शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

जालन्याच्या मैदानात दानवे-खोतकरांची खडाखडी

By सुधीर महाजन | Updated: November 17, 2018 13:35 IST

खोतकरांनी दंड थोपटले आता दानवे शड्डु ठोकणार की जमीन घट्ट पकडून खेळणार? 

- सुधीर महाजन

सोन्याचा पाळणा असलेल्या जालन्यावर वर्चस्व कोणाचे हा प्रश्न येत्या लोकसभेच्या मैदानात निकाली निघणार आहे. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी थेट भोकरदन मध्ये जावून दंड थोपटत खा. रावसाहेब दानवेंना आव्हान दिले. भाजपसाठी प्रदेशाध्यक्षाचा मतदारसंघ प्रतिष्ठेचा तर खोतकरांसाठी राजकीय अस्तित्वाचा प्रश्न म्हणून ही कुस्ती झालीच तर रंगतदार निश्चित होईल. दानवे-खोतकर हे दोघेही युतीचे असले तरी त्यांनी युतीधर्म कधीच पाळलेला नाही आणि दोघांमध्ये एकमेकांना आजमावयाची खूमखूमी जुनीच आहे.

या दोघांमधील राजकीय संघर्षांचे कारण जिल्ह्याचा एकमुखी नेता कोण हाच मुद्दा अगदी मागेच जायचे ठरवले तर २००३ साली झालेल्या जि.प. निवडणुकीच्या वेळी जागावाटपावरून जि.प. अध्यक्षांच्या निवास्थानी या दोघांमध्ये हाणामारी झाली होती. पुढे २०१३-१४ साली झालेल्या बाजारसमितीच्या निवडणुकीत जागावाटपावरून वाद झाला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जालन्यात सेनेला मदत केली नाही असा आरोपच खोतकर करतात. त्याच पार्श्वभूमीवर आता खोतकरांनी आव्हान दिले हे काही नवीन नाही. 

खोतकरांची सध्याची परिस्थिती पाहता ते पर्यायाच्या शोधात आहेत. २०१४ साली काँग्रेस विरोधी लाट असतांना खोतकर केवळ २९६ मतांनी निसटते विजयी झाले होते. आता त्यांना पर्याय हवा आहे. लोकसभा मतदारसंघात सिल्लोड-सोयगावचा समावेश आहे; पण यावेळी सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांचे दानवेंशी बिनसले तिकडे टोपे, गोरंट्याल ही विरोधात आहे. भोकरदनमध्ये खासदार, आमदार, जि. प. सदस्य अशी पदे दानवेंच्या घरातच असल्याने सुप्त असंतोष आहेच. बदनापूर, अंबड मध्ये दलित मुस्लीम मतावर डोळा ठेवत खोतकरांनी बेगमी केलेली दिसते. पैठण ही त्यांची सासुरवाडी तर फुलंब्रीत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि दानवे यांच्यातील बेबनाव सर्वश्रृत असल्याने एवढ्या दृश्य शिबंदीवर खोतकर मैदान मारण्याचा इरादा ठेवतात. शिवाय भाजपमधील लोणीकर गट, दिलीप तौर, विलास नाईकांसारखे भाजपमधील निष्ठावान, संघ परिवार यांच्याशी दानवेंचे पटत नाही. भोकरदनमध्ये चंद्रकांत दानवेंसारखी मंडळी रसदपुरवायला तयार आहेत. खोतकर मैत्रीपुर्ण लढण्याऐवजी काँग्रेसच्या वाटेवर दिसतात. जालन्यात गोरंट्याल यांना विधानसभा सोडायची. सत्तार यांच्यासोबत वाढलेली उठबस ही थेट काँग्रेसप्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांशी तार जुळणारी आहेत. शिवाय देशभरातील ‘मोदी बुखार’ उतरला आहे. अशा गणिताच्या जोरावर या हालचाली दिसतात.

खा. दानवेसाठी खोतकरांची डोकेदुखी नवी नाही; पण घराणेशाहीचा मुद्दा मतदारसंघापेक्षा भोकरदनमध्ये चर्चेचा विषय आहे. गेल्या पाच वर्षात त्यांनी काही सुधारणा केल्या. पूर्वी जालना शहरात त्यांची उपस्थिती फारशी नसायची ही त्यांनी जाणीवपूर्वक वाढविली. जालन्यातील उद्योजकांना त्यांनी खोतकरांपासून दूर केले. मतदारसंघात निधी आणून कामे सुरू केली. शहरावर विशेष लक्ष दिले. या जमेच्या गोष्टी असल्यातरी लोणीकरांशी त्यांचे सूर जुळलेले नाहीत. भाजपमधील निष्ठावान आणि संघही त्यांच्याशी अंतर ठेवून आहेत. शेजारी अब्दुल सत्तारांची डोकेदुखी आहेतच. सगळीच सत्तेची पदे घरात विकास कामांची कंत्राटे नातेवाईकांना यामुळे पक्षातही नाराजी आहे; पण ती सध्या कोणी बोलून दाखवत नाही. त्यांच्या तंबूत सारेच काही आलबेल आहे. असे म्हणता येणार नाही. खोतकरांनी दंड थोपटले आता दानवे शड्डु ठोकणार की जमीन घट्ट पकडून खेळणार? 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेArjun Khotkarअर्जुन खोतकरShiv SenaशिवसेनाBJPभाजपाlok sabhaलोकसभा