शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

तणावमुक्तीच करेल तरुणांची व्यसनमुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 13:03 IST

87 साली संयुक्त राष्ट्रसंघाने 26 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय अमली पदार्थविरोधी दिन म्हणून प्रतिवर्षी पाळला जावा असा निर्णय घेण्यात आला. त्या निमित्ताने...

डॉ. अजित मगदूम, सामाजिक कार्यकर्ते, मुंबई -युक्त राष्ट्र संघाने १९६१, १९७१ तसेच १९८८ मध्ये आंतरराष्ट्रीय परिषदा भरवल्या होत्या. त्यानंतरही १९९८ व २०१६ या दोन वर्षीही विशेष अशा परिषदा भरवल्या त्यात मुख्यतः  अमलीपदार्थांची मागणी व पुरवठा कमी करण्यावर भर देण्यात आला. परंतु झाले याउलट. अमली पदार्थांच्या विविध  देशातल्या वापराचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले.  भारताच्या संविधानातील कलम ४७ मध्ये म्हटल्याप्रमाणे अमली पदार्थांवर नियंत्रण आणि बंदी आणण्याबाबत देशाची जबाबदारी असल्याचे म्हटल्याने तसेच भारत हा आंतरराष्ट्रीय करारावर सही करणारा एक देश असल्याने भारत सरकारने सुरुवातीला मागणी आणि पुरवठा कमी करणे तसेच उपचाराची व्यवस्था करणे या त्रिसूत्रीवर काम करण्याचे निश्चित केले. परंतु त्याप्रमाणे कारवाई झाली नसल्याने अमली पदार्थांचे सेवन व व्यापार जोर धरू लागला. भारतात अफू,गांजा हेराॅइन हे तीन महत्त्वाच्या अंमली पदार्थांच्या वापराचे प्रमाण सर्वाधिक असून मेथामेफेटाइनचे  प्रमाण वाढले आहे. ड्रग इंजेक्ट करण्याचे प्रमाणही भारतात खूप मोठं आहे.  

खरेदी-विक्रीअमली पदार्थांच्या खरेदी-विक्री  व्यवहाराची पद्धत आता हायटेक झाली आहे. आता समोरासमोर येऊन  पेडलर्स मार्फत खरेदी करणं कमी झालं आहे. डार्कनेट, मोबाईल मेसेंजर यांच्याशी ऑनलाईन संपर्काद्वारे व्यवहार होत आहेत. पैसेही बिटकॉइन या आभासी चलनाद्वारे दिले जातात. पदार्थ पोचवण्यासाठी कुरियर सेवा आहेच. म्हणजे कुणालाही या व्यवहाराचा मागमूसही लागत नाही. केवळ देशांतर्गत नव्हे, तर इतर देशातही असेच व्यवहार होतात.  अनेक प्रतिबंधित औषधांतून अमली पदार्थ वेगळे करण्याचे धंदेही सुरू आहेत. डॉक्टरांकडून औषध चिट्ठी घेऊन देशातील अनेक ठिकाणाहून एकाच औषध चिठ्ठीद्वारा ही प्रतिबंधित औषधे गोळा केली जातात व त्यातून अमली पदार्थ किंवा प्रतिबंधित रसायने वेगळी करून पुन्हा ड्रग निर्मिती केली जाते. या सगळ्या उच्च तंत्रज्ञानाने आता ग्राहक व विक्रेता यांचा कुठेही सरळ संबंध नसल्याने त्यांना शोधून काढून कायदेशीर कारवाई करणे अवघड झाले आहे अलीकडेच गुजरात मधील मुंद्रा बंदरात 21 हजार कोटींचे हीरोइन साबण वड्याच्या रूपाने अफगाणिस्तानातून आलेले पकडून ते जप्त करण्यात आल. हे हेरॉईन चेन्नई येथील एका ट्रेडिंग कंपनीने आयात केले होते अशा पद्धतीने अमली द्रव्यांचा आपल्या देशात सुळसुळाट वाढल्याने तरुण पिढी त्याची शिकार बनत असल्याचे चित्र आहे. 

व्यसनाची कारणे -  बेरोजगारी. -  नोकरीत कामाचे वाढलेले तास.-  मित्रांचे दडपण. -  व्यसन जन्य पदार्थांची सहज उपलब्धता. -  प्रसिद्ध चित्रपट कलावंतांकडून होणाऱ्या  छुप्या जाहिराती. -  कुटुंबातला दुरावा व ताण तणाव.-  पालकांचा पाल्यांशी अभ्यासाव्यतिरिक्त संवादाचा अभाव. -  महामारी मुळे ओढवलेले आर्थिक प्रश्न. आई-वडिलांचे तणावपूर्ण संबंध. 

उपाय काय?पालकांनी मुलांसाठी गुणवत्तापूर्ण वेळ दिला पाहिजे. आज मुलांना पालकांचा सहवास पुरेसा मिळत नाही. पालक घरात असले तरी मोबाईलवर त्यांचाही बराच वेळ जाताना दिसतो. त्याऐवजी त्यांनी मुलांशी  गप्पा, मौजमजा, खेळ विनोद यात वेळ घालवला तर घरातलं वातावरण ताजेतवाने उत्साही व तणावमुक्त होण्यास  मदत होईल. प्रेमाचे, जिव्हाळ्याचे नाते संबंध असणे गरजेचे आहे.शासन, प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य व्यवस्था समाजसेवी संस्था इ. सर्वांनी मिळून ठोस उपाययोजना आखून त्याची पाळेमुळे उखडून टाकली पाहिजेत.