शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
3
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
4
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
5
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
6
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
7
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
8
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
9
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
10
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
11
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
12
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
13
अतूट बंध! महागडे गिफ्टस नको तर 'या' ८ गोष्टींनी फुलवा नातं, आयुष्यभर राहा एकमेकांचे सोबती
14
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
15
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
16
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
17
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
18
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!

भिड्यांच्या आंब्याने पुत्रप्राप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 00:27 IST

अंधश्रद्धा हा अडाणी माणसांचा गुणविशेष मानला तर साक्षर, सुशिक्षित व सुसंस्कृतांचा तो अधिकार समजला पाहिजे.

अंधश्रद्धा हा अडाणी माणसांचा गुणविशेष मानला तर साक्षर, सुशिक्षित व सुसंस्कृतांचा तो अधिकार समजला पाहिजे. नाहीतर ‘माझ्या बागेतील आंबे खा आणि पोरे (पोरी नाहीत) जन्माला घाला’ असा साधिकार आदेश संभाजी भिडे या गुरुजीने आपल्या अनुयायांसह महाराष्ट्राला दिला नसता. हे गुरुजी भीमा-कोरेगावातील दंगलीनंतर व तीत झालेल्या हत्याकांडानंतर साऱ्या महाराष्ट्राला एकाएकी ठाऊक झाले. त्याआधी ते आणि त्यांच्या शिष्यांचा समूह पश्चिम महाराष्ट्राच्या कुठल्याशा कोपºयातील लोकांनाच काय तो ठाऊक होता. कधी शिवाजी महाराजांचे तर कधी संभाजी राजांचे नाव घेणाºया या गुरुजींच्या मागे काही राजकारणी नेतेही आहेत आणि ते कट्टर हिंदुत्ववादी असल्याने संघ परिवारालाही आपले वाटणारे आहेत. पाठीशी पुढारी, हाताशी सत्ताधारी आणि सोबतीला अनुयायांचे तांडे असले की माणसांना कुठलेही ताळतंत्र उरत नाही. मग ती गुरुजी म्हणविणारी का असेना. त्यांची दलितविरोधी वक्तव्ये प्रसिद्ध आहेत. धर्मनिरपेक्षतेविरुद्धचा त्यांचा प्रचारही सर्वविदित आहे. अशी माणसे स्वाभाविकपणे विज्ञानविरोधीही असतात. त्यातून त्यांच्यावर भीमा-कोरेगावाच्या दंगलीतील ‘दूरस्थ’ सहभागाचा आरोप आहे. मात्र ते ‘आपले’ म्हणून सरकार त्यांना हात लावीत नाही आणि सरकार पक्षाचे खासदार ‘त्यांना हात लावून तर दाखवा’ अशा जाहीर धमक्याही देतात. अशा माणसाला आपल्या बुवाबाबांची वा बापूंसारख्या कधीतरी समाजाला उपदेश करीत पैसे गोळा करणाºयांची दैवीशक्ती आपल्यातही असल्याचे वाटू लागले तर तो त्याचा मानसशास्त्रीय गुणविशेष मानला पाहिजे. अशा गुणांनी पछाडलेली माणसे मग विनोदी बोलली वा मनाला येईल ते बरळली तरी त्यांच्या शिष्यांना तो गुरूचा संदेश वाटू लागतो. ‘अमूक बाबाने मला काठी मारली’ किंवा ‘तमूक बाबाने माझ्यावर थुंकी उडवली म्हणूनच माझे कल्याण झाले’ असे श्रद्धेने सांगणारी मूर्ख माणसे आपण नेहमीच पाहतो. तसेच काहीसे या संभाजी भिड्यांचे गुरुपण उन्नत झाले असणार. त्याचमुळे ‘माझ्या बागेतील आंबे खाऊन पोरे करून घ्या’ असा धर्मोपदेश त्यांना आपल्या शिष्यांसोबत महाराष्ट्राला करावासा वाटला. त्या शिष्यांनी त्याचा प्रतिवाद केला नाही. उलट आता त्याचे समर्थन करीत ‘आंबा हे वीर्यवर्धक व शक्तीवर्धक फळ आहे’ असे ते समाजाला सांगू लागले आहेत. गाव-खेड्यात गंडे-दोरे विकून व बायाबापड्यांना फसवून आपले गुरुपण वा साधुत्व मिरविणारी असंख्य माणसे समाजाला ठाऊक आहेत. गावोगाव सापडावी एवढी त्यांची संख्या मोठी आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम अपुरे पडावे आणि सरकारचा अंधश्रद्धा निर्मूलनासंबंधीचा कायदाही परिणामकारक ठरू नये एवढा या माणसांचा वावर मोठा व उपद्रवकारी आहे. त्यांच्या उपद्रवाने अडचणीत आलेली माणसेही आपली फसवणूक गिळून गप्प राहतात. त्यांच्या गप्प राहण्यात यांचे जगणे व टिकणे उभे असते. अशी माणसे व त्यांचे वेडाचार पाहिले की दाभोलकर आणि पानसरे यांचे खून का झाले व ते कोणत्या वृत्तीतून झाले हे कळू लागते. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आहे. भिडे गुरुजींचे वक्तव्य त्याचा भंग करणारे आहे. परंतु एखादा अध्यात्म गुरू वा स्वत:ला समाजाचा शिक्षक म्हणविणारा इसम नुसता अशा वक्तव्यापाशी थांबतो तोवर त्याला हाता लावायचा नाही असे बंधन या कायद्यातच आहे. आतापर्यंत जे सद्गुरु तुरुंगात गेले व ज्यांना दंड भरावा लागला ते एक तर बलात्काराच्या आरोपातून कारावासात गेले वा त्यांनी यमुनेसारख्या पवित्र नदीचा प्रवाह नासविल्यामुळे दंडित झाले. ‘नवसाने पोरे झाली तर नवरे कशाला हवेत’ हा समर्थ रामदासांचा उपदेश मनात असलेल्यांना भिडे गुरुजींचे ‘आंब्याने पोरे होतात’ हे वचन वाचून त्यांचे गुरूपण कोणत्या लायकीचे आहे हे कळावे. असो, पण अशा माणसांची ज्ञानी महाराष्ट्रात सध्या चलती आहे. त्यांना अनुयायी मिळतात, सरकारचे संरक्षण मिळते, विरोधकांच्या व सुधारकांच्या टीकेपासून ते सुरक्षित राहतात आणि प्रसिद्धी माध्यमे त्यांचे असले चाळेही आनंदाने प्रकाशित करताना दिसतात. अशावेळी आपण कोणत्या शतकात जगत आहोत एवढाच प्रश्न आपल्याला पडावा.