वर्षीही विशेष अशा परिषदा भरवल्या त्यात मुख्यतः  अमलीपदार्थांची मागणी व पुरवठा कमी करण्यावर भर देण्यात आला. परंतु झाले याउलट. अमली पदार्थांच्या विविध  देशातल्या वापराचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले.  भारताच्या संविधानातील कलम ४७ मध्ये म्हटल्याप्रमाणे अमली पदार्थांवर नियंत्रण आणि बंदी आणण्याबाबत देशाची जबाबदारी असल्याचे म्हटल्याने तसेच भारत हा आंतरराष्ट्रीय करारावर सही करणारा एक देश असल्याने भारत सरकारने सुरुवातीला मागणी आणि पुरवठा कमी करणे तसेच उपचाराची व्यवस्था करणे या त्रिसूत्रीवर काम करण्याचे निश्चित केले. परंतु त्याप्रमाणे कारवाई झाली नसल्याने अमली पदार्थांचे सेवन व व्यापार जोर धरू लागला. भारतात अफू,गांजा हेराॅइन हे तीन महत्त्वाच्या अंमली पदार्थांच्या वापराचे प्रमाण सर्वाधिक असून मेथामेफेटाइनचे  प्रमाण वाढले आहे. ड्रग इंजेक्ट करण्याचे प्रमाणही भारतात खूप मोठं आहे.  

खरेदी-विक्रीअमली पदार्थांच्या खरेदी-विक्री  व्यवहाराची पद्धत आता हायटेक झाली आहे. आता समोरासमोर येऊन  पेडलर्स मार्फत खरेदी करणं कमी झालं आहे. डार्कनेट, मोबाईल मेसेंजर यांच्याशी ऑनलाईन संपर्काद्वारे व्यवहार होत आहेत. पैसेही बिटकॉइन या आभासी चलनाद्वारे दिले जातात. पदार्थ पोचवण्यासाठी कुरियर सेवा आहेच. म्हणजे कुणालाही या व्यवहाराचा मागमूसही लागत नाही. केवळ देशांतर्गत नव्हे, तर इतर देशातही असेच व्यवहार होतात.  अनेक प्रतिबंधित औषधांतून अमली पदार्थ वेगळे करण्याचे धंदेही सुरू आहेत. डॉक्टरांकडून औषध चिट्ठी घेऊन देशातील अनेक ठिकाणाहून एकाच औषध चिठ्ठीद्वारा ही प्रतिबंधित औषधे गोळा केली जातात व त्यातून अमली पदार्थ किंवा प्रतिबंधित रसायने वेगळी करून पुन्हा ड्रग निर्मिती केली जाते. या सगळ्या उच्च तंत्रज्ञानाने आता ग्राहक व विक्रेता यांचा कुठेही सरळ संबंध नसल्याने त्यांना शोधून काढून कायदेशीर कारवाई करणे अवघड झाले आहे अलीकडेच गुजरात मधील मुंद्रा बंदरात 21 हजार कोटींचे हीरोइन साबण वड्याच्या रूपाने अफगाणिस्तानातून आलेले पकडून ते जप्त करण्यात आल. हे हेरॉईन चेन्नई येथील एका ट्रेडिंग कंपनीने आयात केले होते अशा पद्धतीने अमली द्रव्यांचा आपल्या देशात सुळसुळाट वाढल्याने तरुण पिढी त्याची शिकार बनत असल्याचे चित्र आहे. 

व्यसनाची कारणे -  बेरोजगारी. -  नोकरीत कामाचे वाढलेले तास.-  मित्रांचे दडपण. -  व्यसन जन्य पदार्थांची सहज उपलब्धता. -  प्रसिद्ध चित्रपट कलावंतांकडून होणाऱ्या  छुप्या जाहिराती. -  कुटुंबातला दुरावा व ताण तणाव.-  पालकांचा पाल्यांशी अभ्यासाव्यतिरिक्त संवादाचा अभाव. -  महामारी मुळे ओढवलेले आर्थिक प्रश्न. आई-वडिलांचे तणावपूर्ण संबंध. 

उपाय काय?पालकांनी मुलांसाठी गुणवत्तापूर्ण वेळ दिला पाहिजे. आज मुलांना पालकांचा सहवास पुरेसा मिळत नाही. पालक घरात असले तरी मोबाईलवर त्यांचाही बराच वेळ जाताना दिसतो. त्याऐवजी त्यांनी मुलांशी  गप्पा, मौजमजा, खेळ विनोद यात वेळ घालवला तर घरातलं वातावरण ताजेतवाने उत्साही व तणावमुक्त होण्यास  मदत होईल. प्रेमाचे, जिव्हाळ्याचे नाते संबंध असणे गरजेचे आहे.शासन, प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य व्यवस्था समाजसेवी संस्था इ. सर्वांनी मिळून ठोस उपाययोजना आखून त्याची पाळेमुळे उखडून टाकली पाहिजेत.