शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

मराठीसाठी धोक्याची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 02:24 IST

महापालिकेच्या मराठी शाळेतील विद्यार्थी संख्या ४० हजारांनी घटल्याची धक्कादायक माहिती प्रजा फाउंडेशन या संस्थेने उघडकीस आणली आहे. ही मराठीसाठी धोक्याची घंटा आहे.

महापालिकेच्या मराठी शाळेतील विद्यार्थी संख्या ४० हजारांनी घटल्याची धक्कादायक माहिती प्रजा फाउंडेशन या संस्थेने उघडकीस आणली आहे. ही मराठीसाठी धोक्याची घंटा आहे. एकीकडे मराठी साहित्य संमेलनाचा झेंडा अटकेपार रोवला जातो. दिवाळी अंक काढून मराठीचा उदोउदो केला जातो. दुसरीकडे मात्र मुंबईसारख्या शहरात मराठीची केविलवाणी अवस्था होत आहे. हे चित्र राज्याच्या दृष्टीने भयावह आहे. मराठी टिकावी, तिचे संवर्धन व्हावे, अशी ओरड नेहमीच राजकारणी, साहित्यिक करत असतात. प्रत्यक्षात मराठी टिकविण्यासाठी व रुजविण्यासाठी काहीच प्रयत्न होत नसल्याचे प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून स्पष्ट होते. मोबाइल, इंटरनेटमुळे संपूर्ण जग प्रत्येकाच्या हातात आले आहे. हे जग बघायचे असल्यास तुम्हाला इंग्रजी अनिवार्यच आहे. काही बोलीभाषेतील इंग्रजी शब्द तर सहज लक्षात येतात. त्यामुळे मराठीचा विसर थोड्याफार प्रमाणात अशिक्षित माणसालाही होतो. मराठीचा झेंडा हाती घेऊन काही जण राजकारणात मोठेही झाले. मात्र, मराठीचे अस्तित्व दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. मराठी टिकवायची असेल तर त्यासाठी लागणारे शिक्षक, त्यांचे प्रशिक्षण व अन्य आवश्यक गोष्टींवर विशेष लक्ष द्यायला हवे. एखाद्या राज्याच्या अर्थसंकल्पालाही मागे टाकेल एवढ्या मोठ्या रकमेची वर्षाला उलाढाल करणाºया मुंबई महापालिकेला मराठी टिकविण्यासाठी काही ठोस करावेसे न वाटणे, ही लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल. गेली अनेक वर्षे सत्ता उपभोगणारी शिवसेना व विरोधी बाकावर बसणाºया अन्य पक्षांनाही मराठीबाबत आस्था नाही. महत्त्वाचे म्हणजे मराठी शाळेचा दर्जा घसरला आहे, तेथे सुविधांचा अभाव आहे, असे मत मुंबईत राहणाºया बहुतांश मराठी जनांनी नोंदविले आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे गेल्या चार वर्षांत मराठी विद्यार्थ्यांची गळती सुरू झाली. तरीही मराठी टक्क्यावर निवडून येणाºया नगरसेवकांपैकी एक टक्का नगरसेवकांनी याबाबत दीर्घ चर्चा घडवून आणली नाही किंवा याविषयी आक्र मक झाले नाहीत, ही मराठीसाठी अत्यंत दुर्दैवी बाब आहे. तरीही ‘प्रजा’च्या अहवालानुसार इंग्रजी व सेमीइंग्रजी वर्गाचे विद्यार्थी चार वर्षांत लक्षणीय वाढले आहेत ही एका अर्थाने जमेची बाजू आहे. इंग्रजीच्या आक्रमणात मराठी टिकविण्यासाठीही ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. मराठीचा वापर केवळ साहित्य संमेलनात किंवा राजकारण करण्यासाठी होऊ नये; अन्यथा २0२१पर्यंत महापालिकेच्या शाळांतून मराठी नष्ट होईल, ही प्रजा फाउंडेशनची भविष्यवाणी खरी ठरेल. ही भविष्यवाणी खरी ठरू नये, यासाठी राजकीय व प्रशासकीय पातळीवर याचा गांभीर्याने विचार करायला हवा, ही काळाची गरज आहे.

टॅग्स :Schoolशाळा