शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

डार्विन, माकड आणि माणूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:59 IST

मानवाची उत्पत्ती वानरापासून झाली, हा चार्ल्स डार्विनचा सिद्धांत खोटा आहे, हे केंद्रीय मनुष्यबळ राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांचे विधान वाचून हायसे वाटले.

मानवाची उत्पत्ती वानरापासून झाली, हा चार्ल्स डार्विनचा सिद्धांत खोटा आहे, हे केंद्रीय मनुष्यबळ राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांचे विधान वाचून हायसे वाटले. आपण मर्कंटवंशाचे दिवे आहोत, हे शालेय पाठ्यपुस्तकात वाचल्यापासून आमच्या लीलांना सुमारच उरलेला नव्हता. गुरुजींनी एकदा ‘वानर आणि टोपीविक्रेता’ या गोष्टीचे तात्पर्य काय, असे विचारले असता, ‘आपल्या पूर्वजांना अशी टोपी घालणे योग्य नव्हे’, असे उत्तर दिल्याने आम्हांस उठाबशाची शिक्षा मिळाली होती. रामायण काळात हनुमंतासह समस्त वानरसेना प्रभू रामचंद्रांच्या मदतीसाठी धावून आली, सीतेच्या शोधासाठी त्यांनी रामेश्वरमपासून लंकेपर्यंत रामसेतू बांधला. हे त्यांनी भक्तीपोटी नव्हे, तर पितृक प्रेमातून केलं असावं, असा आमचा डार्विन वाचल्यामुळं गैरसमज झाला होता. सत्यपालांनी खरं काय ते सांगून आमच्या मानगुटीवर बसलेलं हे डार्विनचं भूत उतरवून टाकलं ते बरंच झालं. सत्यपाल हे द्रष्टेपुरुष वाटतात. मानवी उत्पत्तीबरोबर भाषेच्या उगमावरही त्यांनी प्रकाश टाकला आहे. त्यांच्या मते, ‘पशू, पक्षी आणि प्राण्यांचे आवाज ऐकून मनुष्य भाषा शिकला हे मानववंश शास्त्रज्ञांचे विधान साफ खोटे आहे. ‘वस्तुत: चंद्र, सूर्य, पृथ्वीच्या निर्मितीनंतर भगवंतांची वेदवाणी झाली आणि मनुष्याच्या तोंडून पहिल्यांदा वेदोच्चारच बाहेर पडला!’ असं असेल तर मग वेदवाणी जाणणारे सप्तर्षी (सात ऋषी) हेच पृथ्वीवरचे प्रथम नागरिक आणि आपण वंशज ठरतो. त्यामुळे सत्यपालांच्या या संशोधनाची दखल घेऊन संयुक्त राष्टÑ संघाने समस्त भारतीयांना वैश्विक नागरिक मानून जगभरचा व्हिसा मंजूर करायला हरकत नाही!भाजपशासित प्रदेशातील अनेक मंत्री सध्या संशोधनकार्यात भलतेच मग्न दिसतात.भगवान गणेशाचे रूप हे अवयव प्रत्यारोपाचे उत्कृष्ट उदाहरण आहे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानवरून प्रेरणा घेत राजस्थानचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनीही एक संशोधन समोर आणले आहे. त्यांच्या मते, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटनच्याही हजारो वर्षे आधी द्वितीय ब्रह्मगुप्ताने मांडला होता. न्यूटनने फक्त कॉपी केली! हे खरं असेल तर नजीकच्या काळात याच देशी तंत्रज्ञानावर आधारित ब्रह्मगुप्त नावाने उपग्रहांची मालिकाच ‘इस्रो’ने अवकाशात सोडली तर जगाला आश्चर्य वाटायला नको!विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला हेही तसे मिथकच. कारण, जगद्गुरू तुकारामांच्या वैकुंठ गमनासाठी आलेल्या पुष्पक विमानावरूनच राईट बंधूंना विमानाची कल्पना सुचली, असा दावा उ.प्र.तील एका मंत्र्याने केला आहे. हा तर सरळ सरळ कॉपीराईट कायद्याचा भंगच की! राईट बंधूंवर दावा ठोकायला काय हरकत? हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी केलेले संशोधन तर नोबेलच्या तोडीचे आहे. त्यांच्या मते, गाय ही एकमेव अशी पशू आहे, जी श्वासोच्छवास घेताना आॅक्सिजन सोडते आणि कार्बनडायआॅक्साईड शोषून घेते. शिवाय, गोमूत्र प्याल्याने मुनष्यास कुठलीही व्याधी उद्भवत नाही! तर मग बाबा रामदेव यांच्या पतंजलीचे शुद्ध गोमूत्र दवाखान्यात ठेवूया का? भारतातील या नवसंशोधनाच्या वार्ता ऐकल्यानंतर खात्रीच पटते की, डार्विनचा सिद्धांत पूर्णत: खरा नसावाच. अन्यथा, सगळीच वानरं माणसाळली असती!- नंदकिशोर पाटीलNandu.patil@lokmat.com 

टॅग्स :Satyapal Singhसत्यपाल सिंगMonkeyमाकडscienceविज्ञान