शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

मराठीसाठी धोक्याची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 02:24 IST

महापालिकेच्या मराठी शाळेतील विद्यार्थी संख्या ४० हजारांनी घटल्याची धक्कादायक माहिती प्रजा फाउंडेशन या संस्थेने उघडकीस आणली आहे. ही मराठीसाठी धोक्याची घंटा आहे.

महापालिकेच्या मराठी शाळेतील विद्यार्थी संख्या ४० हजारांनी घटल्याची धक्कादायक माहिती प्रजा फाउंडेशन या संस्थेने उघडकीस आणली आहे. ही मराठीसाठी धोक्याची घंटा आहे. एकीकडे मराठी साहित्य संमेलनाचा झेंडा अटकेपार रोवला जातो. दिवाळी अंक काढून मराठीचा उदोउदो केला जातो. दुसरीकडे मात्र मुंबईसारख्या शहरात मराठीची केविलवाणी अवस्था होत आहे. हे चित्र राज्याच्या दृष्टीने भयावह आहे. मराठी टिकावी, तिचे संवर्धन व्हावे, अशी ओरड नेहमीच राजकारणी, साहित्यिक करत असतात. प्रत्यक्षात मराठी टिकविण्यासाठी व रुजविण्यासाठी काहीच प्रयत्न होत नसल्याचे प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून स्पष्ट होते. मोबाइल, इंटरनेटमुळे संपूर्ण जग प्रत्येकाच्या हातात आले आहे. हे जग बघायचे असल्यास तुम्हाला इंग्रजी अनिवार्यच आहे. काही बोलीभाषेतील इंग्रजी शब्द तर सहज लक्षात येतात. त्यामुळे मराठीचा विसर थोड्याफार प्रमाणात अशिक्षित माणसालाही होतो. मराठीचा झेंडा हाती घेऊन काही जण राजकारणात मोठेही झाले. मात्र, मराठीचे अस्तित्व दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. मराठी टिकवायची असेल तर त्यासाठी लागणारे शिक्षक, त्यांचे प्रशिक्षण व अन्य आवश्यक गोष्टींवर विशेष लक्ष द्यायला हवे. एखाद्या राज्याच्या अर्थसंकल्पालाही मागे टाकेल एवढ्या मोठ्या रकमेची वर्षाला उलाढाल करणाºया मुंबई महापालिकेला मराठी टिकविण्यासाठी काही ठोस करावेसे न वाटणे, ही लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल. गेली अनेक वर्षे सत्ता उपभोगणारी शिवसेना व विरोधी बाकावर बसणाºया अन्य पक्षांनाही मराठीबाबत आस्था नाही. महत्त्वाचे म्हणजे मराठी शाळेचा दर्जा घसरला आहे, तेथे सुविधांचा अभाव आहे, असे मत मुंबईत राहणाºया बहुतांश मराठी जनांनी नोंदविले आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे गेल्या चार वर्षांत मराठी विद्यार्थ्यांची गळती सुरू झाली. तरीही मराठी टक्क्यावर निवडून येणाºया नगरसेवकांपैकी एक टक्का नगरसेवकांनी याबाबत दीर्घ चर्चा घडवून आणली नाही किंवा याविषयी आक्र मक झाले नाहीत, ही मराठीसाठी अत्यंत दुर्दैवी बाब आहे. तरीही ‘प्रजा’च्या अहवालानुसार इंग्रजी व सेमीइंग्रजी वर्गाचे विद्यार्थी चार वर्षांत लक्षणीय वाढले आहेत ही एका अर्थाने जमेची बाजू आहे. इंग्रजीच्या आक्रमणात मराठी टिकविण्यासाठीही ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. मराठीचा वापर केवळ साहित्य संमेलनात किंवा राजकारण करण्यासाठी होऊ नये; अन्यथा २0२१पर्यंत महापालिकेच्या शाळांतून मराठी नष्ट होईल, ही प्रजा फाउंडेशनची भविष्यवाणी खरी ठरेल. ही भविष्यवाणी खरी ठरू नये, यासाठी राजकीय व प्रशासकीय पातळीवर याचा गांभीर्याने विचार करायला हवा, ही काळाची गरज आहे.

टॅग्स :Schoolशाळा