शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

डार्विन, माकड आणि माणूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:59 IST

मानवाची उत्पत्ती वानरापासून झाली, हा चार्ल्स डार्विनचा सिद्धांत खोटा आहे, हे केंद्रीय मनुष्यबळ राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांचे विधान वाचून हायसे वाटले.

मानवाची उत्पत्ती वानरापासून झाली, हा चार्ल्स डार्विनचा सिद्धांत खोटा आहे, हे केंद्रीय मनुष्यबळ राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांचे विधान वाचून हायसे वाटले. आपण मर्कंटवंशाचे दिवे आहोत, हे शालेय पाठ्यपुस्तकात वाचल्यापासून आमच्या लीलांना सुमारच उरलेला नव्हता. गुरुजींनी एकदा ‘वानर आणि टोपीविक्रेता’ या गोष्टीचे तात्पर्य काय, असे विचारले असता, ‘आपल्या पूर्वजांना अशी टोपी घालणे योग्य नव्हे’, असे उत्तर दिल्याने आम्हांस उठाबशाची शिक्षा मिळाली होती. रामायण काळात हनुमंतासह समस्त वानरसेना प्रभू रामचंद्रांच्या मदतीसाठी धावून आली, सीतेच्या शोधासाठी त्यांनी रामेश्वरमपासून लंकेपर्यंत रामसेतू बांधला. हे त्यांनी भक्तीपोटी नव्हे, तर पितृक प्रेमातून केलं असावं, असा आमचा डार्विन वाचल्यामुळं गैरसमज झाला होता. सत्यपालांनी खरं काय ते सांगून आमच्या मानगुटीवर बसलेलं हे डार्विनचं भूत उतरवून टाकलं ते बरंच झालं. सत्यपाल हे द्रष्टेपुरुष वाटतात. मानवी उत्पत्तीबरोबर भाषेच्या उगमावरही त्यांनी प्रकाश टाकला आहे. त्यांच्या मते, ‘पशू, पक्षी आणि प्राण्यांचे आवाज ऐकून मनुष्य भाषा शिकला हे मानववंश शास्त्रज्ञांचे विधान साफ खोटे आहे. ‘वस्तुत: चंद्र, सूर्य, पृथ्वीच्या निर्मितीनंतर भगवंतांची वेदवाणी झाली आणि मनुष्याच्या तोंडून पहिल्यांदा वेदोच्चारच बाहेर पडला!’ असं असेल तर मग वेदवाणी जाणणारे सप्तर्षी (सात ऋषी) हेच पृथ्वीवरचे प्रथम नागरिक आणि आपण वंशज ठरतो. त्यामुळे सत्यपालांच्या या संशोधनाची दखल घेऊन संयुक्त राष्टÑ संघाने समस्त भारतीयांना वैश्विक नागरिक मानून जगभरचा व्हिसा मंजूर करायला हरकत नाही!भाजपशासित प्रदेशातील अनेक मंत्री सध्या संशोधनकार्यात भलतेच मग्न दिसतात.भगवान गणेशाचे रूप हे अवयव प्रत्यारोपाचे उत्कृष्ट उदाहरण आहे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानवरून प्रेरणा घेत राजस्थानचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनीही एक संशोधन समोर आणले आहे. त्यांच्या मते, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटनच्याही हजारो वर्षे आधी द्वितीय ब्रह्मगुप्ताने मांडला होता. न्यूटनने फक्त कॉपी केली! हे खरं असेल तर नजीकच्या काळात याच देशी तंत्रज्ञानावर आधारित ब्रह्मगुप्त नावाने उपग्रहांची मालिकाच ‘इस्रो’ने अवकाशात सोडली तर जगाला आश्चर्य वाटायला नको!विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला हेही तसे मिथकच. कारण, जगद्गुरू तुकारामांच्या वैकुंठ गमनासाठी आलेल्या पुष्पक विमानावरूनच राईट बंधूंना विमानाची कल्पना सुचली, असा दावा उ.प्र.तील एका मंत्र्याने केला आहे. हा तर सरळ सरळ कॉपीराईट कायद्याचा भंगच की! राईट बंधूंवर दावा ठोकायला काय हरकत? हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी केलेले संशोधन तर नोबेलच्या तोडीचे आहे. त्यांच्या मते, गाय ही एकमेव अशी पशू आहे, जी श्वासोच्छवास घेताना आॅक्सिजन सोडते आणि कार्बनडायआॅक्साईड शोषून घेते. शिवाय, गोमूत्र प्याल्याने मुनष्यास कुठलीही व्याधी उद्भवत नाही! तर मग बाबा रामदेव यांच्या पतंजलीचे शुद्ध गोमूत्र दवाखान्यात ठेवूया का? भारतातील या नवसंशोधनाच्या वार्ता ऐकल्यानंतर खात्रीच पटते की, डार्विनचा सिद्धांत पूर्णत: खरा नसावाच. अन्यथा, सगळीच वानरं माणसाळली असती!- नंदकिशोर पाटीलNandu.patil@lokmat.com 

टॅग्स :Satyapal Singhसत्यपाल सिंगMonkeyमाकडscienceविज्ञान