शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मराठीसाठी धोक्याची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 02:24 IST

महापालिकेच्या मराठी शाळेतील विद्यार्थी संख्या ४० हजारांनी घटल्याची धक्कादायक माहिती प्रजा फाउंडेशन या संस्थेने उघडकीस आणली आहे. ही मराठीसाठी धोक्याची घंटा आहे.

महापालिकेच्या मराठी शाळेतील विद्यार्थी संख्या ४० हजारांनी घटल्याची धक्कादायक माहिती प्रजा फाउंडेशन या संस्थेने उघडकीस आणली आहे. ही मराठीसाठी धोक्याची घंटा आहे. एकीकडे मराठी साहित्य संमेलनाचा झेंडा अटकेपार रोवला जातो. दिवाळी अंक काढून मराठीचा उदोउदो केला जातो. दुसरीकडे मात्र मुंबईसारख्या शहरात मराठीची केविलवाणी अवस्था होत आहे. हे चित्र राज्याच्या दृष्टीने भयावह आहे. मराठी टिकावी, तिचे संवर्धन व्हावे, अशी ओरड नेहमीच राजकारणी, साहित्यिक करत असतात. प्रत्यक्षात मराठी टिकविण्यासाठी व रुजविण्यासाठी काहीच प्रयत्न होत नसल्याचे प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून स्पष्ट होते. मोबाइल, इंटरनेटमुळे संपूर्ण जग प्रत्येकाच्या हातात आले आहे. हे जग बघायचे असल्यास तुम्हाला इंग्रजी अनिवार्यच आहे. काही बोलीभाषेतील इंग्रजी शब्द तर सहज लक्षात येतात. त्यामुळे मराठीचा विसर थोड्याफार प्रमाणात अशिक्षित माणसालाही होतो. मराठीचा झेंडा हाती घेऊन काही जण राजकारणात मोठेही झाले. मात्र, मराठीचे अस्तित्व दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. मराठी टिकवायची असेल तर त्यासाठी लागणारे शिक्षक, त्यांचे प्रशिक्षण व अन्य आवश्यक गोष्टींवर विशेष लक्ष द्यायला हवे. एखाद्या राज्याच्या अर्थसंकल्पालाही मागे टाकेल एवढ्या मोठ्या रकमेची वर्षाला उलाढाल करणाºया मुंबई महापालिकेला मराठी टिकविण्यासाठी काही ठोस करावेसे न वाटणे, ही लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल. गेली अनेक वर्षे सत्ता उपभोगणारी शिवसेना व विरोधी बाकावर बसणाºया अन्य पक्षांनाही मराठीबाबत आस्था नाही. महत्त्वाचे म्हणजे मराठी शाळेचा दर्जा घसरला आहे, तेथे सुविधांचा अभाव आहे, असे मत मुंबईत राहणाºया बहुतांश मराठी जनांनी नोंदविले आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे गेल्या चार वर्षांत मराठी विद्यार्थ्यांची गळती सुरू झाली. तरीही मराठी टक्क्यावर निवडून येणाºया नगरसेवकांपैकी एक टक्का नगरसेवकांनी याबाबत दीर्घ चर्चा घडवून आणली नाही किंवा याविषयी आक्र मक झाले नाहीत, ही मराठीसाठी अत्यंत दुर्दैवी बाब आहे. तरीही ‘प्रजा’च्या अहवालानुसार इंग्रजी व सेमीइंग्रजी वर्गाचे विद्यार्थी चार वर्षांत लक्षणीय वाढले आहेत ही एका अर्थाने जमेची बाजू आहे. इंग्रजीच्या आक्रमणात मराठी टिकविण्यासाठीही ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. मराठीचा वापर केवळ साहित्य संमेलनात किंवा राजकारण करण्यासाठी होऊ नये; अन्यथा २0२१पर्यंत महापालिकेच्या शाळांतून मराठी नष्ट होईल, ही प्रजा फाउंडेशनची भविष्यवाणी खरी ठरेल. ही भविष्यवाणी खरी ठरू नये, यासाठी राजकीय व प्रशासकीय पातळीवर याचा गांभीर्याने विचार करायला हवा, ही काळाची गरज आहे.

टॅग्स :Schoolशाळा