शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

डीबीटी-शाप की वरदान?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2017 1:34 AM

सध्याचा काळ ‘कमिशन’चा आहे. शासनाची योजना कितीही लोकउपयुक्त असो त्यात ‘कमिशन’चे गणित जुळत नसेल तर त्या योजनेचा बोजवारा उडालाच म्हणून समजा. थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) आल्याने शासनाच्या अनेक लोकउपयुक्त योजनांचा असाच बोजवारा उडायला लागला आहे. विशेष म्हणजे, डीबीटी येण्याआधी जे लोकप्रतिनिधी लोकउपयुक्त योजनांच्या माध्यमातून आपल्याही तुंबड्या भरून घ्यायचे त्यांच्या कमिशनखोरीवर ...

सध्याचा काळ ‘कमिशन’चा आहे. शासनाची योजना कितीही लोकउपयुक्त असो त्यात ‘कमिशन’चे गणित जुळत नसेल तर त्या योजनेचा बोजवारा उडालाच म्हणून समजा. थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) आल्याने शासनाच्या अनेक लोकउपयुक्त योजनांचा असाच बोजवारा उडायला लागला आहे. विशेष म्हणजे, डीबीटी येण्याआधी जे लोकप्रतिनिधी लोकउपयुक्त योजनांच्या माध्यमातून आपल्याही तुंबड्या भरून घ्यायचे त्यांच्या कमिशनखोरीवर डीबीटीमुळे मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्यात या लोकप्रतिनिधींना आता काडीचाही रस उरलेला नाही. परिणामी अनेक चांगल्या योजनांची पार वाट लागत आहे.वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ पूर्णपणे लाभार्थ्यांना मिळावा म्हणून शासनाने ५ डिसेंबर २०१६ ला थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रक्रिया अमलात आणली व योजनांचे अनुदान संबंधित विभागांकडे जमाही केले. परंतु योजनांसाठी लाभार्थ्यांचे प्रस्तावच विभागाला येत नाहीत कारण लाभार्थ्यांची स्वत: खर्च करण्याची मानसिकताच नाही आणि त्या योजनांचे फायदे समजावून सांगणारे लोकप्रतिनिधी मूग गिळून बसले आहेत.डीबीटी प्रक्रियेचा सर्वात मोठा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. आज अडीच महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही डीबीटीमुळे विद्यार्थ्यांना गणवेश मिळू शकले नाही. बँकेत संयुक्त खाते काढणे, खाते काढल्यानंतर गणवेश खरेदी करणे, खरेदी केलेल्या गणवेशाची पावती मुख्याध्यापकांना देणे आणि नंतर गणवेशाची रक्कम खात्यात जमा होणार, असे दिव्य पार पाडावे लागते.नागपूर जिल्ह्यात गणवेशाचे ७३,३७३ लाभार्थी आहेत. यातील फक्त १० हजार विद्यार्थ्यांच्या खात्यात गणवेशाचे अनुदान जमा झाले आहे. पीव्हीसी पाईप, पीक संरक्षण अवजारे, इलेक्ट्रिक मोटार इंजिन, सायकल, ताडपत्री, शिलाई मशीन लाभार्थ्यांना अनुदानाच्या स्वरुपात देण्यात येते. पूर्वी हे साहित्य लाभार्थ्यांना वस्तुरुपात मिळत होते. यावर्षीपासून शासनाने राबविलेल्या डीबीटीमुळे हे साहित्य लाभार्थ्यांना स्वत: खरेदी करून त्याची पावती संबंधित पंचायत समितीमध्ये दिल्यानंतर त्याचे रोख अनुदान लाभार्थ्याच्या खात्यात जमा होणार आहे. परंतु या शासकीय योजनेचे स्वरूप आता बदलेले आहे, हे सांगणारेच कुणी नसल्याने डीबीटी-शाप की वरदान, असा प्रश्न निर्माण झाला आहे.